Breaking News
  • ३१ जिल्ह्यांना पावसाचा इशारा; मान्सून राज्याच्या दारात.
  • पुणेकरांसाठी आनंदाची बातमी – हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोच्या पहिल्या टप्प्याच्या उद्घाटनाची तयारी सुरू झाली आहे.
  • अमरावती मनपाची मोठी कारवाई – थकीत कर वसुलीसाठी दोन मालमत्ता सील करण्यात आल्या. प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे.
  • मुंबईतील विकासकामांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आढावा घेणार – पावसाळ्यापूर्वी महापालिकेच्या विविध प्रकल्पांची पाहणी होणार आहे.
  • पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळ अटकेत – राजस्थानमधून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. तो अनेक महिन्यांपासून फरार होता.
  • अकरावी प्रवेश प्रक्रिया (FYJC) – दुसऱ्या नियमित प्रवेश फेरीचे वेळापत्रक जाहीर; ६ जूनपासून विद्यार्थ्यांना पसंतीक्रम बदलण्याची संधी मिळणार.
  • महाराष्ट्रातील पावसाचा अंदाज – हवामान विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार राज्यातील बहुतांश भागात यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता व्यक्त.
  • कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती, कमकुवत रुपया आणि पावसाच्या अनिश्चिततेमुळे RBI ने महागाईचा अंदाज वाढवला.
  • नैर्ऋत्य मान्सून केरळमध्ये दाखल; महाराष्ट्रात पुढील काही दिवसांत प्रगतीची शक्यता, मात्र एल निनोचा प्रभाव चिंतेचा विषय.

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

राष्ट्रीय महामार्ग अपघात

राष्ट्रीय महामार्गावर दोन वाहनाची धडक, दोघांचा जागीच मृत्यू...

National Highway Accidents: राष्ट्रीय महामार्ग १६१ वर मध्यरात्री, खानापूर चित्ता जवळ, दोन स्विफ्ट डिझायर चालकांचा (सुरज साळवे व अरुण आमले) जागीचा मृत्यू झाला.


राष्ट्रीय महामार्गावर दोन वाहनाची धडक दोघांचा जागीच मृत्यू

National Highway Accidents |

खानापूर चित्ता जवळील घटना

खानापूर चित्ता (National Highway Accidents) : हिंगोली ते कळमनुरी  राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६१ वर मध्यरात्री साडेबारा ते एक वाजण्याच्या सुमारास धोकादायक स्थितीत उभ्या असलेल्या जड वाहनास स्विफ्ट डिझायर धडकल्याने दोन जणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना  घडली.  

याबाबत सविस्तर माहिती अशी की, हिंगोली तालुक्यातील खानापूर चित्ता जवळील मोदी यांच्या शेताजवळ बिघाड झालेल्या ट्रेलरला पाठीमागून धडकल्याने कळमनुरी साईनगर येथील सुरज संजय साळवे व अरुण भिवाजी आमले हे दोघेजण जागीच ठार झाले. सदरील अपघात बिघाड झालेले वाहन धोकादायक स्थितीत असल्याने अपघात घडला असावा. कारण बिघाड झालेल्या ट्रेलरच्या बाजूला कोणतेही धोकादायक स्टीकर अथवा फलक लावण्यात आले नाहीत यामुळेच अपघात झाला असावा असे प्रत्यक्ष दर्शविणे सांगितले. सुरज आणि अरुण हे दोघेजण काही कामानिमित्त कळमनुरी वरून हिंगोलीला आपल्या स्विफ्ट डिझायर  कार क्रमांक एम एच 14 जीडी ९८७१ मध्ये काही कामानिमित्त गेले होते.

हिंगोली येथील कामे आटोपून परतीचा प्रवास कळमनुरी कडे करीत असताना खानापूर चित्ता जवळील मोदी यांच्या शेताजवळ मागील दोन तीन दिवसापासून नादुरुस्त  ( बिघाड ) झालेले अवजड वाहन ट्रेलर क्रमांक आर जे 51 जीए 0799 धोकादायक स्थितीमध्ये उभे करण्यात आले होते. बिघाड झालेल्या ट्रकच्या पाठीमागून राष्ट्रीय महामार्गाकडून अथवा ट्रेलर चालकांकडून कोणत्याही प्रकारचे धोकादायक स्टिकर अथवा बॅरिकेट लावण्यात आलेले नाहीत.

यामुळे राष्ट्रीय महामार्गावरून चालणाऱ्या वाहन चालकांना समोर बिघाड झालेले वाहन दिसून आले नसल्याने, सदरील अपघात (National Highway Accidents) घडल्याचे प्रथम दर्शनी कडून सांगण्यात आले. अपघाताची माहिती हिंगोली ग्रामीण पोलीस स्टेशनला कळताच हिंगोली ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शामकुमार डोंगरे, बीट अमलदार अनिल डुकरे व साथीदार यांनी त्वरित घटनास्थळी दाखल होऊन घडलेल्या अपघातातील मृतांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Related to this topic: