Breaking News
  • सुवेंदू अधिकारी होणार बंगालचे नवे मुख्यमंत्री; रूपा गांगुली यांची उपमुख्यमंत्रीपदी नियुक्ती
  • 'थलपथी' विजयला मिळाले बहुमत; मुख्यमंत्रीपदाचा मार्ग मोकळा!
  • 'निदा खान प्रकरणात इम्तियाज जलील यांना सहआरोपी करा', मंत्री संजय शिरसाट यांची मागणी
  • विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह पाऊस, विजांचा कडकडाट आणि काही ठिकाणी गारपिटीचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
  • रितेश देशमुख दिग्दर्शित ‘राजा शिवाजी’ या मराठी चित्रपटाने 50 कोटींचा टप्पा ओलांडत मोठे यश मिळवले आहे आणि 75 कोटींकडे वाटचाल सुरू आहे.
  • राज्यातील सुमारे 16 लाख विद्यार्थ्यांसाठी दहावीचा निकाल आज जाहीर करण्यात आला असून विद्यार्थी अधिकृत वेबसाईट आणि डिजीलॉकरवर निकाल पाहू शकतात.
  • नांदेड ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल 4,796 धारदार शस्त्रांचा साठा जप्त केला आहे. तलवारी, गुप्ती आणि चाकू यांचा मोठा साठा सापडल्याने राज्यात खळबळ उडाली आहे. ही आतापर्यंतची सर्वात मोठी एकदिवसीय शस्त्र जप्ती मानली जात आहे
  • महाराष्ट्र SSC 2026 निकालात लातूर विभागाने पुन्हा एकदा चांगली कामगिरी केली आहे. राज्यातील 179 विद्यार्थ्यांनी 100% गुण मिळवले असून त्यापैकी सर्वाधिक 104 विद्यार्थी लातूर विभागातील आहेत.
  • गडचिरोली जिल्ह्यातील APR सॅक प्लांटवरील 72 दिवसांचे आंदोलन अखेर संपले. कामगारांच्या नोकऱ्या सुरक्षित ठेवत आर्थिक भरपाईसह करार झाला आहे.

होम > आपले शहर > विदर्भ > वाशिम

शहरातून जडवाहनांची वाहतूक सुरू; बायपास रस्त्याची मागणी तीव्र!

मानोरा शहरातून मोठ्या प्रमाणावर जड वाहनांची वाहतूक होत असल्याने स्थानिक नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.


शहरातून जडवाहनांची वाहतूक सुरू बायपास रस्त्याची मागणी तीव्र 

Heavy Vehicles |

रस्ता ओलांडताना नागरिकांमध्ये भिती!

मानोरा (Heavy Vehicles) : तालुक्याचे ठिकाण मानोरा शहरातून मोठ्या प्रमाणावर जड वाहनांची वाहतूक होत असल्याने स्थानिक नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. ट्रक, ट्रॅक्टर, डंपर यासारख्या जड वाहनांमुळे गावातील मुख्य रस्त्यावर नेहमीच वाहतूक कोंडी निर्माण होत असून पादचारी, विद्यार्थी आणि नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.  

गावातील रस्ते अरुंद असल्यामुळे जड वाहनांची सततची वर्दळ नागरिकांसाठी धोकादायक ठरत आहे. शाळकरी मुले, महिला व ज्येष्ठ नागरिकांना रस्ता ओलांडताना मोठी कसरत करावी लागत आहे. तसेच धूळ, आवाज आणि अपघाताचा धोका यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.  

स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, गावातून होणारी ही जड वाहतूक थांबवून गावाबाहेरून बायपास रस्ता तयार करण्यात यावा, अशी मागणी वारंवार करण्यात येत आहे. मात्र संबंधित प्रशासनाने याकडे अद्याप गांभीर्याने लक्ष दिले नसल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. वडगाव येथून बायपास रस्त्याच्या मागणीसाठी माजी पंचायत समिती उप सभापती उज्ज्वला राजेंद्र गावंडे यांनी गत एक वर्षापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभाग यवतमाळ यांना पत्र दिले होते. परंतु, सा. बां. विभाग यांनी या गंभीर समस्येकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे.  या समस्येमुळे स्थानिक जनतेमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून प्रशासनाने तातडीने दखल घेऊन बायपास रस्ता तयार करावा, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे. बायपास रस्ता झाल्यास गावातील वाहतूक सुरळीत होऊन अपघाताची शक्यता कमी होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.  शहराच्या बाहेरून बाय पास रस्ता तयार झाल्यास जड वाहनाची ये - जा करण्याची समस्या सुटण्यास मदत होईल. तसेच शहरातील वाहतूक सुरळीत होईल.

Related to this topic: