Breaking News
  • ३१ जिल्ह्यांना पावसाचा इशारा; मान्सून राज्याच्या दारात.
  • पुणेकरांसाठी आनंदाची बातमी – हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोच्या पहिल्या टप्प्याच्या उद्घाटनाची तयारी सुरू झाली आहे.
  • अमरावती मनपाची मोठी कारवाई – थकीत कर वसुलीसाठी दोन मालमत्ता सील करण्यात आल्या. प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे.
  • मुंबईतील विकासकामांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आढावा घेणार – पावसाळ्यापूर्वी महापालिकेच्या विविध प्रकल्पांची पाहणी होणार आहे.
  • पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळ अटकेत – राजस्थानमधून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. तो अनेक महिन्यांपासून फरार होता.
  • अकरावी प्रवेश प्रक्रिया (FYJC) – दुसऱ्या नियमित प्रवेश फेरीचे वेळापत्रक जाहीर; ६ जूनपासून विद्यार्थ्यांना पसंतीक्रम बदलण्याची संधी मिळणार.
  • महाराष्ट्रातील पावसाचा अंदाज – हवामान विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार राज्यातील बहुतांश भागात यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता व्यक्त.
  • कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती, कमकुवत रुपया आणि पावसाच्या अनिश्चिततेमुळे RBI ने महागाईचा अंदाज वाढवला.
  • नैर्ऋत्य मान्सून केरळमध्ये दाखल; महाराष्ट्रात पुढील काही दिवसांत प्रगतीची शक्यता, मात्र एल निनोचा प्रभाव चिंतेचा विषय.

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

राष्ट्रीय पशू गाय

हिंगोलीत गायीला राष्ट्रीय पशू घोषित करण्याची मागणी

National Animal Cow: विराट राष्ट्रीय लोकमंच मागणी करत आहे की, गायीला भारतात राष्ट्रीय पशू म्हणून घोषित केला जावे. या निवेदनात गोवंशाचा संरक्षण आणि गोहत्यावर होणारे राजकारण .


हिंगोलीत गायीला राष्ट्रीय पशू घोषित करण्याची मागणी

National Animal Cow |

विराट राष्ट्रीय लोकमंच कौन्सिलचे राज्यपाल व मुख्यमंत्र्यांना निवेदन

हिंगोली (National Animal Cow) : गोवंश, गोरक्षण आणि गोहत्या यावरून सुरू असलेले राजकारण थांबवून गायीला राष्ट्रीय पशू म्हणून घोषित करण्यात यावे, अशी मागणी विराट राष्ट्रीय लोकमंच कौन्सिल या सामाजिक संस्थेने केली आहे. विराट राष्ट्रीय लोक मंचचे संस्थापक अध्यक्ष शेख नईम शेख लाल यांनी जिल्हाधिकारी हिंगोली यांच्यामार्फत राज्यपाल जिष्णू देव वर्मा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन सादर केले. 

निवेदनात म्हटले आहे की, भारत हा कृषी प्रधान व संस्कृती प्रधान देश असून येथे विविध जाती-धर्माचे लोक एकत्रितपणे राहतात. हिंदू संस्कृतीत गायीला आईचे स्थान देऊन गोमाता म्हटले जाते. ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या गाय-बैलांचे संगोपन शेतकरी कुटुंबातील सदस्याप्रमाणे करतात. (National Animal Cow) गायीचे दूध लहान मुलांच्या पोषणासाठी, गोमूत्र धार्मिक विधी व सेंद्रिय शेतीसाठी तर शेतीच्या कामांसाठी बैलांचा वापर केला जातो. त्यामुळे गाय आणि बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी अनेक सण साजरे केले जातात. 

मात्र, सध्या गोहत्या आणि गोरक्षण या नावाखाली मोठ्या प्रमाणावर आर्थिक, सामाजिक व राजकीय स्वार्थासाठी राजकारण केले जात आहे. समाजामध्ये द्वेष पसरवण्याचे काम गाय व गोवंशाच्या नावाखाली केले जात असून त्यातून अनेक ठिकाणी कायदा व सुव्यवस्था बिघडते. अनेक निरपराध लोकांना आपला जीव गमवावा लागतो. केंद्र व विविध राज्य शासनांकडून परकीय मुद्रा व मोठ्या प्रमाणावर मिळविण्यासाठी बिफच्या कारखान्यांना परवानगी दिली जाते. कारखान्याचे मालक एका धर्मातील असले तरी दुसऱ्या धर्माचे लोकच त्यात काम करतात, असा दावाही निवेदनात करण्यात आला आहे. 

त्यामुळे गोवंश, गोरक्षण व गोहत्या यावरून सुरू असलेले राजकारण व अप्रिय घटना कायमस्वरूपी बंद करण्यासाठी गायीला राष्ट्रीय पशू म्हणून घोषित करावे, अशी मागणी विराट राष्ट्रीय लोकमंच तर्फे करण्यात आली आहे. या (National Animal Cow) निवेदनावर राष्ट्रीय संचालक शेख नोमान नवेद, उपाध्यक्ष रवी बन्सीलाल जैस्वाल, शेख आवेज महेबुद, जिल्हाध्यक्ष शेख वासीत महेबुब, शहराध्यक्ष पठाण साजीद खान यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांच्या सह्या आहेत.

Related to this topic: