Breaking News
  • सुवेंदू अधिकारी होणार बंगालचे नवे मुख्यमंत्री; रूपा गांगुली यांची उपमुख्यमंत्रीपदी नियुक्ती
  • 'थलपथी' विजयला मिळाले बहुमत; मुख्यमंत्रीपदाचा मार्ग मोकळा!
  • 'निदा खान प्रकरणात इम्तियाज जलील यांना सहआरोपी करा', मंत्री संजय शिरसाट यांची मागणी
  • विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह पाऊस, विजांचा कडकडाट आणि काही ठिकाणी गारपिटीचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
  • रितेश देशमुख दिग्दर्शित ‘राजा शिवाजी’ या मराठी चित्रपटाने 50 कोटींचा टप्पा ओलांडत मोठे यश मिळवले आहे आणि 75 कोटींकडे वाटचाल सुरू आहे.
  • राज्यातील सुमारे 16 लाख विद्यार्थ्यांसाठी दहावीचा निकाल आज जाहीर करण्यात आला असून विद्यार्थी अधिकृत वेबसाईट आणि डिजीलॉकरवर निकाल पाहू शकतात.
  • नांदेड ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल 4,796 धारदार शस्त्रांचा साठा जप्त केला आहे. तलवारी, गुप्ती आणि चाकू यांचा मोठा साठा सापडल्याने राज्यात खळबळ उडाली आहे. ही आतापर्यंतची सर्वात मोठी एकदिवसीय शस्त्र जप्ती मानली जात आहे
  • महाराष्ट्र SSC 2026 निकालात लातूर विभागाने पुन्हा एकदा चांगली कामगिरी केली आहे. राज्यातील 179 विद्यार्थ्यांनी 100% गुण मिळवले असून त्यापैकी सर्वाधिक 104 विद्यार्थी लातूर विभागातील आहेत.
  • गडचिरोली जिल्ह्यातील APR सॅक प्लांटवरील 72 दिवसांचे आंदोलन अखेर संपले. कामगारांच्या नोकऱ्या सुरक्षित ठेवत आर्थिक भरपाईसह करार झाला आहे.

होम > आपले शहर > विदर्भ > वाशिम

गो सम्मान अभियान

अखिल भारतीय गो सम्मान अभियान अंतर्गत तहसीलदार यांना निवेदन

Go Samman campaign: रिसोडमध्ये गो सम्मान अभियान अंतर्गत तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांना निवेदन सादर करण्यात आले. पंतप्रधानांकडे देशी गायींचे संरक्षणासाठी विविध मागण्या समाविष्ट आहेत.


अखिल भारतीय गो सम्मान अभियान अंतर्गत तहसीलदार यांना निवेदन 

Go Samman campaign |

रिसोड (Go Samman campaign) : अखिल भारतीय गो सम्मान अभियान अंतर्गत संपूर्ण भारत देशात दिनांक 27 एप्रिल 2026 रोजी तहसीलदार  मार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशी गाईंचे संरक्षण करण्यासाठी निवेदन देण्यात आले.

 रिसोड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून सकाळी 10 वाजता शुभम सरनाईक यांच्या सजवलेल्या देशी गाईसह गो सम्मान अभियान (Go Samman campaign) अंतर्गत गो सम्मान  यात्रा काढण्यात आली व तहसील कार्यालय येथे तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांना अखिल भारतीय गोसम्मान अभियान अंतर्गत 2880 गोभक्तांच्या सह्यांचे निवेदन देण्यात आले या निवेदनात म्हटले आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशी गाईंचे संरक्षण होण्यासाठी गाईला राष्ट्रमाता चा दर्जा देण्यात यावा, शालेय अभ्यासक्रमामध्ये गो विज्ञान हा विषय अनिवार्य करण्यात यावा, राज्य व राष्ट्रीय महामार्गावर गाईंचे अपघात होतात म्हणून गो ॲम्बुलन्स ठेवण्यात याव्यात,गाईंना चारा उपलब्ध होण्यासाठी चारा सुरक्षा कायदा करण्यात यावा,केंद्र सरकारने केंद्रीय गोसेवा व संरक्षण अधिनियम लागू करावा,गाईंची तस्करी व गोहत्या बंद होण्यासाठी कडक कायदा करून आजीवन कारावास ही शिक्षा देण्यात यावी अशा विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले.

निवेदन देते वेळी नारायणी गोशाळा प्रकल्प (Go Samman campaign) मोरगव्हाणचे  गजानन कोकाटे, छत्रपती गोशाळा बोरखेडी चे तुकाराम महाराज जायभाये, श्री सखाराम महाराज गोरक्षण प्रतिष्ठानचे प्रतिनिधी प्रा दीपक जोशी प्रा स्वप्निल साकळे, सद्गुरु दत्त गोरक्षण व वन्य औषधी संस्था कवठाचे वीरेंद्र सरनाईक,निवृत्ती पाटील डॉ अशोक इंगोले, जयंत वसमतकर,दिगंबर भिते, शितल पांडे, स्नेहा लोथे,भावना भिते, लता ईरतकर,नंदू मगर, विजय खडसे, समाधान छत्रे,भीमा माळेकर, नंदू देशमुख, निलेश जैन, महादेव पावडे, प्रज्वल सरनाईक, रितेश सरनाईक, अनिल सोनुने,शरद सरनाईक,रमेश रोडे,सुनील अल्लाट, आबाराव सरनाईक,घनश्याम फडतडे, प्रितेश सरनाईक,महादेव देशमुख,गोपाल सरनाईक,अभिषेक सरनाईक,सागर महाराज शांडिले,गजानन मुलंगे, अजबराव देशमुख यांच्या शेकडो  गो भक्त उपस्थित होते.तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांनी निवेदन स्वीकारून पुढील कारवाई साठी पाठविण्याचे सांगितले.

Related to this topic: