Gadegaon water shortage crisis: गादेगाव तांड्यावरील पाणीटंचाईमुळे स्थानिक नागरिक त्रस्त आहेत. १ मे २०२६ रोजी गटविकास अधिकाऱ्यांच्या कक्षासमोर ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा दिला गेला आहे.
मानोरा (Gadegaon water shortage crisis) : तालुक्यातील शेवटच्या टोकावरील गादेगाव तांड्यावर पाणी टंचाईने नागरिक त्रस्त झाले असून, पाणीपुरवठा सुरळीत न केल्यास १ मे २०२६ रोजी पंचायत समिती मानोरा येथील गटविकास अधिकाऱ्यांच्या कक्षात ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. सुदाम भिका जाधव यांनी गटविकास अधिकारी, पंचायत समिती मानोरा यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गादेगाव हे १४०० लोकवस्तीचे गाव असून येथे ग्रामीण पाणीपुरवठा, जल जीवन मिशन आणि माजी आमदार गजानन यांच्या २८ गावातील जीवन प्राधिकरणाची पाणीपुरवठा योजना कार्यान्वित आहे. तरीही गादेगाव तांड्यावर गटातटातील राजकारणामुळे लग्नसराईत पाणी टंचाई निर्माण झाली आहे.
२२ एप्रिल २०२५ पर्यंत सुरळीत पाणीपुरवठा करण्यासाठी माजी सरपंच भारत आडे यांच्यासह ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर घागर आंदोलन ?(Gadegaon water shortage crisis) केले होते. तरीही पाणी पुरवठा सुरळीत न होता पाणी टंचाईची झळ सोसावी लागत आहे. यामुळे ३० एप्रिलपर्यंत पाणीपुरवठा न झाल्यास १ मे रोजी काळे झेंडे दाखवून विरोध करण्यात येणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
गावात तीन योजना आणि पाण्याची टाकी असतानाही सणासुदीला व उन्हाळ्यात लग्नसराई पाणीपुरवठा (Gadegaon water shortage crisis) होत नसल्याने नागरिकांना सकाळ-संध्याकाळ पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. तांड्यातील महिलांना पाण्यासाठी डोंगर-दरी पालथी घालावी लागत असून, वाढत्या उन्हात ही समस्या अधिकच गंभीर झाली आहे. पाण्यासाठी राजकारण करून नागरिकांना वेठीस धरण्याचा प्रकार सुरू असल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे. ग्रामस्थांनी या गंभीर समस्येतून तातडीने दिलासा न दिल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला असून, जिल्हाधिकारी वाशिम, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद वाशिम, तहसीलदार मानोरा आणि ठाणेदार मानोरा यांनाही याची प्रतिलिपी पाठवण्यात आली आहे.