Breaking News
  • सुवेंदू अधिकारी होणार बंगालचे नवे मुख्यमंत्री; रूपा गांगुली यांची उपमुख्यमंत्रीपदी नियुक्ती
  • 'थलपथी' विजयला मिळाले बहुमत; मुख्यमंत्रीपदाचा मार्ग मोकळा!
  • 'निदा खान प्रकरणात इम्तियाज जलील यांना सहआरोपी करा', मंत्री संजय शिरसाट यांची मागणी
  • विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह पाऊस, विजांचा कडकडाट आणि काही ठिकाणी गारपिटीचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
  • रितेश देशमुख दिग्दर्शित ‘राजा शिवाजी’ या मराठी चित्रपटाने 50 कोटींचा टप्पा ओलांडत मोठे यश मिळवले आहे आणि 75 कोटींकडे वाटचाल सुरू आहे.
  • राज्यातील सुमारे 16 लाख विद्यार्थ्यांसाठी दहावीचा निकाल आज जाहीर करण्यात आला असून विद्यार्थी अधिकृत वेबसाईट आणि डिजीलॉकरवर निकाल पाहू शकतात.
  • नांदेड ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल 4,796 धारदार शस्त्रांचा साठा जप्त केला आहे. तलवारी, गुप्ती आणि चाकू यांचा मोठा साठा सापडल्याने राज्यात खळबळ उडाली आहे. ही आतापर्यंतची सर्वात मोठी एकदिवसीय शस्त्र जप्ती मानली जात आहे
  • महाराष्ट्र SSC 2026 निकालात लातूर विभागाने पुन्हा एकदा चांगली कामगिरी केली आहे. राज्यातील 179 विद्यार्थ्यांनी 100% गुण मिळवले असून त्यापैकी सर्वाधिक 104 विद्यार्थी लातूर विभागातील आहेत.
  • गडचिरोली जिल्ह्यातील APR सॅक प्लांटवरील 72 दिवसांचे आंदोलन अखेर संपले. कामगारांच्या नोकऱ्या सुरक्षित ठेवत आर्थिक भरपाईसह करार झाला आहे.

होम > आपले शहर > विदर्भ > गडचिरोली

कोरेगाव ग्रा.पं. पोटनिवडणुकीत पाच सदस्य बिनविरोध

दसाईगंज तालुक्यातील कोरेगाव ग्रामपंचायतीमध्ये गेल्या वर्षी २१ फेब्रुवारी रोजी मोठे राजकीय वादळ उठले होते.


कोरेगाव ग्रापं पोटनिवडणुकीत पाच सदस्य बिनविरोध

Gadchiroli Politics |

कोरेगाव (Gadchiroli Politics) : दसाईगंज तालुक्यातील कोरेगाव ग्रामपंचायतीमध्ये गेल्या वर्षी २१ फेब्रुवारी रोजी मोठे राजकीय वादळ उठले होते. जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी गोंड-गोवारी समाज अनुसूचित जमातीत मोडत नसल्याचे स्पष्ट करत पाच सदस्यांना अपात्र ठरवण्याचा आदेश दिला होता.

दरम्यान, कोरेगाव येथील जयपेरसा आदिवासी मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व पदाधिकाऱ्यांनी २० ऑगस्ट २०२४ रोजी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली होती. त्या अनुषंगाने संबंधित पाचही सदस्य अपात्र ठरल्याने ग्रामपंचायतीत पोटनिवडणुकीची प्रक्रिया सुरू करण्यात आली.

या पोटनिवडणुकीत ममता मनोहर आळे, खुशाल वैद्यनाथ आळे, सुधाकर दामा मडावी, अर्चना मिनेश मरस्कोल्हे आणि सीमा योगेश्वर आळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. मात्र, विहित कालावधीत त्यांच्या विरोधात एकही अर्ज दाखल न झाल्याने पाचही उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. त्यामुळे हा विषय सध्या चर्चेचा ठरला आहे.

तथापि, या निकालाची अधिकृत घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही.

Related to this topic: