Breaking News
  • विदर्भात गेल्या बारा दिवसांपासून पावसाचा खंड
  • Gadchiroli : जपतलाई घटनेतील दोषींवर कठोर कारवाई; ५१३ आश्रमशाळांचे थर्ड पार्टी ऑडिट
  • कुंभमेळ्यासाठी १३ प्रमुख आखाड्यांसह धार्मिक संस्थांनाही पायाभूत सुविधांसाठी १५ लाखांपर्यंत निधी मिळणार
  • दोडामार्ग पाळये गावात हत्तींचा धुमाकूळ; माड, व केळी बागा उद्ध्वस्त
  • Nashik : आदित्य ठाकरे आज नाशिक दौऱ्यावर
  • शिवप्रतिष्ठान युवाच्यावतीने दीप प्रज्वलन करून दीप अमावस्या साजरी
  • Ratnagiri : रत्नागिरीतल्या पालीत वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश
  • Ahilyanagar : कॅफेच्या नावाखाली गैरकृत्य, श्रीरामपूरमध्ये पोलिसांची 4 कॅफेवर छापेमारी
  • Nanded : झेंडूच्या फुलशेतीतून शेतकऱ्याला मिळाला आर्थिक आधार

होम > आपले शहर > विदर्भ > गडचिरोली

Forest Rights Act

मृत वनहक्क पट्टेधारकांच्या वारसांची नावे नोंदविण्यासाठी विशेष शिबिर घेण्याची मागणी

कुरखेडा तालुक्यात अनेक शेतकऱ्यांना वनहक्क पट्टे मिळाले असले तरी अनेक पट्टेधारकांचे निधन झाल्यानंतर त्यांच्या वारसांची नावे अद्यापही संबंधित वनहक्क पट्ट्यांवर नोंदविण्यात आलेली नाहीत.


मृत वनहक्क पट्टेधारकांच्या वारसांची नावे नोंदविण्यासाठी विशेष शिबिर घेण्याची मागणी

Forest Rights Act |

कुरखेडा : कुरखेडा तालुक्यात अनेक शेतकऱ्यांना वनहक्क पट्टे मिळाले असले तरी अनेक पट्टेधारकांचे निधन झाल्यानंतर त्यांच्या वारसांची नावे अद्यापही संबंधित वनहक्क पट्ट्यांवर नोंदविण्यात आलेली नाहीत. त्यामुळे वारसांना विविध शासकीय कामांसाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे.

या पार्श्वभूमीवर महसूल प्रशासन व तहसील कार्यालयाच्या माध्यमातून मृत वनहक्क पट्टेधारकांच्या वारसांची नावे वनहक्क पट्ट्यांवर नोंदविण्यासाठी कुरखेडा येथे विशेष शिबिर आयोजित करण्यात यावे, अशी मागणी युवती सेनेच्या वतीने करण्यात आली आहे.

यासंदर्भातील निवेदन उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांना देण्यात आले. यावेळी युवती सेना जिल्हाप्रमुख प्रा. उमा चंदेल यांच्या नेतृत्वाखाली माधुरी चौधरी, लताबाई सहारे, रमशीला गुवाल, रजनी शाह, उषा जांभळे, मेना कपुरेडिया, गौरी कपुरे, इंदिरा कपुरेडिया, बेरा नेताम, नंदेश्वरी सहाळा, तिजिया दूधमोगरा, मोहन सहाळा, कुंभकर्ण डोंगरी, रामप्रसाद सिंगारे, भजन तसेच इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

युवती सेनेने प्रशासनाने या मागणीची तातडीने दखल घेऊन विशेष शिबिराचे आयोजन करावे, जेणेकरून वारसांची नावे वेळेत नोंदवून लाभार्थ्यांची गैरसोय दूर होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

Related to this topic: