तालुक्यातील चिखली (रामनाथ) येथे कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकर्याने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.
दारव्हा (Farmer Suicide) : तालुक्यातील चिखली (रामनाथ) येथे कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकर्याने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. रामदास बापूराव सरोदे असे मृत शेतकर्याचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रामदास सरोदे हे गेल्या काही दिवसांपासून कर्जाचा वाढता बोजा, पिकांचे नुकसान आणि आर्थिक अडचणींमुळे त्रस्त होते. या सततच्या संकटांमुळे त्यांनी आपल्या शेतातच गळफास घेऊन जीवन संपवले.
या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून सर्वत्र शोककळा पसरली आहे. शेतकरी आत्महत्यांच्या वाढत्या घटनांमुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. दरवर्षी कर्जबाजारीपणा व नापिकाrमूळे अनेक शेतकरी टोकाचे पाऊल उचलत असल्याचे चित्र आहे.मृतकाच्या पश्चात पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे.