Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > आपले शहर > मराठवाडा > परभणी

Farmer Fraud

परभणीत व्यापाऱ्याने शेतकऱ्यांना लावला साडेपाच कोटींचा चुना; धान्य खरेदी करून पैसे न देता फरार

परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यातील एरंडेश्वर परिसरात शेतकऱ्यांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे.


परभणीत व्यापाऱ्याने शेतकऱ्यांना लावला साडेपाच कोटींचा चुना धान्य खरेदी करून पैसे न देता फरार

५.५६ कोटी रुपयांच्या फसवणुकीप्रकरणी पूर्णा पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा; १०० ते १५० शेतकरी आर्थिक फसवणुकीचे बळी

परभणी : परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यातील एरंडेश्वर परिसरात शेतकऱ्यांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. शेतकऱ्यांचा विश्वास संपादन करून विविध प्रकारचा शेतमाल खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्याने त्याची रक्कम न देता फरार झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी ५ कोटी ५६ लाख ४९ हजार रुपयांच्या फसवणुकीचा गुन्हा पूर्णा पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आला आहे.

या प्रकरणी रामप्रसाद साहेबराव काळे यांनी फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार शेख हमीद उर्फ अमित शेख सरू आणि शेख सरू शेख बालेसार यांनी झिरोफाटा येथील जय किसान ट्रेडिंग कंपनी या आडत दुकानाच्या माध्यमातून १ ऑक्टोबर २०२३ ते ३० मे २०२६ या कालावधीत शेतकऱ्यांकडून हळद, हरभरा, सोयाबीन, गहू आणि तूर यांसह विविध धान्याची खरेदी केली.

खरेदी केलेल्या शेतमालाची एकूण किंमत ५ कोटी ५६ लाख ४९ हजार रुपये असून, शेतकऱ्यांनी वारंवार मागणी करूनही संबंधित व्यापाऱ्यांनी पैसे देण्यास टाळाटाळ केली. त्यानंतर दोन्ही व्यापारी गाव आणि घर सोडून पसार झाले असून त्यांचे मोबाईल फोनही बंद असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

फसवणुकीचा प्रकार उघडकीस आल्यानंतर परिसरातील सुमारे १०० ते १५० शेतकऱ्यांनी पूर्णा पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. या प्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सपोनि. पाटील करत आहेत.

Related to this topic: