Breaking News
  • ३१ जिल्ह्यांना पावसाचा इशारा; मान्सून राज्याच्या दारात.
  • पुणेकरांसाठी आनंदाची बातमी – हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोच्या पहिल्या टप्प्याच्या उद्घाटनाची तयारी सुरू झाली आहे.
  • अमरावती मनपाची मोठी कारवाई – थकीत कर वसुलीसाठी दोन मालमत्ता सील करण्यात आल्या. प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे.
  • मुंबईतील विकासकामांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आढावा घेणार – पावसाळ्यापूर्वी महापालिकेच्या विविध प्रकल्पांची पाहणी होणार आहे.
  • पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळ अटकेत – राजस्थानमधून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. तो अनेक महिन्यांपासून फरार होता.
  • अकरावी प्रवेश प्रक्रिया (FYJC) – दुसऱ्या नियमित प्रवेश फेरीचे वेळापत्रक जाहीर; ६ जूनपासून विद्यार्थ्यांना पसंतीक्रम बदलण्याची संधी मिळणार.
  • महाराष्ट्रातील पावसाचा अंदाज – हवामान विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार राज्यातील बहुतांश भागात यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता व्यक्त.
  • कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती, कमकुवत रुपया आणि पावसाच्या अनिश्चिततेमुळे RBI ने महागाईचा अंदाज वाढवला.
  • नैर्ऋत्य मान्सून केरळमध्ये दाखल; महाराष्ट्रात पुढील काही दिवसांत प्रगतीची शक्यता, मात्र एल निनोचा प्रभाव चिंतेचा विषय.

होम > आपले शहर > मराठवाडा > परभणी

परभणीत लोखंडी औताचा विजेच्या तारेला स्पर्श; विजेचा धक्का लागून शेतकऱ्याचा मृत्यू

शेतातून लोखंडी औत घेऊन घरी जात असताना औताच्या दांडीचा रस्त्यावरील लोंबकळलेल्या विजेच्या तारेला स्पर्श झाल्याने विजेचा धक्का बसून एका शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.


परभणीत लोखंडी औताचा विजेच्या तारेला स्पर्श विजेचा धक्का लागून शेतकऱ्याचा मृत्यू

Electric Shock |

सेलू तालुक्यातील म्हाळसापूर येथील घटना; लोंबकळलेल्या वीजतारेमुळे दुर्घटना

परभणी (Electric Shock) : सेलू तालुक्यातील म्हाळसापूर येथे शेतातून लोखंडी औत घेऊन घरी जात असताना औताच्या दांडीचा रस्त्यावरील लोंबकळलेल्या विजेच्या तारेला स्पर्श झाल्याने विजेचा धक्का बसून एका शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (५ जून) दुपारी सुमारे १.३० वाजण्याच्या सुमारास घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, म्हाळसापूर येथील आसाराम भीमराव आवटे (वय ३५) हे आपल्या शेतातून लोखंडी औत घेऊन घराकडे परतत होते. त्यांचे शेत म्हाळसापूर-पाथरी मार्गालगत आहे. दरम्यान, रस्त्यावर लोंबकळत असलेल्या विजेच्या तारेला औताच्या लोखंडी दांडीचा स्पर्श झाला. त्यामुळे विद्युत प्रवाह औतामध्ये उतरल्याने आसाराम आवटे यांना जोरदार विजेचा धक्का बसला.

घटनेची माहिती मिळताच संबंधित रोहित्रावरील वीजपुरवठा तातडीने खंडित करण्यात आला. त्यानंतर ग्रामस्थांच्या मदतीने आवटे यांना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले.

सायंकाळी सुमारे ६ वाजता देऊळगाव गात प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय लोया यांनी शवविच्छेदन केले. त्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. त्यांच्या पार्थिवावर म्हाळसापूर येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

या प्रकरणी मयताचे भाऊ पांडुरंग भीमराव आवटे यांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी कलम १९४ अन्वये आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

मृत आसाराम आवटे यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी आणि चार मुली असा परिवार आहे. या दुर्दैवी घटनेमुळे म्हाळसापूरसह परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक अरुण नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार गुलाब राठोड करीत आहेत.

Related to this topic: