Breaking News
  • ३१ जिल्ह्यांना पावसाचा इशारा; मान्सून राज्याच्या दारात.
  • पुणेकरांसाठी आनंदाची बातमी – हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोच्या पहिल्या टप्प्याच्या उद्घाटनाची तयारी सुरू झाली आहे.
  • अमरावती मनपाची मोठी कारवाई – थकीत कर वसुलीसाठी दोन मालमत्ता सील करण्यात आल्या. प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे.
  • मुंबईतील विकासकामांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आढावा घेणार – पावसाळ्यापूर्वी महापालिकेच्या विविध प्रकल्पांची पाहणी होणार आहे.
  • पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळ अटकेत – राजस्थानमधून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. तो अनेक महिन्यांपासून फरार होता.
  • अकरावी प्रवेश प्रक्रिया (FYJC) – दुसऱ्या नियमित प्रवेश फेरीचे वेळापत्रक जाहीर; ६ जूनपासून विद्यार्थ्यांना पसंतीक्रम बदलण्याची संधी मिळणार.
  • महाराष्ट्रातील पावसाचा अंदाज – हवामान विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार राज्यातील बहुतांश भागात यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता व्यक्त.
  • कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती, कमकुवत रुपया आणि पावसाच्या अनिश्चिततेमुळे RBI ने महागाईचा अंदाज वाढवला.
  • नैर्ऋत्य मान्सून केरळमध्ये दाखल; महाराष्ट्रात पुढील काही दिवसांत प्रगतीची शक्यता, मात्र एल निनोचा प्रभाव चिंतेचा विषय.

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

हिंगोलीकरांचा प्रवास होणार प्रदूषणमुक्त! आगारात ‘ई-शिवाई’ बसचे दिमाखात उद्घाटन; २१ पैकी ४ बसेस दाखल

हिंगोलीकरांसाठी अत्यंत आनंदाची आणि अभिमानास्पद बातमी आहे.


हिंगोलीकरांचा प्रवास होणार प्रदूषणमुक्त आगारात ‘ई-शिवाई’ बसचे दिमाखात उद्घाटन २१ पैकी ४ बसेस दाखल

E-Shivai Electric Buses |

हिंगोली (E-Shivai Electric Buses) : हिंगोलीकरांसाठी अत्यंत आनंदाची आणि अभिमानास्पद बातमी आहे. एसटी महामंडळाच्या ताफ्यात आधुनिक आणि पर्यावरणपूरक अशा ‘ई-शिवाई’ बसेस दाखल झाल्या असून, आज १ जून २०२६ रोजी हिंगोली आगारात या बसेसचे भव्य उद्घाटन करण्यात आले. हिंगोली जिल्ह्यासाठी एकूण २१ ई-बसेस मंजूर झाल्या असून, त्यापैकी पहिल्या टप्प्यातील ४ बसेस आगारात सुखरूप दाखल झाल्या आहेत.

या आधुनिक ई-शिवाई बसचे लोकार्पण जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून करण्यात आले. याप्रसंगी शहर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. आनंद बनसोडे, सामाजिक कार्यकर्ते श्री. अशोक धामणे, आगार व्यवस्थापक श्री. किशोर महाजन, स्थानकप्रमुख श्रीमती सुनिता गोरे आणि वाहतूक निरीक्षक श्री. फिरोज शेख यांची प्रमुख उपस्थिती होती.

दीड तासात चार्जिंग, ३०० किमीचा सुसाट प्रवास!
या ई-बसेसची वैशिष्ट्ये सांगताना आगार व्यवस्थापनाने माहिती दिली की, ही बस केवळ दीड तासात (१.५ तास) पूर्ण चार्ज होते. एकदा पूर्ण चार्ज झाल्यानंतर ही बस तब्बल ३०० किलोमीटरपर्यंतचा प्रवास विनाखंड करू शकते. यामुळे प्रवाशांचा प्रवास गतिमान, आरामदायी आणि प्रदूषणमुक्त होणार आहे.

या महत्त्वाच्या मार्गांवर धावणार बसेस
हिंगोली आगारातून या पहिल्या टप्प्यातील बसेस खालील प्रमुख मार्गांवर प्रवाशांच्या सेवेत धावणार आहेत :

  • हिंगोली ते छत्रपती संभाजीनगर
  • हिंगोली ते नांदेड
  • हिंगोली ते अकोला
  • हिंगोली ते परळी
  • हिंगोली ते रिसोड

या सोहळ्याला दिगंबर दराडे, सचिन पारीख, वैभव वरवंटे, मुकेश ठोंबरे यांच्यासह ‘ईव्ही ट्रान्स’ व ‘एसव्ही ट्रान्स’ कंपनीचे प्रतिनिधी श्री. कसबे, संकेत पवार, सिद्धेश्वर केंद्रे, श्री. वलेकर आणि चौधरी यांच्यासह आगार व वाहतूक विभागाचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

“हिंगोली आगारात दाखल झालेल्या या ई-बसेसमुळे प्रवाशांना आधुनिक आणि आरामदायी सेवा मिळणार आहे. प्रदूषण कमी करण्यासाठी आणि प्रवाशांचा वेळ वाचवण्यासाठी या बसेस मैलाचा दगड ठरतील,” असा विश्वास याप्रसंगी उपस्थित अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. नवीन ई-बस सुरू झाल्यामुळे हिंगोलीकरांमधून अत्यंत समाधान व्यक्त होत आहे.

Related to this topic: