Breaking News
  • ३१ जिल्ह्यांना पावसाचा इशारा; मान्सून राज्याच्या दारात.
  • पुणेकरांसाठी आनंदाची बातमी – हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोच्या पहिल्या टप्प्याच्या उद्घाटनाची तयारी सुरू झाली आहे.
  • अमरावती मनपाची मोठी कारवाई – थकीत कर वसुलीसाठी दोन मालमत्ता सील करण्यात आल्या. प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे.
  • मुंबईतील विकासकामांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आढावा घेणार – पावसाळ्यापूर्वी महापालिकेच्या विविध प्रकल्पांची पाहणी होणार आहे.
  • पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळ अटकेत – राजस्थानमधून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. तो अनेक महिन्यांपासून फरार होता.
  • अकरावी प्रवेश प्रक्रिया (FYJC) – दुसऱ्या नियमित प्रवेश फेरीचे वेळापत्रक जाहीर; ६ जूनपासून विद्यार्थ्यांना पसंतीक्रम बदलण्याची संधी मिळणार.
  • महाराष्ट्रातील पावसाचा अंदाज – हवामान विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार राज्यातील बहुतांश भागात यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता व्यक्त.
  • कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती, कमकुवत रुपया आणि पावसाच्या अनिश्चिततेमुळे RBI ने महागाईचा अंदाज वाढवला.
  • नैर्ऋत्य मान्सून केरळमध्ये दाखल; महाराष्ट्रात पुढील काही दिवसांत प्रगतीची शक्यता, मात्र एल निनोचा प्रभाव चिंतेचा विषय.

होम > आपले शहर > विदर्भ > नागपूर

जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद

जिल्हाधिकाऱ्यांची कन्हान आणि बोरडा (गणेशी) परिसराला भेट

Collector Kumar Ashirwad: जिल्हाधिकारी मा. कुमार आशीर्वाद यांनी बोरडा (गणेशी) येथील राईस मिल व कन्हान येथील लक्ष्मी कृषी सेवा केंद्रास भेट दिली. कंपनीचे संचालक, शेतकरी समस्या व आपत्ती व्यवस्थापन


जिल्हाधिकाऱ्यांची कन्हान आणि बोरडा गणेशी परिसराला भेट

Collector Kumar Ashirwad |

कन्हान (Collector Kumar Ashirwad) : जिल्हाधिकारी मा. कुमार आशीर्वाद यांनी बोरडा (गणेशी) येथील अंतरंग शेतकरी उत्पादक कंप नीच्या राईस मिल ला भेट, बोरडा-बोरी (राणी) शिव पांधण रस्ता कामाची पाहणी, कन्हान येथील लक्ष्मी कृषी सेवा केंद्रास अचानकपणे भेट दिल्यावर नगर परिषद कन्हान येथे नैसर्गिक आपत्तीबाबत आढावा सभा घेऊन नैसर्गिक आपत्ती आल्यास तातडीने प्रति साद देण्यासाठी यंत्रणांची तयारी, समन्वय आणि मदत कार्य अधिक प्रभावी करण्याबाबत चर्चा करून प्रशास न अधिक सज्ज आणि सतर्क राहावे, तसेच नागरिकां च्या सुरक्षे ला सर्वोच्च प्राधान्य द्यावे, अशा सूचनाही मा. जिल्हाधिकाऱ्यांनी (Collector Kumar Ashirwad) दिल्या.

मंगळवार (दि.२) जुन ला महाराष्ट्र शासन कृषी विभाग व आत्मा यांच्या संयुक्त विद्यमानाने झालेल्या कामांची पाहणी करण्याकरिता जिल्हाधिकारी नागपुर मा. कुमार आशीर्वाद (Collector Kumar Ashirwad) यांनी बोरडा (गणेशी) येथील अंतरंग शेतकरी उत्पादक कंपनीने स्थापन केलेल्या राईस मिल ला भेट देऊन, कंपनीचे संचालक अशोक शनिवारी, स्वप्निल माटे यांच्याशी चर्चा करून, कंपनी बाबत इथंबुत माहिती घेतली व राईस मिल ची पूर्ण पाहणी करून, शेतकरी बांधवांना शेतकरी बांधवांना, असणाऱ्या अडचणी समस्या याबाबत देखील माहिती घेतली, व कंपनीतील संचालक सदस्य यांच्या बरोबर संवाद साधुन, आवश्यक असणाऱ्या निधीबाबत मंजुरी देखिल देण्यात येईल असे आश्वासन दिले.

या भेटीत त्यांनी शेतकरी उत्पादन प्रक्रिया, स्थानिक स्तरावरील शेती आधारित उद्योग आणि उत्पादन वाढीच्या संधी बाबत तालुका व जिल्हा कृषी विभागा अंतर्गत उपस्थि त अधिकारी कर्मचा-यांशी देखील संवाद साधला. या वेळी आत्मा अंतर्गत श्रीमती पल्लवी तलमळे, मा. उप विभागीय कृषी अधिकारी श्रीमती ग्रीष्मा डेहणे, तालु का कृषी अधिकारी मा. राकेश वसु यांनी शेतकरी बांध वांची कृषी सेवा केंद्रांपासुन फसवणुक होऊ नये, या बाबत कोणत्या प्रकारे सतर्कता बाळगली आहे याबाब त माहिती दिली. त्यानंतर मुख्यमंत्री बळीराजा शेत पांधण योजने अंतर्गत सुरू असलेल्या बोरडा-बोरी (राणी) शिवपांधण रस्ता कामाची प्रत्यक्ष पाहणी करू न कामाच्या प्रगतीचा आढावा घेतला आणि आवश्यक त्या ठिकाणी दर्जा व गती राखण्याच्या सूचना दिल्या.

नगरपरिषद कन्हान येथे आपत्ती व्यवस्थापन विशेष बैठक

खरीप हंगाम अगदी तोंडावर आले असल्या कारणाने शेतकरी बांधवांची, बियाण्यापासुन ते खते औषधे, घेण्याची लगबग चालु आहे, हे लक्षात घेऊन मा. जिल्हाधिकारी यांनी कन्हान येथील लक्ष्मी कृषी सेवा केंद्र संचालक बबलु काशीराम गडे यांच्या कृषी सेवा केंद्रास अचानकपणे भेट देऊन, स्टॉक बुक, काही लिंकिंग होते का, कृषी विभागाच्या सतर्कतेबाबत माहि ती घेतली, यावेळी गुण नियंत्रण अधिकारी पारशिवनी एस पी कुबडे यांनी तालुक्यातील खताचा, बी- बिया ण्याचा, औषधांच्या स्टॉक बाबत माहिती दिली व कृषी सेवा केंद्रात निविष्ठा खरेदी करण्यास आलेल्या शेतक री बांधवासी मा. जिल्हाधिकारी  यांनी प्रत्यक्ष संवाद साधला.

तदंतर नगरपरिषद कन्हान येथे नैसर्गिक आपत्ती बाबत आढावा सभा घेऊन नैसर्गिक आपत्ती आल्यास तातडीने प्रतिसाद देण्यासाठी यंत्रणांची तया री, समन्वय आणि मदत कार्य अधिक प्रभावी करण्या बाबत चर्चा करण्यात आली. प्रशासन अधिक सज्ज आणि सतर्क राहावे, तसेच नागरिकांच्या सुरक्षेला सर्वो च्च प्राधान्य द्यावे, अशा सूचनाही मा. जिल्हाधिकाऱ्यां नी दिल्या. सदर दौऱ्यात उपविभागिय अधिकारी राम टेक मा. प्रियेश महाजन, तहसिलदार पारशिवनी मा. सुरेश वाघचौरे, गटविकास अधिकारी मा. सुभाष जाधव, वनविभाग अधिकारी, आरोग्य विभागाचे अधि कारी, नगरप

Related to this topic: