Breaking News
  • विदर्भात गेल्या बारा दिवसांपासून पावसाचा खंड
  • Gadchiroli : जपतलाई घटनेतील दोषींवर कठोर कारवाई; ५१३ आश्रमशाळांचे थर्ड पार्टी ऑडिट
  • कुंभमेळ्यासाठी १३ प्रमुख आखाड्यांसह धार्मिक संस्थांनाही पायाभूत सुविधांसाठी १५ लाखांपर्यंत निधी मिळणार
  • दोडामार्ग पाळये गावात हत्तींचा धुमाकूळ; माड, व केळी बागा उद्ध्वस्त
  • Nashik : आदित्य ठाकरे आज नाशिक दौऱ्यावर
  • शिवप्रतिष्ठान युवाच्यावतीने दीप प्रज्वलन करून दीप अमावस्या साजरी
  • Ratnagiri : रत्नागिरीतल्या पालीत वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश
  • Ahilyanagar : कॅफेच्या नावाखाली गैरकृत्य, श्रीरामपूरमध्ये पोलिसांची 4 कॅफेवर छापेमारी
  • Nanded : झेंडूच्या फुलशेतीतून शेतकऱ्याला मिळाला आर्थिक आधार

होम > आपले शहर > उत्त्तर महाराष्ट्र

Dhule Accident

अजमेरहून परतणाऱ्या नाशिकच्या भाविकांच्या कारचा धुळेत भीषण अपघात; दोघांचा मृत्यू, पाच जण गंभीर

अजमेर येथे देवदर्शन करून नाशिककडे परतणाऱ्या भाविकांच्या कुटुंबावर धुळे जिल्ह्यात काळाने घाला घातला.


अजमेरहून परतणाऱ्या नाशिकच्या भाविकांच्या कारचा धुळेत भीषण अपघात दोघांचा मृत्यू पाच जण गंभीर

Dhule Accident |

मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील शिरपूर फाट्याजवळ इनोव्हा दुभाजक तोडून समोरून येणाऱ्या ट्रकवर आदळली; कारचा चक्काचूर

धुळे : अजमेर येथे देवदर्शन करून नाशिककडे परतणाऱ्या भाविकांच्या कुटुंबावर धुळे जिल्ह्यात काळाने घाला घातला. मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील शिरपूर फाट्याजवळ झालेल्या भीषण अपघातात इनोव्हा कारमधील दोन जणांचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

प्राथमिक माहितीनुसार, नाशिकमधील एक कुटुंब इनोव्हा कारने अजमेर येथे देवदर्शनासाठी गेले होते. दर्शन आटोपून परतीचा प्रवास सुरू असताना शिरपूर फाट्याजवळ भरधाव वेगातील कारवरील चालकाचे नियंत्रण अचानक सुटले. त्यामुळे कार अनियंत्रित होत महामार्गावरील दुभाजक तोडून विरुद्ध दिशेच्या मार्गिकेत घुसली.

यानंतर समोरून येणाऱ्या मालवाहू ट्रकला इनोव्हा कारने जोरदार धडक दिली. धडक इतकी तीव्र होती की, कारचा अक्षरशः चक्काचूर झाला. अपघाताचा मोठा आवाज ऐकून स्थानिक नागरिक आणि महामार्ग पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले.

पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने कारमध्ये अडकलेल्या जखमी प्रवाशांना बाहेर काढून तातडीने रुग्णालयात हलवले. सर्व जखमींवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळाली आहे.

या भीषण अपघातामुळे मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. त्यानंतर पोलिसांनी क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त वाहने रस्त्याच्या बाजूला हटवून वाहतूक सुरळीत केली.

देवदर्शन करून आनंदाने घरी परतणाऱ्या नाशिकच्या कुटुंबावर ओढवलेल्या या दुर्दैवी दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Related to this topic: