Breaking News
  • राज्यात मान्सूनची संथ वाटचाल, हवामान विभागाचा शेतकऱ्यांना पेरणीत घाई न करण्याचा सल्ला
  • तुळजाभवानी मंदिर परिसरात थुंकणाऱ्या १८ जणांवर कारवाई;९ हजारांचा दंड वसूल
  • शेगाव शहरात लाखो भाविकांच्या आरोग्याशी खेळ,भेसळयुक्त खाद्यपदार्थांची सर्रास विक्री
  • रत्नागिरी आरटीओच्या ‘वायुवेग पथका’कडून वर्षभरात ३ कोटी ३३ लाखांचा दंड वसूल
  • आमच्या परिसरातील नळाला पाणी का सोडलं नाही...? असा जाब ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला विचारला असता, कर्मचाऱ्याने गावातील लोकांना जमवून गावातीलच पारधी वस्तीवर हल्ला करून जवळपास 11 घरांची तोडफोड केली
  • मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्तक्षेपानंतर नाशिक विधान परिषदेच्या निवडणुकीतून गोकुळ गिते माघार घेणार असल्याची शक्यता आहे.
  • मुंबईतील गगनचुंबी टॉवर आणि झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या नागरिकांसाठी एकच दर न ठेवता आता वेगवेगळा रेडीरेकनर दर आकारला जाणार आहे.
  • वाशिममध्ये शिवशाही बसचा अपघात, चालकाचे नियंत्रण सुटल्यानं घडला अनर्थ
  • हिंगोलीच्या कळमनुरी मध्ये गॅस एजन्सीच्या बाहेर ग्राहकांनी गोंधळ घातला आहे

होम > आपले शहर > विदर्भ > बुलडाणा

जिल्ह्यात डीएपी खतांचा तुटवडा; क्रांतिकारी शेतकरी संघटनेचा कृषी विभागाला घेराव

खरीप हंगामाच्या तोंडावर बुलढाणा जिल्ह्यात डीएपीसह इतर रासायनिक खतांचा तीव्र तुटवडा निर्माण झाल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे.


जिल्ह्यात डीएपी खतांचा तुटवडा क्रांतिकारी शेतकरी संघटनेचा कृषी विभागाला घेराव

DAP Fertilizer Shortage |

‘बफर स्टॉक’ तातडीने खुला करण्याची मागणी; दोन दिवसांत निर्णय न झाल्यास आंदोलनाचा इशारा

चिखली (DAP Fertilizer Shortage) : खरीप हंगामाच्या तोंडावर बुलढाणा जिल्ह्यात डीएपीसह इतर रासायनिक खतांचा तीव्र तुटवडा निर्माण झाल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. कृषी सेवा केंद्रांवर खतांचा साठा संपुष्टात आल्याने शेतकऱ्यांना दिवसभर रांगेत उभे राहूनही रिकाम्या हाताने परतावे लागत आहे. काही ठिकाणी खतांच्या टंचाईचा गैरफायदा घेत चढ्या दराने विक्री होत असल्याच्या तक्रारीही समोर आल्या आहेत.

या पार्श्वभूमीवर क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने जिल्हा परिषदेत धडक देत कृषी विकास अधिकाऱ्यांना घेराव घातला. यावेळी विनायक सरनाईक, डॉ. ज्ञानेश्वर टाले, अमोल मोरे, राम अंभोरे यांच्यासह चिखली व मेहकर तालुक्यातील शेकडो शेतकरी उपस्थित होते.

शेतकऱ्यांना आवश्यक असलेले डीएपी खत उपलब्ध होत नसल्याने पेरणीच्या तयारीवर परिणाम होत असल्याचे शिष्टमंडळाने निदर्शनास आणून दिले. खतांचा पुरवठा कधी होणार याबाबत प्रशासनाकडून केवळ आश्वासने दिली जात असल्याचा आरोप करत संघटनेने तीव्र नाराजी व्यक्त केली.

काळाबाजार रोखण्याची मागणी

यावेळी विनायक सरनाईक व डॉ. टाले यांनी काही विक्रेत्यांकडून डीएपी खताची अवाजवी दराने विक्री होत असल्याच्या तक्रारी अधिकाऱ्यांसमोर मांडल्या. खतांच्या कृत्रिम टंचाईमुळे शेतकऱ्यांची आर्थिक लूट होत असल्याचा आरोप करत अशा प्रकारांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.

दरम्यान, कृषी अधिकाऱ्यांशी चर्चा सुरू असतानाच रविकांत तुपकर यांनी जिल्हाधिकारी प्रवीण देवरे यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधून जिल्ह्यासाठी राखीव ठेवलेला डीएपी खताचा ‘बफर स्टॉक’ तातडीने खुला करण्याची मागणी केली.

प्रशासनाकडे विविध मागण्या

क्रांतिकारी शेतकरी संघटनेने सादर केलेल्या निवेदनात खालील प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत :

  • डीएपी खताचा बफर स्टॉक तातडीने खुला करावा.
  • चिखली तालुक्याचा खताचा कोटा वाढवावा.
  • शासनमान्य दरात पारदर्शक पद्धतीने खत वितरण करावे.
  • खतांचा काळाबाजार रोखण्यासाठी कठोर कारवाई करावी.
  • प्रत्येक तालुक्याला मिळालेल्या खतसाठ्याची माहिती सार्वजनिक करावी.
  • पुढील १५ दिवसांसाठी नियमित पुरवठ्याचे नियोजन जाहीर करावे.

दोन दिवसांत निर्णय न झाल्यास आंदोलन

यावेळी रविकांत तुपकर यांनी प्रशासनाला इशारा देताना सांगितले की, शेतकऱ्यांच्या मागण्यांवर दोन दिवसांत सकारात्मक निर्णय घेण्यात यावा. डीएपी खताचा बफर स्टॉक खुला करून आवश्यक खतांचा पुरवठा तातडीने करण्यात यावा. अन्यथा चिखली आणि बुलढाणा येथील कृषी विभागाच्या कार्यालयांवर शेतकऱ्यांसह तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.

“शेतकऱ्यांची आर्थिक लूट आणि खतांचा कृत्रिम तुटवडा अजिबात सहन केला जाणार नाही. प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात,” असा इशाराही त्यांनी दिला.

चिखली तालुक्यासाठी स्वतंत्र कोट्याची मागणी

क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते विनायक सरनाईक यांनी चिखली तालुक्यातील लागवडीचे क्षेत्र लक्षात घेऊन डीएपी खताचा अतिरिक्त कोटा देण्याची मागणी केली. तसेच बफर स्टॉकमधून इतर तालुक्यांच्या तुलनेत चिखली तालुक्याला अधिक प्रमाणात खत उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली. याबाबत कृषी विभागाने सकारात्मक भूमिका घेत आवश्यक प्रमाणात खत उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिल्याचे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

Related to this topic: