Breaking News
  • सुवेंदू अधिकारी होणार बंगालचे नवे मुख्यमंत्री; रूपा गांगुली यांची उपमुख्यमंत्रीपदी नियुक्ती
  • 'थलपथी' विजयला मिळाले बहुमत; मुख्यमंत्रीपदाचा मार्ग मोकळा!
  • 'निदा खान प्रकरणात इम्तियाज जलील यांना सहआरोपी करा', मंत्री संजय शिरसाट यांची मागणी
  • विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह पाऊस, विजांचा कडकडाट आणि काही ठिकाणी गारपिटीचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
  • रितेश देशमुख दिग्दर्शित ‘राजा शिवाजी’ या मराठी चित्रपटाने 50 कोटींचा टप्पा ओलांडत मोठे यश मिळवले आहे आणि 75 कोटींकडे वाटचाल सुरू आहे.
  • राज्यातील सुमारे 16 लाख विद्यार्थ्यांसाठी दहावीचा निकाल आज जाहीर करण्यात आला असून विद्यार्थी अधिकृत वेबसाईट आणि डिजीलॉकरवर निकाल पाहू शकतात.
  • नांदेड ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल 4,796 धारदार शस्त्रांचा साठा जप्त केला आहे. तलवारी, गुप्ती आणि चाकू यांचा मोठा साठा सापडल्याने राज्यात खळबळ उडाली आहे. ही आतापर्यंतची सर्वात मोठी एकदिवसीय शस्त्र जप्ती मानली जात आहे
  • महाराष्ट्र SSC 2026 निकालात लातूर विभागाने पुन्हा एकदा चांगली कामगिरी केली आहे. राज्यातील 179 विद्यार्थ्यांनी 100% गुण मिळवले असून त्यापैकी सर्वाधिक 104 विद्यार्थी लातूर विभागातील आहेत.
  • गडचिरोली जिल्ह्यातील APR सॅक प्लांटवरील 72 दिवसांचे आंदोलन अखेर संपले. कामगारांच्या नोकऱ्या सुरक्षित ठेवत आर्थिक भरपाईसह करार झाला आहे.

होम > आपले शहर > विदर्भ > अकोला

धन्य तो पाणीपुरवठा विभाग! पातूरमध्ये नळावाटे वाहतेय 'नाली'चे पाणी; नागरिकांचा संताप व्यक्त

पातूर येथील नगर परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाचा कारभार सध्या कमालीचा रामभरोसे झाला असून, शहरातील रामनगर आणि रेस्ट हाऊस परिसरातील नागरिक भीषण समस्यांना तोंड देत आहेत.


धन्य तो पाणीपुरवठा विभाग पातूरमध्ये नळावाटे वाहतेय नालीचे पाणी नागरिकांचा संताप व्यक्त

Contaminated Water Supply |

नळाला येणाऱ्या पाण्यापेक्षा नालीतील पाणी बरं; संतप्त नागरिकांचा पालिका प्रशासनावर घणाघाती आरोप

पातूर (Contaminated Water Supply) : पातूर येथील नगर परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाचा कारभार सध्या कमालीचा रामभरोसे झाला असून, शहरातील रामनगर आणि रेस्ट हाऊस परिसरातील नागरिक भीषण समस्यांना तोंड देत आहेत. गेल्या काही दिवसांपासून या भागात अत्यंत गढूळ आणि दुर्गंधीयुक्त पाण्याचा पुरवठा होत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. प्रशासनाच्या या निष्काळजीपणामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी, "नळाला येणाऱ्या घाण पाण्यापेक्षा नालीतील पाणी चांगले," अशा शब्दांत आपला संताप व्यक्त केला आहे.

नेमकी समस्या काय?

मिळालेल्या माहितीनुसार, रामनगर आणि विश्रामगृह (रेस्ट हाऊस) परिसरात मागील अनेक दिवसांपासून नळाद्वारे पुरवले जाणारे पाणी हे पिण्यायोग्य राहिलेले नाही. हे पाणी इतके गढूळ आणि काळपट आहे की त्याचा वापर साध्या वापरासाठी करणेही कठीण झाले आहे. या दूषित पाण्यामुळे परिसरात साथीचे आजार पसरण्याची भीती निर्माण झाली असून, लहान मुले व वृद्धांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

प्रशासनाचे दुर्लक्ष

पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिन्यांमध्ये काही ठिकाणी गळती असल्याने किंवा नालीतील सांडपाणी जलवाहिनीमध्ये मिसळत असल्याने हा प्रकार घडत असल्याचे बोलले जात आहे. मात्र, याबाबत तक्रारी करूनही नगर परिषदेचा पाणीपुरवठा विभाग याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिक रहिवाशांनी केला आहे.

नागरिकांचा आक्रमक पवित्रा

नगर परिषदेला वेळेवर पाणीपट्टी भरूनही जर नळाला गटारासारखे घाण पाणी येणार असेल, तर अशा प्रशासनाचा उपयोग काय? असा सवाल नागरिक विचारत आहेत. "यापेक्षा तर नालीतील पाणी चांगले आहे," असे म्हणत महिलांनी प्रशासनाच्या कारभाराचा निषेध केला आहे.

मागणी

तातडीने या परिसरातील जलवाहिन्यांची तपासणी करून शुद्ध पाण्याचा पुरवठा सुरू करावा, अन्यथा नगर परिषदेवर घाण घागर मोर्चा नेण्याचा इशारा रामनगरमधील नागरिकांनी दिला आहे. आता यावर मुख्य अधिकारी काय पाऊल उचलतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Related to this topic: