Breaking News
  • टिम कुक यांच्या स्थानी जॉन टर्नस बनले ॲपलचे नवे CEO
  • बालेन सरकारचा मोठा निर्णय, आता महिन्यातून दोनदा मिळणार ​​​​​​​पगार
  • तिलक वर्माने रचला इतिहास,MI साठी झळकावले सर्वात जलद शतक
  • मोदींच्या दौऱ्याआधीच संकट; पचपद्रा रिफायनरीत २४ तास आधी भीषण आग
  • मुख्यमंत्री फडणवीस यांचे ‘विकसित महाराष्ट्र 2047’साठी नवे निर्देश
  • राज्यात पुढील 4 दिवस वादळी पाऊस, गारपीट व विजांचा इशारा
  • फडणवीस म्हणजे ‘नालंदा विद्यापीठ’! महाडिकांची तोंडभरून स्तुती
  • औराद शहाजानीत उष्माघाताचा बळी; शेतात काम करताना शेतकऱ्याचा मृत्यू
  • अमेरिका-इराण तणाव: अणुशस्त्रांचा वापर कधीही समर्थनीय नाही- राहुल गांधी

होम > आपले शहर > विदर्भ > अकोला

धन्य तो पाणीपुरवठा विभाग! पातूरमध्ये नळावाटे वाहतेय 'नाली'चे पाणी; नागरिकांचा संताप व्यक्त

पातूर येथील नगर परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाचा कारभार सध्या कमालीचा रामभरोसे झाला असून, शहरातील रामनगर आणि रेस्ट हाऊस परिसरातील नागरिक भीषण समस्यांना तोंड देत आहेत.


धन्य तो पाणीपुरवठा विभाग पातूरमध्ये नळावाटे वाहतेय नालीचे पाणी नागरिकांचा संताप व्यक्त

Contaminated Water Supply |

नळाला येणाऱ्या पाण्यापेक्षा नालीतील पाणी बरं; संतप्त नागरिकांचा पालिका प्रशासनावर घणाघाती आरोप

पातूर (Contaminated Water Supply) : पातूर येथील नगर परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाचा कारभार सध्या कमालीचा रामभरोसे झाला असून, शहरातील रामनगर आणि रेस्ट हाऊस परिसरातील नागरिक भीषण समस्यांना तोंड देत आहेत. गेल्या काही दिवसांपासून या भागात अत्यंत गढूळ आणि दुर्गंधीयुक्त पाण्याचा पुरवठा होत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. प्रशासनाच्या या निष्काळजीपणामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी, "नळाला येणाऱ्या घाण पाण्यापेक्षा नालीतील पाणी चांगले," अशा शब्दांत आपला संताप व्यक्त केला आहे.

नेमकी समस्या काय?

मिळालेल्या माहितीनुसार, रामनगर आणि विश्रामगृह (रेस्ट हाऊस) परिसरात मागील अनेक दिवसांपासून नळाद्वारे पुरवले जाणारे पाणी हे पिण्यायोग्य राहिलेले नाही. हे पाणी इतके गढूळ आणि काळपट आहे की त्याचा वापर साध्या वापरासाठी करणेही कठीण झाले आहे. या दूषित पाण्यामुळे परिसरात साथीचे आजार पसरण्याची भीती निर्माण झाली असून, लहान मुले व वृद्धांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

प्रशासनाचे दुर्लक्ष

पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिन्यांमध्ये काही ठिकाणी गळती असल्याने किंवा नालीतील सांडपाणी जलवाहिनीमध्ये मिसळत असल्याने हा प्रकार घडत असल्याचे बोलले जात आहे. मात्र, याबाबत तक्रारी करूनही नगर परिषदेचा पाणीपुरवठा विभाग याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिक रहिवाशांनी केला आहे.

नागरिकांचा आक्रमक पवित्रा

नगर परिषदेला वेळेवर पाणीपट्टी भरूनही जर नळाला गटारासारखे घाण पाणी येणार असेल, तर अशा प्रशासनाचा उपयोग काय? असा सवाल नागरिक विचारत आहेत. "यापेक्षा तर नालीतील पाणी चांगले आहे," असे म्हणत महिलांनी प्रशासनाच्या कारभाराचा निषेध केला आहे.

मागणी

तातडीने या परिसरातील जलवाहिन्यांची तपासणी करून शुद्ध पाण्याचा पुरवठा सुरू करावा, अन्यथा नगर परिषदेवर घाण घागर मोर्चा नेण्याचा इशारा रामनगरमधील नागरिकांनी दिला आहे. आता यावर मुख्य अधिकारी काय पाऊल उचलतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.