Breaking News
  • साताऱ्यातील पाथरपुंजला सर्वात जास्त पावसाची नोंद
  • लोणावळ्यात 24 तासात 94 मिलिमीटर पावसाची नोंद.
  • सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी विष्णू चाटेचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला
  • पुण्यातील स्टील गोडाऊनवर गोळीबार प्रकरणी वापरण्यात आलेली बाईक पोलिसांकडून जप्त
  • विलास घुले हत्या प्रकरणानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा केज पोलीस ठाण्यासमोरील आंदोलकांना फोन
  • जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथे वीज पडून एका तरुण शेतकऱ्याचा मृत्यू
  • अमरावती जिल्ह्यातील वरूड तालुक्यात दमदार पाऊस
  • नाशिकच्या सातपूर एमआयडीसी परिसरात एका कंपनीला भीषण आग
  • महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर विरोधात सोलापुरातील मनसे झाली आक्रमक

होम > आपले शहर > विदर्भ > बुलडाणा

खंडाळा (मकरध्वज) येथे भीषण आग; ६ लाखांचे नुकसान, जीवितहानी टळली

चिखली तालुक्यातील खंडाळा (मकरध्वज) येथे शुक्रवारी सकाळी सुमारे ९:३० वाजण्याच्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत एका घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.


खंडाळा मकरध्वज येथे भीषण आग ६ लाखांचे नुकसान जीवितहानी टळली

Chikhli Fire |

चिखली (Chikhli Fire) : चिखली तालुक्यातील खंडाळा (मकरध्वज) येथे शुक्रवारी सकाळी सुमारे ९:३० वाजण्याच्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत एका घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. लक्ष्मण सूर्यभान भुतेकर यांच्या घराला अचानक आग लागून संपूर्ण घर व घरातील साहित्य जळून खाक झाले.

चिखली शहरापासून जवळच असलेल्या या परिसरात लागलेली आग काही क्षणातच भडकली. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकले नसले तरी स्थानिक नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत शर्थीचे प्रयत्न करत आग आटोक्यात आणली. या आगीत टीव्ही, पंखे, घरगुती साहित्य, धान्य, कपडे तसेच सोन्या-चांदीचे दागिने जळून नष्ट झाले. पंचनाम्यानुसार सुमारे ६ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र घरातील जनावरे आगीच्या झळा बसून जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे.

​​​​​​​

घटनेची माहिती मिळताच तलाठी प्रभाकर गवळी व संबंधित अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून, नुकसानग्रस्तांना मदत व नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी पुढील कार्यवाही सुरू असल्याचे सांगण्यात आले.
या दुर्घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त होत असून, आपत्कालीन परिस्थितीत तत्परतेने मदतीसाठी धावून आलेल्या रज्जाक शाह, पुरुषोत्तम जाधव, जगाराव ठेंग, बबलू पठाण, कृष्णा सपकाळ, विठ्ठल ठेंग आणि कुंदन यंगड या स्थानिक नागरिकांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

Related to this topic: