Breaking News
  • सलग दुसऱ्या दिवशी शिंदखेडा शहरासह जिल्हात विविध ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी
  • पुण्यात कोयत्याची दहशत कायम, हातात कोयता आणि बंदूक घेऊन तरुणाने पसरवली दहशत
  • अकोला जिल्ह्यातील अकोट नगर परिषदमधील प्रभाग 4 मध्ये भाजपचा दुहेरी विजय
  • अकोला जिल्ह्यातील पातुर नगरपालिकेवर काँग्रेस- शिवसेना उबाठा आघाडीचे वर्चस्व
  • गडचिरोली नगर परिषदेच्या पोटनिवडणुकीत 264 मतांनी भाजपचे अंकुश नैताम विजयी
  • भरत गोगावले पालक मंत्री होणार यात शंका नाही - आमदार महेंद्र थोरवे
  • रायगड जिल्ह्यातील स्विमिंग पूल 30 जून पर्यंत बंद ठेवण्यासंबंधी रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी आदेश जारी केले आहेत.
  • गडचिरोलीत 5 परीक्षा केंद्रांवर नीट-यूजीची फेरपरीक्षा सुरू
  • पुणे शहराला दिलासा! मध्यवर्ती भागासह उपनगरात पावसाला सुरुवात

होम > आपले शहर > मराठवाडा > परभणी

चारठाणा घाणीचे साम्राज्य

चारठाणा येथे मुख्य रस्त्यावर घाणीचे साम्राज्य, नाल्या तुंबल्या

Charthana Dirty Road: चारठाणा गावात सफाई कर्मचारियों की हड़ताल के कारण मुख्य सड़कों पर कचरा और गंदगी का ढेर लग गया है, जिससे नागरिकों का जीवन कठिन हो गया है।


चारठाणा येथे मुख्य रस्त्यावर घाणीचे साम्राज्य नाल्या तुंबल्या

Charthana Dirty Road |

 

सफाई कामगारांचे पगार थकल्याने गावची सफाई ठप्प...?

परभणी/ चारठाणा (Charthana Dirty Road) : जिंतूर तालुक्यातील चारठाणा येथे सुमारे 15 हजार लोकसंख्या असलेल्या चारठाणा गावात मुख्य रस्त्यावर सर्वत्र घाण आणि दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे. ग्रामपंचायतीकडे पुरेसे सफाई कामगार नसल्याने आणि असलेल्या कामगारांचे पगार थकल्याने मागील अनेक महिन्यांपासून गावातील स्वच्छता पूर्णपणे ठप्प झाली आहे.

100% नाल्या ब्लॉक होऊन संपूर्ण गावातील रस्त्यावरून घाण पाणी वाहत आहे परिणामी नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे गावातील सर्वच नाल्या कचरा आणि गाळाने पूर्ण भरल्या आहेत. त्यामुळे उन्हाळा असूनही घरांमधील सांडपाणी (Charthana Dirty Road) आणि घाण पाणी जागोजागी मुख्य रस्त्यावरून वाहत आहे. याशिवाय अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनला गळती लागली आहे. नाल्या तुंबल्याने हे पाणीही रस्त्यावरच साचत आहे. परिणामी मुख्य रस्ता पूर्ण खराब झाला असून चिखल आणि घाणीने नागरिकांना ये-जा करणे कठीण झाले आहे. ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, गावातील अनेक वार्डांमध्ये मागील दोन वर्षांपासून एकही सफाई कामगार फिरकलेला नाही. पगार न झाल्याने कामगार कामावर येत नाहीत. त्यामुळे नाल्यांची सफाई, रस्त्यांची झाडलोट पूर्णपणे बंद आहे.

आणी त्यासाठी नागरिकच जबाबदार आसुन रस्त्यावरच  कचरा टाकल्यामुळे सदर प्रश्न उद्भवत आहे.  एकीकडे ग्रामपंचायतीचा निष्काळजीपणा, तर दुसरीकडे काही नागरिकांकडूनही बेजबाबदारपणा दिसून येत आहे. घरातील कचरा आणि झाडलेला केर थेट मुख्य रस्त्यावरच टाकला जात आहे. या (Charthana Dirty Road) कचऱ्यावर डुकरे जमा होऊन अधिक घाण पसरवत आहेत. त्यामुळे रोगराई पसरण्याची भीती व्यक्त होत आहे.गावकऱ्यांनी तातडीने सफाई कामगारांच्या थकीत पगाराचा प्रश्न सोडवून नालेसफाई आणि रस्त्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी केली आहे. तसेच पाईपलाईनच्या गळत्या बंद करून नागरिकांनीही रस्त्यावर कचरा टाकू नये यासाठी जनजागृती व दंडात्मक कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
प्रशासनाने देखील त्वरित लक्ष न दिल्यास आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण होण्याची शक्यता ग्रामस्थांनी वर्तवली आहे.

Related to this topic: