Breaking News
  • ३१ जिल्ह्यांना पावसाचा इशारा; मान्सून राज्याच्या दारात.
  • पुणेकरांसाठी आनंदाची बातमी – हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोच्या पहिल्या टप्प्याच्या उद्घाटनाची तयारी सुरू झाली आहे.
  • अमरावती मनपाची मोठी कारवाई – थकीत कर वसुलीसाठी दोन मालमत्ता सील करण्यात आल्या. प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे.
  • मुंबईतील विकासकामांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आढावा घेणार – पावसाळ्यापूर्वी महापालिकेच्या विविध प्रकल्पांची पाहणी होणार आहे.
  • पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळ अटकेत – राजस्थानमधून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. तो अनेक महिन्यांपासून फरार होता.
  • अकरावी प्रवेश प्रक्रिया (FYJC) – दुसऱ्या नियमित प्रवेश फेरीचे वेळापत्रक जाहीर; ६ जूनपासून विद्यार्थ्यांना पसंतीक्रम बदलण्याची संधी मिळणार.
  • महाराष्ट्रातील पावसाचा अंदाज – हवामान विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार राज्यातील बहुतांश भागात यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता व्यक्त.
  • कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती, कमकुवत रुपया आणि पावसाच्या अनिश्चिततेमुळे RBI ने महागाईचा अंदाज वाढवला.
  • नैर्ऋत्य मान्सून केरळमध्ये दाखल; महाराष्ट्रात पुढील काही दिवसांत प्रगतीची शक्यता, मात्र एल निनोचा प्रभाव चिंतेचा विषय.

होम > आपले शहर > मराठवाडा > परभणी

चारठाणा घाणीचे साम्राज्य

चारठाणा येथे मुख्य रस्त्यावर घाणीचे साम्राज्य, नाल्या तुंबल्या

Charthana Dirty Road: चारठाणा गावात सफाई कर्मचारियों की हड़ताल के कारण मुख्य सड़कों पर कचरा और गंदगी का ढेर लग गया है, जिससे नागरिकों का जीवन कठिन हो गया है।


चारठाणा येथे मुख्य रस्त्यावर घाणीचे साम्राज्य नाल्या तुंबल्या

Charthana Dirty Road |

 

सफाई कामगारांचे पगार थकल्याने गावची सफाई ठप्प...?

परभणी/ चारठाणा (Charthana Dirty Road) : जिंतूर तालुक्यातील चारठाणा येथे सुमारे 15 हजार लोकसंख्या असलेल्या चारठाणा गावात मुख्य रस्त्यावर सर्वत्र घाण आणि दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे. ग्रामपंचायतीकडे पुरेसे सफाई कामगार नसल्याने आणि असलेल्या कामगारांचे पगार थकल्याने मागील अनेक महिन्यांपासून गावातील स्वच्छता पूर्णपणे ठप्प झाली आहे.

100% नाल्या ब्लॉक होऊन संपूर्ण गावातील रस्त्यावरून घाण पाणी वाहत आहे परिणामी नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे गावातील सर्वच नाल्या कचरा आणि गाळाने पूर्ण भरल्या आहेत. त्यामुळे उन्हाळा असूनही घरांमधील सांडपाणी (Charthana Dirty Road) आणि घाण पाणी जागोजागी मुख्य रस्त्यावरून वाहत आहे. याशिवाय अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनला गळती लागली आहे. नाल्या तुंबल्याने हे पाणीही रस्त्यावरच साचत आहे. परिणामी मुख्य रस्ता पूर्ण खराब झाला असून चिखल आणि घाणीने नागरिकांना ये-जा करणे कठीण झाले आहे. ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, गावातील अनेक वार्डांमध्ये मागील दोन वर्षांपासून एकही सफाई कामगार फिरकलेला नाही. पगार न झाल्याने कामगार कामावर येत नाहीत. त्यामुळे नाल्यांची सफाई, रस्त्यांची झाडलोट पूर्णपणे बंद आहे.

आणी त्यासाठी नागरिकच जबाबदार आसुन रस्त्यावरच  कचरा टाकल्यामुळे सदर प्रश्न उद्भवत आहे.  एकीकडे ग्रामपंचायतीचा निष्काळजीपणा, तर दुसरीकडे काही नागरिकांकडूनही बेजबाबदारपणा दिसून येत आहे. घरातील कचरा आणि झाडलेला केर थेट मुख्य रस्त्यावरच टाकला जात आहे. या (Charthana Dirty Road) कचऱ्यावर डुकरे जमा होऊन अधिक घाण पसरवत आहेत. त्यामुळे रोगराई पसरण्याची भीती व्यक्त होत आहे.गावकऱ्यांनी तातडीने सफाई कामगारांच्या थकीत पगाराचा प्रश्न सोडवून नालेसफाई आणि रस्त्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी केली आहे. तसेच पाईपलाईनच्या गळत्या बंद करून नागरिकांनीही रस्त्यावर कचरा टाकू नये यासाठी जनजागृती व दंडात्मक कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
प्रशासनाने देखील त्वरित लक्ष न दिल्यास आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण होण्याची शक्यता ग्रामस्थांनी वर्तवली आहे.

Related to this topic: