Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > आपले शहर > विदर्भ > बुलडाणा

शिवसेना उबाठा बैठक

पक्ष विस्तारासाठी झोकून देऊन काम करा: प्रा. खेडेकर

Shiv Sena (UBT) Meeting: गद्दार सोडून गेलेतरी पक्ष संघटना आहे तिथेच जबाबदारीने आणि निष्ठेने काम करत आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांमुळे पक्षाची पाळंमुळं आज जनमानसांमध्ये खोलवर रुजल


पक्ष विस्तारासाठी झोकून देऊन काम करा प्रा खेडेकर

Shiv Sena (UBT) Meeting |


शिवसेना उबाठाच्या बैठकीत विविध विषयांवर पदाधिकाऱ्यांची मंथन बैठक

बुलढाणा (Shiv Sena (UBT) Meeting) : गद्दार सोडून गेलेतरी पक्ष संघटना आहे तिथेच जबाबदारीने आणि निष्ठेने काम करत आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांमुळे पक्षाची पाळंमुळं आज जनमानसांमध्ये खोलवर रुजलेली आहेत. उद्धव ठाकरेंचे हात मजबूत करण्यासाठी पक्ष विस्ताराच्या अनुषंगाने झोकून देऊन कामाला लागा, असे आवाहन जिल्हा संपर्कप्रमुख प्राध्यापक नरेंद्र खेडेकर यांनी केले. 

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची (Shiv Sena (UBT) Meeting) बुलढाणा जिल्हा पदाधिकारी बैठक रविवार १२ जुलै रोजी बुलढाणा रेसिडेन्सी येथे पार पडली. बैठकीला आ. सिद्धार्थ खरात, जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवत व गजानन वाघ, राज्यप्रवक्ता जयश्रीताई शेळके, सहसंपर्कप्रमुख डी. एस. लहाने, दत्ताभाऊ पाटील, वसंतराव भोजने, जिल्हा संघटक सुमित सरदार, युवासेना जिल्हाप्रमुख नंदूभाऊ कऱ्हाडे, शुभम पाटील, मेहकरचे नगराध्यक्ष किशोर गारोळे, वसंतराव झाल्टे, गजानन धांडे यांची प्रमुख उपस्थिती होती. 

बैठकीत पक्ष विस्तार, आगामी ग्रामपंचायत, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांची तयारी तसेच निवडणूक आयोगाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विशेष मतदार यादी पुनरावलोकन (SIR) प्रक्रियेत पक्षाच्या बूथ लेव्हल एजंट (BLA) यांनी सक्रिय सहभाग घेण्याबाबत पदाधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या. प्रा. नरेंद्र खेडेकर यांनी सांगितले की, पक्षाच्या पातळीवर  महाराष्ट्रात BLA नियुक्तीमध्ये बुलढाणा जिल्ह्याचे काम आघाडीवर आहे. ही अत्यंत कौतुकास्पद बाब आहे. संघटनात्मक कामासाठी देखील  सर्वांनी एकत्रित पुढाकार घेऊन काम करावे, असे आवाहन केले.

आ. सिद्धार्थ खरात म्हणाले की, शिवसेना पक्षाचा आमदार म्हणून जनतेने दाखविलेला विश्वास आपण पावसाळी अधिवेशनात सार्थकी लावला. जनहिताच्या विविध विषयांवर शासनाला धोरणात्मक निर्णय घेण्यास भाग पाडणे हेच माझे कर्तव्य आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना पक्षाची स्थापना विचार आणि निष्ठेच्या पायावर केली आहे. मूठभर लोक पक्ष सोडून गेल्याने शिवसेना संपणार नाही.

निष्ठावंतांमुळे संघटना बांधणीला जोर- बुधवत

भाजपाने राम मंदिर देणगीमध्ये केलेल्या कथित घोटाळ्याविरोधात संपूर्ण महाविकास आघाडीने एकत्रितपणे लढा उभारण्याची गरज आहे. तसेच आगामी ग्रामपंचायत, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी आतापासून कामाला लागावे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करावा. यामध्ये रक्तदान शिबिर, वृक्षारोपण , रुग्णांना फळ वाटप व अन्य उपक्रम राबवावेत. पक्ष वाढीसाठी  केवळ सोशल मीडियावर सक्रिय राहून उपयोग नाही; प्रत्यक्ष जनसंपर्क वाढविणे अधिक महत्त्वाचे आहे, असे यावेळी जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत म्हणाले.पक्षाला सोडून गेलेले आमदार-खासदार म्हणजे शिवसेना नव्हे. बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेल्या विचारांचे आणि बाळकडूचे बळ आजही शिवसैनिकांमध्ये आहे. मातोश्री निष्ठेमुळे आणि  त्याच बळावर शिवसेनेचा झंझवात पुढे जात आहे, असेही ते म्हणाले

संघर्षाला शस्त्र बनवण्याची हीच खरी वेळ- जयश्रीताई 

पक्षातील आमदार-खासदार पक्ष सोडून गेले असलेतरी आजही सामान्य शिवसैनिक पक्षासोबत ठामपणे उभा आहे. जवळचा माणूस सोडून गेल्याचे दुःख निश्चित आहे; मात्र आता त्याच दुःखाला संघर्षाचे शस्त्र बनविण्याची वेळ आली आहे. जोपर्यंत सेनापती युद्धभूमीवर लढत आहे, तोपर्यंत सैन्याचा पराभव होणे अशक्य आहे.  जोपर्यंत निष्ठावान शिवसैनिक पक्षासोबत आहेत, तोपर्यंत शिवसेना कोणीही संपवू शकत नाही. सत्ता कायम बदलत असते. आपलीही वेळ निश्चित येईल, यात कोणतीही शंका नाही.. असे यावेळी जयश्रीताई शेळके  म्हणाल्या.

प्रारंभी प्रा. सिद्धेश्वर आंधळे यांनी प्रबोधनातून विचार मंथन घडवून आणले. यावेळी गजानन वाघ, दत्ता पाटील, डी. एस. लहाने यांनीही मार्गदर्शन केले. यावेळी सर्व उपजिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख, उपतालुकाप्रमुख, शहरप्रमुख, उपशहरप्रमुख आणि अंगीकृत संघटनांचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.