Breaking News
  • सलग दुसऱ्या दिवशी शिंदखेडा शहरासह जिल्हात विविध ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी
  • पुण्यात कोयत्याची दहशत कायम, हातात कोयता आणि बंदूक घेऊन तरुणाने पसरवली दहशत
  • अकोला जिल्ह्यातील अकोट नगर परिषदमधील प्रभाग 4 मध्ये भाजपचा दुहेरी विजय
  • अकोला जिल्ह्यातील पातुर नगरपालिकेवर काँग्रेस- शिवसेना उबाठा आघाडीचे वर्चस्व
  • गडचिरोली नगर परिषदेच्या पोटनिवडणुकीत 264 मतांनी भाजपचे अंकुश नैताम विजयी
  • भरत गोगावले पालक मंत्री होणार यात शंका नाही - आमदार महेंद्र थोरवे
  • रायगड जिल्ह्यातील स्विमिंग पूल 30 जून पर्यंत बंद ठेवण्यासंबंधी रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी आदेश जारी केले आहेत.
  • गडचिरोलीत 5 परीक्षा केंद्रांवर नीट-यूजीची फेरपरीक्षा सुरू
  • पुणे शहराला दिलासा! मध्यवर्ती भागासह उपनगरात पावसाला सुरुवात

होम > आपले शहर > विदर्भ > बुलडाणा

भालगांवात ‘तोरणादारी’तून श्वेताताई महाले पाटील यांच्या विकासाचा भावनिक डंका

चिखली-देऊळगाव राजा मार्गावरील भालगाव (ता. चिखली) येथे वर्षानुवर्षांची प्रतीक्षा अखेर संपली.


भालगांवात ‘तोरणादारी’तून श्वेताताई महाले पाटील यांच्या विकासाचा भावनिक डंका

Bhalgav Development |

भालगाव (Bhalgav Development) : चिखली-देऊळगाव राजा मार्गावरील भालगाव (ता. चिखली) येथे वर्षानुवर्षांची प्रतीक्षा अखेर संपली असून गावाला स्वतःची सार्वजनिक विवाह व सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी जागा उपलब्ध झाली आहे. सुमारे पाच हजार लोकसंख्येच्या या गावात आतापर्यंत शाळेच्या प्रांगणातच सर्व कार्यक्रम पार पडत होते.

ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने सरपंच सौ. मीना संतोष परीहार, उपसरपंच व सदस्यांनी अतिक्रमित व अस्वच्छ सार्वजनिक जागा मोकळी करून तिचा विकास केला. या कामासाठी आमदार श्वेताताई महाले पाटील यांनी ५० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. यामधून कंपाऊंड वॉल, प्रवेशद्वार व स्टेज उभारण्यात आले.

या नव्या जागेवर २६ एप्रिल २०२६ रोजी पहिला विवाहसोहळा पार पडला. या सोहळ्याला केंद्रीय मंत्री ना. प्रतापराव जाधव व आमदार श्वेताताई महाले पाटील यांची उपस्थिती लाभली.

‘हागणदारी’ ते ‘तोरणादारी’

कधी काळी उपेक्षित आणि अस्वच्छ असलेली ही जागा ग्रामस्थांच्या एकजुटीने पूर्णतः बदलली. महिलांच्या सहभागातून व ग्रामस्थांच्या प्रयत्नांतून ही भूमी आता धार्मिक, सांस्कृतिक व मंगलकार्यांचे केंद्र बनली आहे. अलीकडेच येथे सावित्रीमाता सप्ताहही मोठ्या उत्साहात पार पडला.

डोमची मागणी

दरम्यान, या ठिकाणी पावसाळ्यात कार्यक्रम घेता यावेत यासाठी टिनशेड डोम (छत) उभारण्यात यावे, अशी मागणी सरपंच मीना परीहार यांनी आमदारांकडे केली आहे. “हे काम पूर्ण झाल्यास गावाला वर्षभर सामूहिक कार्यक्रमांसाठी मोठी सुविधा मिळेल,” असे त्यांनी सांगितले.

गावकऱ्यांच्या मते, हा बदल केवळ विकासाचा नाही तर एकतेचा आणि नव्या आशेचा जिवंत पुरावा ठरला आहे.

Related to this topic: