Breaking News
  • सुवेंदू अधिकारी होणार बंगालचे नवे मुख्यमंत्री; रूपा गांगुली यांची उपमुख्यमंत्रीपदी नियुक्ती
  • 'थलपथी' विजयला मिळाले बहुमत; मुख्यमंत्रीपदाचा मार्ग मोकळा!
  • 'निदा खान प्रकरणात इम्तियाज जलील यांना सहआरोपी करा', मंत्री संजय शिरसाट यांची मागणी
  • विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह पाऊस, विजांचा कडकडाट आणि काही ठिकाणी गारपिटीचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
  • रितेश देशमुख दिग्दर्शित ‘राजा शिवाजी’ या मराठी चित्रपटाने 50 कोटींचा टप्पा ओलांडत मोठे यश मिळवले आहे आणि 75 कोटींकडे वाटचाल सुरू आहे.
  • राज्यातील सुमारे 16 लाख विद्यार्थ्यांसाठी दहावीचा निकाल आज जाहीर करण्यात आला असून विद्यार्थी अधिकृत वेबसाईट आणि डिजीलॉकरवर निकाल पाहू शकतात.
  • नांदेड ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल 4,796 धारदार शस्त्रांचा साठा जप्त केला आहे. तलवारी, गुप्ती आणि चाकू यांचा मोठा साठा सापडल्याने राज्यात खळबळ उडाली आहे. ही आतापर्यंतची सर्वात मोठी एकदिवसीय शस्त्र जप्ती मानली जात आहे
  • महाराष्ट्र SSC 2026 निकालात लातूर विभागाने पुन्हा एकदा चांगली कामगिरी केली आहे. राज्यातील 179 विद्यार्थ्यांनी 100% गुण मिळवले असून त्यापैकी सर्वाधिक 104 विद्यार्थी लातूर विभागातील आहेत.
  • गडचिरोली जिल्ह्यातील APR सॅक प्लांटवरील 72 दिवसांचे आंदोलन अखेर संपले. कामगारांच्या नोकऱ्या सुरक्षित ठेवत आर्थिक भरपाईसह करार झाला आहे.

होम > आपले शहर > विदर्भ > बुलडाणा

भालगांवात ‘तोरणादारी’तून श्वेताताई महाले पाटील यांच्या विकासाचा भावनिक डंका

चिखली-देऊळगाव राजा मार्गावरील भालगाव (ता. चिखली) येथे वर्षानुवर्षांची प्रतीक्षा अखेर संपली.


भालगांवात ‘तोरणादारी’तून श्वेताताई महाले पाटील यांच्या विकासाचा भावनिक डंका

Bhalgav Development |

भालगाव (Bhalgav Development) : चिखली-देऊळगाव राजा मार्गावरील भालगाव (ता. चिखली) येथे वर्षानुवर्षांची प्रतीक्षा अखेर संपली असून गावाला स्वतःची सार्वजनिक विवाह व सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी जागा उपलब्ध झाली आहे. सुमारे पाच हजार लोकसंख्येच्या या गावात आतापर्यंत शाळेच्या प्रांगणातच सर्व कार्यक्रम पार पडत होते.

ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने सरपंच सौ. मीना संतोष परीहार, उपसरपंच व सदस्यांनी अतिक्रमित व अस्वच्छ सार्वजनिक जागा मोकळी करून तिचा विकास केला. या कामासाठी आमदार श्वेताताई महाले पाटील यांनी ५० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. यामधून कंपाऊंड वॉल, प्रवेशद्वार व स्टेज उभारण्यात आले.

या नव्या जागेवर २६ एप्रिल २०२६ रोजी पहिला विवाहसोहळा पार पडला. या सोहळ्याला केंद्रीय मंत्री ना. प्रतापराव जाधव व आमदार श्वेताताई महाले पाटील यांची उपस्थिती लाभली.

‘हागणदारी’ ते ‘तोरणादारी’

कधी काळी उपेक्षित आणि अस्वच्छ असलेली ही जागा ग्रामस्थांच्या एकजुटीने पूर्णतः बदलली. महिलांच्या सहभागातून व ग्रामस्थांच्या प्रयत्नांतून ही भूमी आता धार्मिक, सांस्कृतिक व मंगलकार्यांचे केंद्र बनली आहे. अलीकडेच येथे सावित्रीमाता सप्ताहही मोठ्या उत्साहात पार पडला.

डोमची मागणी

दरम्यान, या ठिकाणी पावसाळ्यात कार्यक्रम घेता यावेत यासाठी टिनशेड डोम (छत) उभारण्यात यावे, अशी मागणी सरपंच मीना परीहार यांनी आमदारांकडे केली आहे. “हे काम पूर्ण झाल्यास गावाला वर्षभर सामूहिक कार्यक्रमांसाठी मोठी सुविधा मिळेल,” असे त्यांनी सांगितले.

गावकऱ्यांच्या मते, हा बदल केवळ विकासाचा नाही तर एकतेचा आणि नव्या आशेचा जिवंत पुरावा ठरला आहे.

Related to this topic: