Breaking News
  • साताऱ्यातील पाथरपुंजला सर्वात जास्त पावसाची नोंद
  • लोणावळ्यात 24 तासात 94 मिलिमीटर पावसाची नोंद.
  • सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी विष्णू चाटेचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला
  • पुण्यातील स्टील गोडाऊनवर गोळीबार प्रकरणी वापरण्यात आलेली बाईक पोलिसांकडून जप्त
  • विलास घुले हत्या प्रकरणानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा केज पोलीस ठाण्यासमोरील आंदोलकांना फोन
  • जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथे वीज पडून एका तरुण शेतकऱ्याचा मृत्यू
  • अमरावती जिल्ह्यातील वरूड तालुक्यात दमदार पाऊस
  • नाशिकच्या सातपूर एमआयडीसी परिसरात एका कंपनीला भीषण आग
  • महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर विरोधात सोलापुरातील मनसे झाली आक्रमक

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

बासंबा जोरदार पाऊस

मानवी साखळी द्वारे बासंबा ग्रामस्थांनी ओलांडला ओढा

Basamba Heavy rain: बासंबा  ते पिंपरखेड रस्त्यावर असलेल्या ओढ्यावर पुल उभारण्यात आला नसल्याने या भागात झालेल्या पावसामुळे ओढ्याला पुर आला होता  गावकऱ्यांसह शेतकऱ्यांना मानवी साखळी करून ओढा ओलांडला


मानवी साखळी द्वारे बासंबा ग्रामस्थांनी ओलांडला ओढा

Basamba Heavy rain |

बासंबा परिसरात जोरदार पाऊस 

बासंबा (Basamba Heavy rain) : हिंगोली तालुक्यातील  बासंबा परिसरात २४ जुन बुधवार रोजी जोरदार पाऊस झाला या पावसामुळे बासंबा  ते पिंपरखेड रस्त्यावर असलेल्या ओढ्यावर पुल उभारण्यात आला नसल्याने या भागात झालेल्या पावसामुळे ओढ्याला पुर आला होता  गावकऱ्यांसह शेतकऱ्यांना मानवी साखळी करून ओढा ओलांडला.

बासंबा परिसरात बुधवारी जोरदार पाऊस झाला पावसाने ओढे नाले तुडुंब भरले यावर्षी जवळपास जून महिन्यात पेरणीयोग्य पाऊस न झाल्यामुळे शेतकरी वर्ग चिंतेत सापडला होता  पावसामुळे ओढ नाले तुडुंब भरून वाहत आहेत. अनेक शेतकरी वर्गांनी लावलेल्या हळदी सुद्धा पाण्याअभावी वाळून गेल्या तर कित्येक शेतकऱ्यांच्या शेतात हळदीचे पीक जमिनीत सडून गेले यावर्षी दुष्काळ आहे या चिंतेत शेतकरी असताना बासंबा व परिसरात  झालेल्या  पावसाने ओढे नाले तुडुंब भरले असून शेतकरी पेरणीच्या तयारीला लागणार असल्याने शेतकऱ्यातून या पावसामुळे समाधान व्यक्त करण्यात येत आहे. 

बासंबा ते पिंपरखेड हा पूर्वीपासूनच दोन्ही गावाला जोडणारा मुख्य रस्ता असून या ओढ्यावर पुल नसल्याने पावसाळ्यात ओढ्यातून ते जा करावी लागते  ओढ्यावर पूल उभारण्याची मागणी करून सुद्धा प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे. याचा फटका गावकऱ्यांना बसत आहे. बुधवारी गावकऱ्यांनी मानवी साखळी तयार करून ही नदी ओलांडली आहे