Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > आपले शहर > विदर्भ > चंद्रपूर

Bad Roads

सभोवतालच्या खड्डेमय रस्त्यांनी हिरावला नवरगावचा विकास; व्यापारी बाजारपेठ संकटात, प्रशासकीय अनास्थेमुळे नागरिक त्रस्त!

तालुक्यातील सर्वात मोठे आणि १५ हजारांहून अधिक लोकसंख्या असलेले नवरगाव आज विकासाच्या मुख्य प्रवाहातून मागे पडत असल्याचे चित्र आहे.


सभोवतालच्या खड्डेमय रस्त्यांनी हिरावला नवरगावचा विकास व्यापारी बाजारपेठ संकटात प्रशासकीय अनास्थेमुळे नागरिक त्रस्त

Bad Roads |

४० ते ५० गावांच्या प्रमुख बाजारपेठेवर रस्त्यांच्या दुरवस्थेचा परिणाम; नागरिकांकडून तातडीने डांबरीकरणाची मागणी

सिंदेवाही : तालुक्यातील सर्वात मोठे आणि १५ हजारांहून अधिक लोकसंख्या असलेले नवरगाव आज विकासाच्या मुख्य प्रवाहातून मागे पडत असल्याचे चित्र आहे. एकेकाळी संपूर्ण महाराष्ट्रात नावाजलेला घोंगडी उद्योग, ७ ते ८ मोठ्या भात गिरण्या तसेच समृद्ध सांस्कृतिक व शैक्षणिक वारसा लाभलेले हे गाव आज प्रशासकीय अनास्था आणि राजकीय उदासीनतेचा बळी ठरत असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत. परिसरातील ४० ते ५० गावांची प्रमुख व्यापारपेठ म्हणून ओळख असलेल्या नवरगावच्या विकासाला सभोवतालच्या अत्यंत दुरवस्था झालेल्या व खड्डेमय रस्त्यांमुळे मोठा फटका बसला असून, येथील अर्थव्यवस्थाही संकटात सापडली आहे.

सध्या नवरगावला इतर प्रमुख गावांशी जोडणाऱ्या सर्वच रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली असून प्रवाशांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण झाला आहे.

प्रमुख मार्गांची स्थिती

  • नवरगाव – चिखलगाव मार्ग : हा रस्ता पूर्णपणे खड्डेमय झाला असून वाहतुकीसाठी अत्यंत अयोग्य आणि धोकादायक ठरत आहे.

  • नवरगाव – सिंदेवाही व नवरगाव – चिमूर मार्ग : अनेक वर्षांपासून हे मार्ग अरुंद (वन-वे) आहेत. वाढत्या वाहतुकीचा विचार करता या मार्गांचे महामार्गाच्या धर्तीवर तातडीने रुंदीकरण करण्याची गरज व्यक्त होत आहे.
  • नवरगाव – नाचनभट्टी व शिवणी मार्ग : या रस्त्यांची अवस्था अत्यंत बिकट झाली असून ते केवळ नावापुरते उरल्याची परिस्थिती आहे.
  • नवरगाव – मिनघरी मार्ग : आजच्या आधुनिक युगातही या मार्गावर अद्याप धड पक्का रस्ता तयार झालेला नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे.

बाजारपेठेला मोठा फटका

राज्यात महामार्ग आणि दर्जेदार दळणवळणाच्या माध्यमातून विकासाचे दावे केले जात असताना नवरगावकडे लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप स्थानिक नागरिक करत आहेत. रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे परिसरातील ग्राहकांनी नवरगावच्या बाजारपेठेकडे पाठ फिरवली असून ते शेजारील शहरांकडे वळत आहेत. परिणामी, स्थानिक व्यापाऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत असून एकेकाळी गजबजलेली बाजारपेठ ओस पडत चालली आहे.

नागरिकांची तीव्र मागणी

१७ सदस्यीय ग्रामपंचायत असलेल्या नवरगावमध्ये तालुका बनण्याची पूर्ण क्षमता आणि पात्रता असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. मात्र, राजकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळे गाव आजही उपेक्षित राहिल्याची भावना व्यक्त केली जात आहे. नवरगाव आणि पंचक्रोशीतील सर्व रस्त्यांची तात्काळ सुधारणा करून डांबरीकरण करण्यात यावे, अशी तीव्र मागणी नागरिक आणि व्यापारी वर्गाकडून करण्यात आली आहे. प्रशासनाने याकडे त्वरित लक्ष न दिल्यास येथील व्यापार आणि विकास पूर्णपणे उद्ध्वस्त होण्याची भीती व्यक्त करत तीव्र आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे.

Related to this topic: