Breaking News
  • साताऱ्यातील पाथरपुंजला सर्वात जास्त पावसाची नोंद
  • लोणावळ्यात 24 तासात 94 मिलिमीटर पावसाची नोंद.
  • सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी विष्णू चाटेचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला
  • पुण्यातील स्टील गोडाऊनवर गोळीबार प्रकरणी वापरण्यात आलेली बाईक पोलिसांकडून जप्त
  • विलास घुले हत्या प्रकरणानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा केज पोलीस ठाण्यासमोरील आंदोलकांना फोन
  • जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथे वीज पडून एका तरुण शेतकऱ्याचा मृत्यू
  • अमरावती जिल्ह्यातील वरूड तालुक्यात दमदार पाऊस
  • नाशिकच्या सातपूर एमआयडीसी परिसरात एका कंपनीला भीषण आग
  • महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर विरोधात सोलापुरातील मनसे झाली आक्रमक

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

500 KVA Transformer

500 KVA रोहित्रात बिघाड; हिंगोली शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत

500 KVA क्षमतेच्या रोहित्रामध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने संपूर्ण विद्युत पुरवठा खंडित झाला.


500 kva रोहित्रात बिघाड हिंगोली शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत

500 KVA Transformer |

पालिकेकडून युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम सुरू

हिंगोली (500 KVA Transformer) : हिंगोली शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलशुद्धीकरण केंद्रातील 500 KVA क्षमतेच्या रोहित्रामध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने संपूर्ण विद्युत पुरवठा खंडित झाला असून, शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. मंगळवारपासून अनेक भागांमध्ये नळांना पाणी आलेले नसल्याने नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.

यासंदर्भात हिंगोली नगरपालिका प्रशासनाने प्रसिद्धीपत्रक जारी करून नागरिकांना माहिती दिली आहे. प्रसिद्धीपत्रकानुसार, जलशुद्धीकरण केंद्र हे पाणी उपसा व वितरणासाठी पूर्णपणे वीजेवर अवलंबून आहे. रोहित्र निकामी झाल्यामुळे पंप सुरू करता येत नसल्याने पाणीपुरवठा ठप्प झाला आहे.

दरम्यान, नागरिकांची गैरसोय लक्षात घेऊन नगरपालिकेने तातडीने दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर हाती घेतले आहे. तांत्रिक कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून आवश्यक सुटे भाग उपलब्ध करून रोहित्र पूर्ववत करण्याचे काम सुरू आहे.

नगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर पंपांची चाचणी घेऊन पाणीपुरवठा टप्प्याटप्प्याने पूर्ववत करण्यात येईल. तोपर्यंत नागरिकांनी उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करून आवश्यक साठवणूक करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

अचानक उद्भवलेल्या या तांत्रिक बिघाडामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत असली तरी प्रशासनाने दुरुस्तीला प्राधान्य दिले असून, लवकरच पाणीपुरवठा सुरळीत होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. तसेच नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता केवळ अधिकृत माहितीकडे लक्ष द्यावे आणि पाणीपुरवठा पूर्ववत होईपर्यंत संयम बाळगावा, असे आवाहन नगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने केले आहे.

Related to this topic: