Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

500 KVA Transformer

500 KVA रोहित्रात बिघाड; हिंगोली शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत

500 KVA क्षमतेच्या रोहित्रामध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने संपूर्ण विद्युत पुरवठा खंडित झाला.


500 kva रोहित्रात बिघाड हिंगोली शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत

500 KVA Transformer |

पालिकेकडून युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम सुरू

हिंगोली (500 KVA Transformer) : हिंगोली शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलशुद्धीकरण केंद्रातील 500 KVA क्षमतेच्या रोहित्रामध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने संपूर्ण विद्युत पुरवठा खंडित झाला असून, शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. मंगळवारपासून अनेक भागांमध्ये नळांना पाणी आलेले नसल्याने नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.

यासंदर्भात हिंगोली नगरपालिका प्रशासनाने प्रसिद्धीपत्रक जारी करून नागरिकांना माहिती दिली आहे. प्रसिद्धीपत्रकानुसार, जलशुद्धीकरण केंद्र हे पाणी उपसा व वितरणासाठी पूर्णपणे वीजेवर अवलंबून आहे. रोहित्र निकामी झाल्यामुळे पंप सुरू करता येत नसल्याने पाणीपुरवठा ठप्प झाला आहे.

दरम्यान, नागरिकांची गैरसोय लक्षात घेऊन नगरपालिकेने तातडीने दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर हाती घेतले आहे. तांत्रिक कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून आवश्यक सुटे भाग उपलब्ध करून रोहित्र पूर्ववत करण्याचे काम सुरू आहे.

नगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर पंपांची चाचणी घेऊन पाणीपुरवठा टप्प्याटप्प्याने पूर्ववत करण्यात येईल. तोपर्यंत नागरिकांनी उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करून आवश्यक साठवणूक करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

अचानक उद्भवलेल्या या तांत्रिक बिघाडामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत असली तरी प्रशासनाने दुरुस्तीला प्राधान्य दिले असून, लवकरच पाणीपुरवठा सुरळीत होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. तसेच नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता केवळ अधिकृत माहितीकडे लक्ष द्यावे आणि पाणीपुरवठा पूर्ववत होईपर्यंत संयम बाळगावा, असे आवाहन नगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने केले आहे.

Related to this topic: