Breaking News
  • अमेरिका-इराण तणाव: अणुशस्त्रांचा वापर कधीही समर्थनीय नाही- राहुल गांधी
  • गौतम अदानी यांचे 2030 पर्यंत 1 अब्ज टन मालवाहतुकीचे लक्ष्य
  • वैभव सूर्यवंशीची अप्रतिम कामगिरी; बाजारमूल्य 1 कोटीवरून 16 कोटी !
  • इराण-अमेरिका संघर्षात तात्पुरता ब्रेक; दोन आठवड्यांसाठी युद्धविराम
  • स्थलांतरित कामगारांना मोठा दिलासा; आता कनेक्शनशिवाय मिळणार लहान सिलेंडर
  • 'महिलांसाठी 2,000 रुपये आणि शेतकऱ्यांसाठी 15,000 रुपये'
  • दमानिया–अंधारे वाद तापला; ! CDR कुठून आले यावरून आरोप-प्रत्यारोप
  • मदरसे, औरंगजेब कबर आणि शस्त्रांवर टी. राजा सिंहांचे खळबळजनक वक्तव्य
  • पंचतारांकित हॉटेल बनलं ‘हवाला हब’? खरात प्रकरणाला दुबई कनेक्शनचा धक्का

होम > अध्यात्म

श्रीमद् भागवत कथा

ईश्वराला अडचणी दाखविण्या ऐवजी अडचणींना तुमचा ईश्वर दाखवा: रमेश भाई ओझा

हिंगोलीतील भागवत कथेच्या दुसऱ्या दिवशी रमेश भाई ओझा यांनी अडचणींना ईश्वर दाखवण्याचे महत्व सांगितले.


ईश्वराला अडचणी दाखविण्या ऐवजी अडचणींना तुमचा ईश्वर दाखवा रमेश भाई ओझा

Shrimad Bhagwat Katha |

हिंगोलीतील श्रीमद् भागवत कथेचा दुसरा दिवस

हिंगोली () : 'ईश्वराला तुमच्या अडचणी दाखविण्या ऐवजी अडचणींना तुमचा ईश्वर दाखवा, कोणतेही संकट तुमचे मार्ग अडवू शकणार नाही', असे प्रतिपादन जगविख्यात कथावाचक भाईश्री रमेश भाई ओझा यांनी भागवत कथे दरम्यान केले. हिंगोलीत गजराज बाल गणेश मंडळातर्फ आयोजित (Shrimad Bhagwat Katha) भागवत कथेच्या दुसऱ्या दिवशी भाईश्री रमेश भाई ओझा कथन करीत होते.

आपला संकल्प जर सत्य असेल तर ईश्वर त्याला निश्चित आशीर्वाद देतो आपला मार्ग नीती आणि धर्माचा असेल तर कोणतेही संकट मार्ग आवरुद्ध करू शकत नाही असा विश्वास भाई श्री रमेश भाई ओझा यांनी व्यक्त केला. याचा अर्थ आपली जबाबदारी ईश्वरावर सोडून आपण मोकळे होऊ शकत नाही आपण संकटातून बाहेर पडण्याचा प्रयत्न सुरू केला तर ईश्वर आपल्याला बळ देतो, असे ते म्हणाले.

आजच्या परिस्थितीवर बोलताना भाईश्री रमेश भाई
ओझा म्हणाले, विश्वास हा भक्तीचा आधार आहे. हल्ली प्रत्येकाचा एकमेकांवरील विश्वास कमी होत चालला आहे, त्यामुळे मानसिक शक्तीचा ऱ्हास होत आहे. आत्मविश्वास कमी झाल्याने नव्या पिढीत डिप्रेशन सारखे आजार बळावत आहेत यातूनच आत्महत्या सारखे प्रकारही असल्याचे भाई श्री म्हणाले, वाढत श्रीमद्भ भागवत आपली आंतरिक शक्ती वाढविण्याचे सर्वोत्कृष्ट
साधन असल्याचे ते म्हणाले.

श्रीमद् भागवत कथा (Shrimad Bhagwat Katha) दरम्यान भाई श्री रमेश भाई ओझा यांच्या भजनांवर अनेक वेळा भाविकांनी ठेका धरला. शनिवारी कथेच्या तिसऱ्या दिवशी नित्यकथा होणार असून या या कथेचे विविध धार्मिक वाहिन्यांवरून थेट प्रसारण सुरू आहे. दरम्यान कथा, सत्संगांतून अनेकाचे मन शुध्द होते. यामुळे विचार बदलण्याचे सामर्थ्य देखील कथेमध्ये आहे. महाभारतात धृतराष्ट्राची विचारधार स्वार्थ बुध्दीची आहे. धृतराष्ट्र नेहमी आपल्या मुलांना राजा कसे होता येईल याचाच विचार करत होते, असे त्यांनी सांगितले. ज्याची दृष्टी नष्ट झाली, तो असा विचार करतो, जे स्वार्थी असतात ते अधर्माकडे वळल्या जातात असे त्यांनी सांगितले.

Related to this topic: