Breaking News
  • रायगड पोलिस दलातील ऑस्कर श्वान काळाच्या पडद्याआड
  • Gadchiroli : दिना नदीला पूर; आष्टी–आलापल्ली- सिरोंचा राष्ट्रीय महामार्ग बंद
  • परभणी जिल्ह्यामध्ये सकाळपासूनच दमदार पावसाची हजेरी शेतकऱ्यांना दिलासा
  • ‘रॅपिडो बाईक टॅक्सी’ निर्णयाविरोधात चालक मालक संघटनांचा नवी मुंबईत एल्गार
  • पुणे ग्रामीण जिल्ह्यात ड्रोन उडवण्यासाठी पोलिस परवानगी लागणार
  • दहीहंडी फोडून शिर्डीतील तीन दिवसीय गुरुपौर्णिमा उत्सवाची सांगता
  • नीट परीक्षेचे कारण सांगून देशात अराजकता माजवणे आणि देशाला असुरक्षित करणे या प्रवृत्तीचा निषेध करण्यासाठी मुकमोर्चा
  • लासलगाव पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर रोड रॉबरी; व्हॅगनारची काच फोडून 70 हजारांची रोकड लंपास
  • रत्नागिरी- अरबी समुद्रात चक्राकार आणि बाष्पयुक्त वाऱ्यांचा प्रभाव वाढला

होम > आपले शहर > मुंबई

Aditi Sharma

टीव्ही अभिनेत्री अदिती शर्माची पतीसह सासरच्या तिघांविरोधात तक्रार; कौटुंबिक हिंसाचारासह मानसिक छळाचे गंभीर आरोप

टीव्ही आणि चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री अदिती शर्मा (वय २९) यांनी पती आणि सासरच्या मंडळींविरोधात कौटुंबिक हिंसाचाराचा गंभीर आरोप करत मुंबईतील गोरेगाव पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.


टीव्ही अभिनेत्री अदिती शर्माची पतीसह सासरच्या तिघांविरोधात तक्रार कौटुंबिक हिंसाचारासह मानसिक छळाचे गंभीर आरोप

गोरेगाव पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल; पती, सासू आणि नणंदाविरोधात शारीरिक छळ, स्त्रीधनाचा गैरवापर आणि चारित्र्यावर संशय घेतल्याचे आरोप

टीव्ही आणि चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री अदिती शर्मा (वय २९) यांनी पती आणि सासरच्या मंडळींविरोधात कौटुंबिक हिंसाचाराचा गंभीर आरोप करत मुंबईतील गोरेगाव पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीच्या आधारे ३१ जुलै रोजी पोलिसांनी तिचे पती अभिनीत विद्यानंद कौशिक, सासू उर्मिला कौशिक (वय ६५) आणि नणंद कीर्ती कौशिक (वय २९) यांच्याविरोधात गुन्हा (एफआयआर) नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.

तक्रारीत अदिती शर्माने पती आणि सासरच्या सदस्यांवर शारीरिक व मानसिक छळ, मारहाण, शिवीगाळ, चारित्र्यावर संशय घेणे आणि स्त्रीधनाचा गैरवापर केल्याचे आरोप केले आहेत.

ऑनलाइन अभिनय वर्गातून ओळख, नंतर विवाह

पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, जून २०२१ मध्ये ऑनलाइन अभिनय वर्गादरम्यान अदिती शर्मा आणि अभिनीत कौशिक यांची ओळख झाली. पुढे दोघांमध्ये मैत्री झाली आणि त्याचे रूपांतर प्रेमसंबंधात झाले. दोन्ही कुटुंबांच्या संमतीनंतर १२ नोव्हेंबर २०२४ रोजी त्यांनी विवाह केला. त्यापूर्वी सप्टेंबर २०२४ पासून हे दोघे गोरेगाव पश्चिम येथील एका फ्लॅटमध्ये लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होते.

लग्नानंतर वागण्यात बदल झाल्याचा आरोप

अदिती शर्माच्या तक्रारीनुसार, विवाहानंतर अवघ्या काही दिवसांतच पतीच्या वागण्यात बदल झाला. तो तिच्या कपड्यांबाबत आक्षेप घेऊ लागला आणि किरकोळ कारणांवरून वाद निर्माण करू लागला. याशिवाय घरखर्चात आर्थिक मदत करण्याऐवजी पती स्वतः तिच्याकडून पैसे घेत असल्याचाही आरोप तिने केला आहे.

शिवीगाळ, चारित्र्यावर संशय आणि मानसिक छळ

तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे, १ जानेवारी २०२५ रोजी कॉफीवरून झालेल्या वादानंतर परिस्थिती अधिक बिघडली. त्यावेळी पतीने शिवीगाळ केली आणि तिच्या चारित्र्यावर संशय व्यक्त करत विवाहबाह्य संबंध असल्याचा आरोप केल्याचे अदितीने म्हटले आहे.

तसेच पती नियमितपणे तिचा मोबाईल तपासत असे, वेगळ्या खोलीत झोपत असे आणि तिला तिच्या आई-वडिलांशी संपर्क ठेवण्यासही मज्जाव करत असल्याचा आरोप तिने तक्रारीत केला आहे.

दागिने परत न दिल्याचाही आरोप

अदिती शर्माने सासू उर्मिला कौशिक यांच्यावर लग्नातील सोन्याची साखळी, अंगठ्या, हिऱ्याची अंगठी, मंगळसूत्र आणि बांगड्या यांसह स्त्रीधन स्वतःकडे ठेवून वारंवार मागणी करूनही परत न दिल्याचा आरोप केला आहे.

तसेच कौटुंबिक वाद मिटवण्यासाठी सासू आणि नणंद घरी आल्या असता त्यांनी पतीची बाजू घेत अधिक मानसिक त्रास दिल्याचाही आरोप तिने केला आहे.

या तक्रारीच्या आधारे गोरेगाव पोलिसांनी संबंधित तिघांविरोधात गुन्हा नोंदवला असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

Related to this topic: