Breaking News
  • तुकाराम मुंढे नांदेडला आल्याची अफवा, भीतीपोटी पान टपऱ्या बंद करून , टपरी चालक पसार
  • तुळजापुरात वाढत्या गुन्हेगारीविरोधात नागरिकांचे साखळी उपोषण; अधिकाऱ्यांच्या बदलीची मागणी
  • वाशिम शहरात आनंदाचे वातावरण... प्रचंड उकाड्यापासून वाशिमकरांना काहीसा दिलासा
  • अमरावती शहरात सलग तीसऱ्या दिवशी दमदार पावसाची हजेरी
  • आकाशवाणी पुणे केंद्राचा वृत्त विभाग बंद होणार असल्याच्या चर्चेमुळे चिंता वाढली
  • पवनराजे निंबाळकर हत्याकांड प्रकरणी न्यायालय 20 तारखेला देणार निकाल
  • नंदूरबारमध्ये सरसकट कर्जमाफीच्या मागणीसाठी शेतकऱ्याने मारली विहिरीत उडी
  • आय टी पार्क हिंजवडीत मद्यधुंद तरुणांच्या आलीशान कारने दुचाकीला उडवले
  • सफाई कर्मचाऱ्यांना आवश्यक सुरक्षा उपकरणांशिवाय आणि निर्धारित नियमांचे उल्लंघन करून नालेसफाईच्या कामावर तैनात केले जात असल्याची तक्रार दाखल झाल्याची दखल घेत राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाने (NCSC) पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्तांना नोटीस बजावली आहे.

होम > महाराष्ट्र

शेतकरी कर्जमाफी आंदोलन

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी शिवसेनेची निदर्शने!

Farmers Loan Waiver Andolan: शेतकऱ्यांना वि.अट, सर. कट कर्जमाफीची तात्काळ मांग करण्यासाठी शिवसेनेच्या नेतृत्वाखाली लातूर जिल्ह्यात निदर्शन केले गेले. शासनाने ३३ हजार कोटी रुपयांचा मदती पॅकेज


शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी शिवसेनेची निदर्शने 

Farmers Loan Waiver Andolan |


विनाअट, सरसकट कर्जमाफी द्या; शिवसेना शिष्टमंडळाची मागणी 

लातूर (Farmers Loan Waiver Andolan) : शेतकऱ्यांना विनाअट, सरसकट कर्जमाफी द्यावी या प्रमुख मागणीचा इतर मागण्यांसाठी शिवसेनेच्यावतीने लातूर येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मंगळवारी निदर्शने करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सरकारला निवेदन देण्यात आले. शेतीमालाला योग्य भाव द्या, बारा तास विद्युत पुरवठा सुरळीत चालू ठेवा, अतिवृष्टी मधील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना विशेष ३३ हजार कोटीचे पॅकेज जाहीर केले होते त्याची अंमलबजावणी करा यासह विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी डॉ. बास्टेवाड यांना देण्यात आले.

राज्य सरकारने नुकतीच अनेक अटी व शर्ती घालून कर्जमाफीची घोषणा केली आहे. मात्र सदर अटी शर्तींचा अभ्यास केला असता ही योजना प्रत्यक्षात कर्जमाफी योजना नसून कर्ज वसुली योजना असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. २०२५ मधील अतिवृष्टीनंतर शासनाने ऑक्टोबर २०२५ मध्ये सुमारे ३३ हजार कोटी रुपयांच्या मदतीच्या पॅकेजची घोषणा केली होती, मात्र हे पॅकेज आजही कागदावरच असून त्याची प्रत्यक्ष (Farmers Loan Waiver Andolan) अंमलबजावणी झालेली नाही.

या निधीची तात्काळ अंमलबजावणी करून शेतकऱ्यांना मदत देण्यात यावी. विमा कंपन्या केवळ शेतकऱ्यांची आर्थिक लूट करत असून संपूर्ण लातूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊनही त्यानुसार विमा भरपाई मंजूर करण्यात आलेला नाही. त्यामुळे विमा कंपनीवर कठोर कारवाई करून शेतकऱ्यांना योग्य भरपाई देण्यात यावी. अशा मागण्यांसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करण्यात आली.

यांचा आंदोलनात सहभाग...
जिल्हासमन्वक पप्पू भाई कुलकर्णी, महिला जिल्हा संघटिका जयश्रीताई उटगे, उपजिल्हाप्रमुख बी. एन. डोंगरे , उपजिल्हाप्रमुख बजरंग जाधव, खरोसा जिल्हा परिषद सदस्य तानाजी जाधव  तालुकाप्रमुख शंकर रांजणकर, कैलास पाटील, प्रशांत मोरे, अविनाश रेशमे, महानगर प्रमुख विष्णूपंथ साठे, लातूर शहरप्रमुख शिवराज मुळावकर, औसा शहरप्रमुख सुरेशदादा भुरे, उपतालुकाप्रमुख सचिन दत्तू पाटील, महेश फुले, सचिन पाटील, युवासेना जिल्हाप्रमुख दिनेश जावळे, युवासेना विधानसभाप्रमुख अक्षय चवळे, शिवआरोग्य सेना जिल्हाअध्यक्ष त्र्यंबक स्वामी,फेरीवाला सेना हणमंत पडवळ, विधानसभा समन्वयक सोमनाथ झुंजारे, विधानसभा संघटक विष्णू काबळे, गोविंद बेंबडे, उदगीर तालुका समन्वयक व्यंकट साबणे, शहरसंघटक प्रदीप उपासे, अरुण बिराजदार  उपशहर ऋषिकेश पाटील, रोहित दोपारे, मारुती सूर्यवंशी, करण शिंदे, सोशल मीडिया जिल्हाप्रमुख विशाल पवार, पारुडकर, सुमित क्षीरसागर, जीवन जाधव, अनिल यमपाळे, सौरभ पारुडकर, व्यंकट राजेंद्र, देवानंद मुळे इत्यादी शिवसैनिक पदाधिकारी आंदोलनात सहभागी झाले होते.