Breaking News
  • रायगड पोलिस दलातील ऑस्कर श्वान काळाच्या पडद्याआड
  • Gadchiroli : दिना नदीला पूर; आष्टी–आलापल्ली- सिरोंचा राष्ट्रीय महामार्ग बंद
  • परभणी जिल्ह्यामध्ये सकाळपासूनच दमदार पावसाची हजेरी शेतकऱ्यांना दिलासा
  • ‘रॅपिडो बाईक टॅक्सी’ निर्णयाविरोधात चालक मालक संघटनांचा नवी मुंबईत एल्गार
  • पुणे ग्रामीण जिल्ह्यात ड्रोन उडवण्यासाठी पोलिस परवानगी लागणार
  • दहीहंडी फोडून शिर्डीतील तीन दिवसीय गुरुपौर्णिमा उत्सवाची सांगता
  • नीट परीक्षेचे कारण सांगून देशात अराजकता माजवणे आणि देशाला असुरक्षित करणे या प्रवृत्तीचा निषेध करण्यासाठी मुकमोर्चा
  • लासलगाव पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर रोड रॉबरी; व्हॅगनारची काच फोडून 70 हजारांची रोकड लंपास
  • रत्नागिरी- अरबी समुद्रात चक्राकार आणि बाष्पयुक्त वाऱ्यांचा प्रभाव वाढला

होम > महाराष्ट्र

Pen Ganesh Idol Industry

पेणच्या गणेशमूर्ती उद्योगाला अतिवृष्टीचा मोठा फटका! ४३७ कारखाने बाधित, ५० हजार मूर्तींचे नुकसान

गणेशोत्सवासाठी देश-विदेशात प्रसिद्ध असलेल्या पेणच्या गणेशमूर्ती उद्योगावर यंदाच्या मुसळधार पावसाने मोठे संकट ओढवले आहे.


पेणच्या गणेशमूर्ती उद्योगाला अतिवृष्टीचा मोठा फटका ४३७ कारखाने बाधित ५० हजार मूर्तींचे नुकसान

Pen Ganesh Idol Industry |

कोट्यवधींची हानी; गणेशोत्सव तोंडावर असताना मूर्तिकारांसमोर ऑर्डर पूर्ण करण्याचे आव्हान, ५ हजारांहून अधिक कुटुंबांच्या उदरनिर्वाहावर परिणाम

गणेशोत्सवासाठी देश-विदेशात प्रसिद्ध असलेल्या पेणच्या गणेशमूर्ती उद्योगावर यंदाच्या मुसळधार पावसाने मोठे संकट ओढवले आहे. अतिवृष्टीमुळे ४३७ गणेशमूर्ती कारखान्यांचे नुकसान झाले असून, सुमारे ५० हजार गणेशमूर्तींना फटका बसल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे कोट्यवधी रुपयांचे आर्थिक नुकसान झाले असून, गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला असताना मूर्तिकारांसमोर ग्राहकांच्या ऑर्डर वेळेत पूर्ण करण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.

पेणमधील गणेशमूर्तींना महाराष्ट्रासह देश-विदेशातून मोठी मागणी असते. त्यामुळे येथील मूर्तिकार वर्षभर मेहनत घेऊन विविध आकार आणि आकर्षक स्वरूपातील गणेशमूर्ती तयार करतात. यंदाही उत्सवासाठी मोठ्या प्रमाणावर मूर्तींची निर्मिती करण्यात आली होती. मात्र, मुसळधार पावसामुळे अनेक कारखान्यांमध्ये पाणी शिरल्याने वर्षभराची मेहनत काही क्षणांत वाया गेली.

पेण शहरासह जोहे, कळवे, शहापूर आणि तांबडशेत परिसरातील गणेश कला केंद्रांना या पावसाचा सर्वाधिक फटका बसला. अनेक तयार मूर्ती पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्या, तर काही मूर्तींचे रंग खराब झाले. शाडूच्या मातीपासून बनवलेल्या अनेक मूर्ती पाण्यात भिजून विरघळल्या. याशिवाय रंगकामासाठी लागणारे साहित्य, साचे, शाडूची माती, कच्चा माल आणि विविध उपकरणांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

या नुकसानीमुळे केवळ मूर्तिकारांचेच नव्हे, तर या पारंपरिक उद्योगावर अवलंबून असलेल्या ५ हजारांहून अधिक कुटुंबांच्या उपजीविकेवर परिणाम झाला आहे. आधीच कच्च्या मालाच्या वाढलेल्या किमती, वाहतूक खर्च आणि बाजारातील स्पर्धेमुळे उद्योग अडचणीत असताना अतिवृष्टीने परिस्थिती अधिकच गंभीर केली आहे.

प्रशासनाच्या माहितीनुसार, ४३७ कारखानदारांचे नुकसान झाले असून, प्रभावित मूर्तिकारांनी शासनाकडे तातडीने पंचनामे करून योग्य आर्थिक मदत जाहीर करण्याची मागणी केली आहे. वेळेत भरपाई मिळाल्यास गणेशमूर्ती उद्योगाला पुन्हा उभारी मिळेल, अशी अपेक्षा कारखानदारांनी व्यक्त केली आहे.

Related to this topic: