Breaking News
  • वर्धा नदीत पाच मुले बुडाली, एकाचा मृतदेह सापडला
  • पुणे विषारी दारू प्रकरण: राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई
  • ३१ जिल्ह्यांना पावसाचा इशारा; मान्सून राज्याच्या दारात.
  • पुणेकरांसाठी आनंदाची बातमी – हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोच्या पहिल्या टप्प्याच्या उद्घाटनाची तयारी सुरू झाली आहे.
  • अमरावती मनपाची मोठी कारवाई – थकीत कर वसुलीसाठी दोन मालमत्ता सील करण्यात आल्या. प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे.
  • मुंबईतील विकासकामांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आढावा घेणार – पावसाळ्यापूर्वी महापालिकेच्या विविध प्रकल्पांची पाहणी होणार आहे.
  • पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळ अटकेत – राजस्थानमधून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. तो अनेक महिन्यांपासून फरार होता.
  • अकरावी प्रवेश प्रक्रिया (FYJC) – दुसऱ्या नियमित प्रवेश फेरीचे वेळापत्रक जाहीर; ६ जूनपासून विद्यार्थ्यांना पसंतीक्रम बदलण्याची संधी मिळणार.
  • महाराष्ट्रातील पावसाचा अंदाज – हवामान विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार राज्यातील बहुतांश भागात यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता व्यक्त.

होम > महाराष्ट्र

विधान परिषद निवडणूक

परभणी - हिंगोली विधान परिषद निवडणूकीत तिरंगी लढत...!

Legislative Council Elections: परभणी-हिंगोली विधानसभा निवडणूकीत ७ उमेदवारांचे अर्ज दाखल झाले. राष्ट्रवादाचे उमेदवार विजय जामकर आणि संग्राम जामकर यांनी अर्ज मागे घेतला, शेष उमेदवार महायुती,


परभणी - हिंगोली विधान परिषद निवडणूकीत तिरंगी लढत

Legislative Council Elections |

 

उद्योग मंत्री ना. उदय सामंत, ना. मेघनाताई बोर्डीकर यांची शिष्टाई 

विजय जामकर, संग्राम जामकर, विशाल बुधवंत यांचे अर्ज मागे

परभणी (Legislative Council Elections) : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या परभणी - हिंगोली विधान परिषद निवडणूक रिंगणात ७ उमेदवारांचे अर्ज दाखल झाले होते. मात्र गुरुवार ४ जून रोजी राष्ट्रवादीचे मनपा सदस्य विजयसिंह जामकर, जि.प. सदस्य संग्राम जामकर, भाजपचे विशाल बुधवंत यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले. त्यामुळे आता खरी लढत महायुती, महाविकास आघाडी आणि अपक्ष सुशिल देशमुख यांच्यात होणार असल्याचे दिसून येते. 

परभणी - हिंगोली विधान परिषद निवडणूकीत (Legislative Council Elections) महाविकास आघाडीकडून उबाठाचे डॉ. विवेक नावंदर, महायुतीकडून शिवसेना शिंदे गटाकडून सईद खान, सुशिल देशमुख, विजय जामकर, विश्वजीत बुधवंत, संग्राम जामकर आणि मेहराज खान शेरगुल खान यांनी उमेदवारी दाखल केली होती. गुरुवार ४ जून रोजी कोण कोण माघार घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. महायुतीचे उमेदवार सईद खान हे असताना राष्ट्रवादीच्या विजयसिंह जामकर, संग्राम जामकर यांनी अर्ज दाखल केला होता. त्यामुळे संभ्रम निर्माण झाला होता. मात्र ना. उदय सामंत हे गुरुवारी परभणीत दाखल झाले. त्यांनी महायुतीच्या पदाधिकार्‍यांशी चर्चा केली. या चर्चेनंतर विजयसिंह जामकर व संग्राम जामकर यांनी अर्ज मागे घेतला. राष्ट्रवादीचे आ. राजेश विटेकर यांनी याबाबत अधिकृत घोषणा केली. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार यांच्या आदेशानुसार हा निर्णय घेण्यात आला. आता राष्ट्रवादीचे सर्व पदाधिकारी महायुतीचा उमेदवार सईद खान यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. दरम्यान या (Legislative Council Elections) निवडणूकीत घोडेबाजार मोठ्या प्रमाणावर होणार असल्याची चर्चा आहे. दरम्यान या संपूर्ण प्रक्रियेनंतर १८ जून रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत मतदान पार पडणार असून २१ जून रोजी मतमोजणी केली जाईल.

Related to this topic: