NEET Exam Paper Leaked: पेपरफुटीमुळे नीट यूजी 2026 परीक्षा रद्द करण्यात आली आहे. देशभरातील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी ही परीक्षा 3 मे 2026 रोजी घेण्यात आली होती.
नवी दिल्ली (NEET Exam Paper Leaked) : पेपरफुटीमुळे NEET यूजी 2026 परीक्षा रद्द करण्यात आली. देशभरातील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी ही परीक्षा 3 मे 2026 रोजी घेण्यात आली होती. पेपरफुटी उघडकीस आल्यानंतर आठ दिवसांनी संपूर्ण परीक्षा रद्द करण्यात आली, त्यानंतर लाखो विद्यार्थी आणि त्यांचे पालक रस्त्यावर उतरले. या प्रकरणामुळे पाटणा येथील प्रसिद्ध शिक्षक खान सर संतप्त झाले आहेत.
खान सरांनी नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) वर जोरदार हल्ला चढवला आहे. त्यांनी या (NEET Exam Paper Leaked) घटनेला लाखो विद्यार्थ्यांच्या जीवाला असलेला धोका म्हटले आहे आणि एजन्सीवर विश्वास ठेवणे दिवसेंदिवस कठीण होत चालले आहे, असे म्हटले आहे.
"10 रुपयांचे डायपर आणि पॅम्पर गळत नाहीत, पण..."
खान सर म्हणाले की, ही परिस्थिती अत्यंत दुर्दैवी आहे कारण 2024 मध्येही असेच आरोप समोर आले होते. परंतु केंद्रीय चौकशी होऊनही कोणतेही ठोस परिणाम मिळाले नाहीत. मुलांचे 10 रुपयांचे डायपर आणि पॅम्पर गळत नाहीत, पण त्यांच्या परीक्षेच्या प्रश्नपत्रिका गळतात."
एनटीएवर (NTA) जोरदार हल्ला
संस्थेच्या कार्यपद्धतीबद्दल तीव्र शंका व्यक्त करत, खान सरांनी सुचवले की, नॅशनल टेस्टिंग एजन्सीचे नाव बदलून "कधीही विश्वासार्ह नसलेली संस्था" (Never Trustworthy Agency) असे ठेवावे. त्यांनी आरोप केला की, (NEET Exam Paper Leaked) परीक्षा घ्यायची की प्रश्नपत्रिका फुटू द्यायची, हे ठरवण्यास एनटीए असमर्थ आहे. त्यांनी तपास प्रक्रियेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
खान सरांनी पंतप्रधान मोदींकडे केलीही' मागणी
त्यांनी यावर जोर दिला की दोषींवर कठोर कारवाई केली पाहिजे, कारण त्यांना शिक्षा न झाल्यास अशा घटना पुन्हा पुन्हा घडत राहतील. खान सरांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सर्वोच्च न्यायालयाला या प्रकरणात थेट हस्तक्षेप करण्याचे आवाहन केले आणि सांगितले की यावर तातडीने तोडगा काढणे आवश्यक आहे.
हा लाखो विद्यार्थ्यांच्या जीवनाचा प्रश्न: खान सर
खान सरांनी गरीब कुटुंबांवरील आर्थिक भाराबद्दलही भाष्य केले. ते म्हणाले की, अनेक पालक आपल्या मुलांना शिक्षण आणि (NEET Exam Paper Leaked) परीक्षेसाठी दूरच्या शहरांमध्ये पाठवण्यासाठी कर्ज घेतात. त्यांनी एनटीएवरही निशाणा साधत म्हटले की, "एनटीएसाठी ही केवळ एक पेपरफुटी आहे, पण काहींसाठी हा त्यांच्या संपूर्ण आयुष्याचा प्रश्न आहे."