Breaking News
  • अमेरिका-इराण तणाव: अणुशस्त्रांचा वापर कधीही समर्थनीय नाही- राहुल गांधी
  • गौतम अदानी यांचे 2030 पर्यंत 1 अब्ज टन मालवाहतुकीचे लक्ष्य
  • वैभव सूर्यवंशीची अप्रतिम कामगिरी; बाजारमूल्य 1 कोटीवरून 16 कोटी !
  • इराण-अमेरिका संघर्षात तात्पुरता ब्रेक; दोन आठवड्यांसाठी युद्धविराम
  • स्थलांतरित कामगारांना मोठा दिलासा; आता कनेक्शनशिवाय मिळणार लहान सिलेंडर
  • 'महिलांसाठी 2,000 रुपये आणि शेतकऱ्यांसाठी 15,000 रुपये'
  • दमानिया–अंधारे वाद तापला; ! CDR कुठून आले यावरून आरोप-प्रत्यारोप
  • मदरसे, औरंगजेब कबर आणि शस्त्रांवर टी. राजा सिंहांचे खळबळजनक वक्तव्य
  • पंचतारांकित हॉटेल बनलं ‘हवाला हब’? खरात प्रकरणाला दुबई कनेक्शनचा धक्का

होम > महाराष्ट्र

मुलताई गारपिटी धुमाकूळ

अबब...भर उन्हाळ्यात  बघा मुलताई शहरात बर्फाचे रस्ते

Multai hail and smoke: मुलताई शहरात अचानक गारांचा पाऊस पडल्याने जीवन विस्कळीत झाले. शेतकरी गहू, हरभरा व भाजीपाला पिकांचे नुकसान झाले आहे. प्रशासनाने पंचनाम्याची प्रक्रिया सुरू केली आहे.


अबबभर उन्हाळ्यात  बघा मुलताई शहरात बर्फाचे रस्ते

Multai hail and smoke |

मुलताई शहरात गारांचा रस्ता,शेती व जनजीवनावर मोठा परिणाम

अचानक हवामान बदलामुळे शेतकऱ्यांचे नुकसान; प्रशासनाकडून पंचनाम्याची प्रक्रिया सुरू

मुलताई (Multai hail and smoke) : आज दुपारच्या सुमारास मुलताई शहरातील रस्त्यांवर अक्षरशः  गारांचा पाऊस पडला नागरिकांना चक्क बर्फावरून गाड्या चालवायला लागल्यात. परिसरात अचानक झालेल्या प्रचंड गारपिटीमुळे जनजीवन विस्कळीत झाले असून शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काही वेळ सुरू असलेल्या या (Multai hail and smoke) गारपिटीने शेतकऱ्यांचे उभे पिके अक्षरशः जमीनदोस्त केली.

अचानक बदललेल्या हवामानामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. जोरदार वाऱ्यासह कोसळलेल्या गारांनी (Multai hail and smoke) रस्त्यांवर पांढऱ्या थराचे दृश्य निर्माण झाले होते. अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या तुटल्या असून काही भागात वीजपुरवठाही खंडित झाल्याची माहिती आहे.

विशेषतः गहू, हरभरा व भाजीपाला पिकांना मोठा फटका बसला असून शेतकऱ्यांनी मोठ्या नुकसानाची भीती व्यक्त केली आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासनाने तत्काळ हालचाली सुरू केल्या असून (Multai hail and smoke) नुकसानग्रस्त भागात पंचनामे करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. शेतकऱ्यांना शासनाकडून तातडीने मदत मिळावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.

Related to this topic: