Breaking News
  • राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत आज शेगाव खामगाव दौऱ्यावर
  • लोणावळा–देवले मार्गावर दरड कोसळून मोठ्या प्रमाणात माती आणि दगड रस्त्यावर
  • शाळेच्या प्रांगणात खेळताना विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू; बीडमध्ये खळबळ
  • डॉक्टरांना मारहाण प्रकरणी अटकेत असलेल्या नगरसेवक रमेश म्हात्रे यांना जामीन मंजूर
  • खामगाव ग्रामीण पोलिसांची जुगार अड्ड्यावर धाड; १३ जणांविरुद्ध गुन्हा
  • पाचगणी–महाबळेश्वर रस्त्याची दुरावस्था, खड्ड्यांमुळे रस्त्याची झाली चाळण
  • रत्नागिरी-शहरातील पटवणे फगरवठार रस्ता पुन्हा खचला
  • भंडाऱ्यात तीन वर्षीय बालिकेवरील अत्याचाराच्या घटनेने तीव्र संताप
  • एका दिवसात सोने ८०० रूपये तर चांदी तब्बल ₹ ५ हजारांनी महाग

होम > महाराष्ट्र

MNS Resignation

रायगडमध्ये मनसेला मोठा धक्का; राज ठाकरे यांच्या दौऱ्यापूर्वी अनेक पदाधिकाऱ्यांचे राजीनामे

​​​​​​​राज ठाकरे यांच्या ९ ऑगस्ट रोजी होणाऱ्या रायगड दौऱ्यापूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला जिल्ह्यात मोठा संघटनात्मक धक्का बसला आहे.


रायगडमध्ये मनसेला मोठा धक्का राज ठाकरे यांच्या दौऱ्यापूर्वी अनेक पदाधिकाऱ्यांचे राजीनामे

MNS Resignation |

दक्षिण रायगडमध्ये संघटनात्मक घडामोडींना वेग; नाराज पदाधिकारी भाजप किंवा शिंदेसेनेत जाण्याची चर्चा

राज ठाकरे यांच्या ९ ऑगस्ट रोजी होणाऱ्या रायगड दौऱ्यापूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला जिल्ह्यात मोठा संघटनात्मक धक्का बसला आहे. दौऱ्याला अवघे आठ दिवस शिल्लक असताना जिल्हा पातळीवरील अनेक महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांनी पक्षाच्या पदांसह प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राजीनामा देणाऱ्यांमध्ये मनसेचे माजी रायगड संपर्क अध्यक्ष दिलीप सांगळे, विद्यार्थी सेना रायगड जिल्हाध्यक्ष प्रतिक रहाटे, रोहा तालुका अध्यक्ष बाबू फुलारे तसेच माथाडी अध्यक्ष राजा टेंबे यांचा समावेश आहे. या सर्वांनी आपल्या राजीनाम्याची पत्रे पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे पाठवल्याची माहिती समोर आली आहे.

या घडामोडीमुळे रायगडमधील मनसेच्या संघटनात्मक ताकदीवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेषतः जिल्हास्तरावरील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी एकाच वेळी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतल्याने स्थानिक राजकारणात विविध चर्चांना उधाण आले आहे.

दरम्यान, पक्षात अलीकडे झालेल्या पदाधिकारी फेरबदलांबाबत तसेच कार्यपद्धतीबाबत काही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये नाराजी असल्याचे सांगितले जात आहे. दक्षिण रायगडमध्ये सुरू झालेल्या या राजीनामा सत्रामुळे मनसेसमोर संघटनात्मक आव्हान उभे राहिले आहे.

राजीनामा दिलेल्या पदाधिकाऱ्यांचा पुढील राजकीय निर्णय अद्याप स्पष्ट झालेला नाही. मात्र, ते सत्ताधारी भाजप किंवा शिंदेसेनेत प्रवेश करू शकतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

Related to this topic: