Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > महाराष्ट्र

महाराष्ट्र मुसळधार पाऊस

महाराष्ट्रात पावसाला ब्रेक; पुढील 10 दिवस पावसाचा जोर कमी

Maharashtra Heavy Rainfall: मुंबईसह पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पाऊस, 8 जुलैपासून राज्यातील बहुतांश भागांमध्ये पावसाचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी होणार असून, ही परिस्थिती किमान पुढील 10 दिवस कायम


महाराष्ट्रात पावसाला ब्रेक पुढील 10 दिवस पावसाचा जोर कमी

Maharashtra Heavy Rainfall |

मुंबई ( Maharashtra Heavy Rainfall) : जुलैच्या सुरुवातीला मुंबईसह पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पाऊस झाला असला, तरी राज्यातील अनेक भागांमध्ये अद्याप सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद झाली आहे. विशेषतः धुळे, नंदुरबार, अहिल्यानगर, सोलापूर, पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाची कमतरता कायम आहे.

हवामान विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार 8 जुलैपासून राज्यातील बहुतांश भागांमध्ये पावसाचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी होणार असून, ही परिस्थिती किमान पुढील 10 दिवस कायम राहण्याची शक्यता आहे. या (Maharashtra Heavy Rainfall) काळात राज्यातील बहुतांश भागांत सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याचा अंदाज आहे.

याशिवाय, पावसाचा जोर कमी झाल्यामुळे कमाल तापमानात वाढ होण्याची शक्यता देखील व्यक्त करण्यात आली आहे. प्राथमिक अंदाजानुसार (Maharashtra Heavy Rainfall) जुलै महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात पहिल्या पंधरवड्याच्या तुलनेत पावसाचे प्रमाण कमी राहू शकते.

दरम्यान, कृषी विभागाने शेतकऱ्यांना सावधगिरीचा इशारा दिला असून, ज्या भागांत अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नाही, त्या ठिकाणी जमिनीत पुरेसा ओलावा निर्माण झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

Related to this topic: