Breaking News
  • रायगड पोलिस दलातील ऑस्कर श्वान काळाच्या पडद्याआड
  • Gadchiroli : दिना नदीला पूर; आष्टी–आलापल्ली- सिरोंचा राष्ट्रीय महामार्ग बंद
  • परभणी जिल्ह्यामध्ये सकाळपासूनच दमदार पावसाची हजेरी शेतकऱ्यांना दिलासा
  • ‘रॅपिडो बाईक टॅक्सी’ निर्णयाविरोधात चालक मालक संघटनांचा नवी मुंबईत एल्गार
  • पुणे ग्रामीण जिल्ह्यात ड्रोन उडवण्यासाठी पोलिस परवानगी लागणार
  • दहीहंडी फोडून शिर्डीतील तीन दिवसीय गुरुपौर्णिमा उत्सवाची सांगता
  • नीट परीक्षेचे कारण सांगून देशात अराजकता माजवणे आणि देशाला असुरक्षित करणे या प्रवृत्तीचा निषेध करण्यासाठी मुकमोर्चा
  • लासलगाव पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर रोड रॉबरी; व्हॅगनारची काच फोडून 70 हजारांची रोकड लंपास
  • रत्नागिरी- अरबी समुद्रात चक्राकार आणि बाष्पयुक्त वाऱ्यांचा प्रभाव वाढला

होम > महाराष्ट्र

Maharashtra Rain Alert

महाराष्ट्रात पुढील २४ तास अतिमहत्त्वाचे; पुण्यासह उत्तर महाराष्ट्राला रेड अलर्ट, विदर्भात पावसाचा कहर कायम

राज्यभर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवनावर मोठा परिणाम झाला असून, विशेषतः विदर्भात परिस्थिती गंभीर बनली आहे.


महाराष्ट्रात पुढील २४ तास अतिमहत्त्वाचे पुण्यासह उत्तर महाराष्ट्राला रेड अलर्ट विदर्भात पावसाचा कहर कायम

Maharashtra Rain Alert |

कमी दाबाच्या क्षेत्राचा प्रभाव कायम; पुणे, नाशिक, धुळे, जळगावमध्ये मुसळधार पावसाचा इशारा, नदी-नाल्यांना पूर आल्याने प्रशासन सतर्क

मुंबई : राज्यभर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवनावर मोठा परिणाम झाला असून, विशेषतः विदर्भात परिस्थिती गंभीर बनली आहे. अनेक नद्यांना आणि नाल्यांना पूर आल्याने काही गावांचा संपर्क तुटला असून नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. अशा पार्श्वभूमीवर हवामान विभागाने पुढील २४ तास महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्त्वाचे असल्याचा इशारा दिला आहे.

पुणे हवामान केंद्राने दिलेल्या माहितीनुसार, पश्चिम विदर्भ आणि मध्य महाराष्ट्र परिसरात निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र पश्चिमेकडे सरकल्यामुळे राज्यातील अनेक भागांत जोरदार पावसाची स्थिती कायम आहे. पुढील २४ तास पुणे तसेच उत्तर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. मात्र त्यानंतर पावसाची तीव्रता कमी होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

पावसाच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील घाटमाथा भागासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला असून, पुणे शहरासाठी ऑरेंज अलर्ट घोषित करण्यात आला आहे. तसेच उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे आणि जळगाव या जिल्ह्यांनाही पुढील २४ तासांसाठी रेड अलर्ट देण्यात आला असल्याची माहिती पुणे वेधशाळेने दिली आहे.

यंदा मान्सूनचे आगमन उशिरा झाले असले तरी पाटबंधारे विभागाच्या माहितीनुसार राज्यातील अनेक धरणांमध्ये समाधानकारक पाणी साठा झाला असून ही बाब दिलासादायक मानली जात आहे.

दरम्यान, नाशिक जिल्ह्यातही मुसळधार पावसाचा जोर कायम असून अनेक नदी-नाल्यांना पूर आला आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून नागरिकांनी आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवले जात आहे.

नागपूरमध्येही मुसळधार पावसामुळे अनेक सखल भागांमध्ये पाणी साचल्याची परिस्थिती निर्माण झाली असून प्रशासनाने आवश्यक उपाययोजना सुरू ठेवल्या आहेत.

Related to this topic: