Breaking News
  • बदलापुरात तुकाराम मुंडे यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक
  • देशाची शिक्षणव्यवस्था बदलावी लागेल- राहुल गांधी
  • मंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसकडून सांगलीत जल्लोष
  • आषाढी निमित्त काढण्यात आलेल्या रथ उत्सवात प्रयास मित्र मंडळाने देखाव्यातून मांडले 'नीट' पेपर फुटीचे दाहक वास्तव
  • युवकांनी सरकारला नैतिक जबाबदारी स्वीकारायला भाग पाडलं - शरद पवार
  • TET पेपर फुटी प्रकरणातील मास्टर माईंड बिजेदरं कुमार गुप्ता सह इंद्रजित सिंग ला 30 जुलै पर्यंत पोलीस कोठडी
  • केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनाम्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये विद्यार्थ्यांसह विविध संघटनेचा जल्लोष....
  • छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज भागातील प्रति पंढरपूर येथे विठ्ठल भक्तांची गर्दी
  • संभाजीनगरच्या प्रति पंढरपूर येथे मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते सुरू विठ्ठल रुक्माईची पूजा

होम > महाराष्ट्र

लपीजी तुटवड्यामुळे वाहनचालक हैराण ; ₹75 वरून ₹125 पर्यंत दरवाढ

शहरात वाहनांसाठी वापरल्या जाणाऱ्या एलपीजी (Auto LPG) गॅसचा तुटवडा निर्माण झाल्याने परिस्थिती गंभीर बनली आहे.


लपीजी तुटवड्यामुळे वाहनचालक हैराण  ₹75 वरून ₹125 पर्यंत दरवाढ

Dhule Crisis |

धुळे मध्ये एलपीजी टंचाईचा फटका; दरवाढीमुळे वाहनधारक व रिक्षाचालक संकटात

धुळे (Dhule Crisis) : शहरात वाहनांसाठी वापरल्या जाणाऱ्या एलपीजी (Auto LPG) गॅसचा तुटवडा निर्माण झाल्याने परिस्थिती गंभीर बनली आहे. गॅसचा पुरवठा कमी झाल्याने काही ठिकाणी दरात मोठी उसळी दिसून येत असून, ₹75 वरून थेट ₹125 पर्यंत दर आकारला जात असल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत. ही वाढ अधिकृत नसून टंचाई आणि अनियमित व्यवहारांमुळे होत असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

शहरातील एलपीजी पंपांवर मागील काही दिवसांपासून गॅस मिळवण्यासाठी वाहनांची मोठी गर्दी होत आहे. अनेक चालकांना तासन्‌तास प्रतीक्षा करूनही गॅस मिळत नसल्याने दैनंदिन कामकाजावर परिणाम होत आहे. विशेषतः रिक्षा आणि टॅक्सी चालकांना याचा सर्वाधिक फटका बसत असून त्यांच्या उत्पन्नावर थेट परिणाम होत आहे.

दरम्यान, अधिकृत दर ₹40 ते ₹50 प्रति किलो दरम्यान असताना प्रत्यक्षात अधिक दर आकारला जात असल्याने वाहनधारकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. वाढत्या खर्चामुळे काही रिक्षाचालकांनी प्रवासी भाड्यात सुमारे ₹10 वाढ केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे प्रवाशांनाही अतिरिक्त आर्थिक भार सहन करावा लागत आहे.

रिक्षाचालकांच्या म्हणण्यानुसार, एलपीजीचा नियमित पुरवठा खंडित झाल्याने वाहतूक सेवा विस्कळीत होण्याची भीती निर्माण झाली आहे. घरगुती वापरासोबतच वाहनांसाठी आवश्यक गॅसही पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून देणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून गॅसचा पुरवठा सुरळीत करावा, काळाबाजारावर आळा घालावा आणि दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांसह वाहनचालकांकडून जोर धरत आहे.

Related to this topic: