Breaking News
  • अमेरिका-इराण तणाव: अणुशस्त्रांचा वापर कधीही समर्थनीय नाही- राहुल गांधी
  • गौतम अदानी यांचे 2030 पर्यंत 1 अब्ज टन मालवाहतुकीचे लक्ष्य
  • वैभव सूर्यवंशीची अप्रतिम कामगिरी; बाजारमूल्य 1 कोटीवरून 16 कोटी !
  • इराण-अमेरिका संघर्षात तात्पुरता ब्रेक; दोन आठवड्यांसाठी युद्धविराम
  • स्थलांतरित कामगारांना मोठा दिलासा; आता कनेक्शनशिवाय मिळणार लहान सिलेंडर
  • 'महिलांसाठी 2,000 रुपये आणि शेतकऱ्यांसाठी 15,000 रुपये'
  • दमानिया–अंधारे वाद तापला; ! CDR कुठून आले यावरून आरोप-प्रत्यारोप
  • मदरसे, औरंगजेब कबर आणि शस्त्रांवर टी. राजा सिंहांचे खळबळजनक वक्तव्य
  • पंचतारांकित हॉटेल बनलं ‘हवाला हब’? खरात प्रकरणाला दुबई कनेक्शनचा धक्का

होम > महाराष्ट्र

लपीजी तुटवड्यामुळे वाहनचालक हैराण ; ₹75 वरून ₹125 पर्यंत दरवाढ

शहरात वाहनांसाठी वापरल्या जाणाऱ्या एलपीजी (Auto LPG) गॅसचा तुटवडा निर्माण झाल्याने परिस्थिती गंभीर बनली आहे.


लपीजी तुटवड्यामुळे वाहनचालक हैराण  ₹75 वरून ₹125 पर्यंत दरवाढ

Dhule Crisis |

धुळे मध्ये एलपीजी टंचाईचा फटका; दरवाढीमुळे वाहनधारक व रिक्षाचालक संकटात

धुळे (Dhule Crisis) : शहरात वाहनांसाठी वापरल्या जाणाऱ्या एलपीजी (Auto LPG) गॅसचा तुटवडा निर्माण झाल्याने परिस्थिती गंभीर बनली आहे. गॅसचा पुरवठा कमी झाल्याने काही ठिकाणी दरात मोठी उसळी दिसून येत असून, ₹75 वरून थेट ₹125 पर्यंत दर आकारला जात असल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत. ही वाढ अधिकृत नसून टंचाई आणि अनियमित व्यवहारांमुळे होत असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

शहरातील एलपीजी पंपांवर मागील काही दिवसांपासून गॅस मिळवण्यासाठी वाहनांची मोठी गर्दी होत आहे. अनेक चालकांना तासन्‌तास प्रतीक्षा करूनही गॅस मिळत नसल्याने दैनंदिन कामकाजावर परिणाम होत आहे. विशेषतः रिक्षा आणि टॅक्सी चालकांना याचा सर्वाधिक फटका बसत असून त्यांच्या उत्पन्नावर थेट परिणाम होत आहे.

दरम्यान, अधिकृत दर ₹40 ते ₹50 प्रति किलो दरम्यान असताना प्रत्यक्षात अधिक दर आकारला जात असल्याने वाहनधारकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. वाढत्या खर्चामुळे काही रिक्षाचालकांनी प्रवासी भाड्यात सुमारे ₹10 वाढ केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे प्रवाशांनाही अतिरिक्त आर्थिक भार सहन करावा लागत आहे.

रिक्षाचालकांच्या म्हणण्यानुसार, एलपीजीचा नियमित पुरवठा खंडित झाल्याने वाहतूक सेवा विस्कळीत होण्याची भीती निर्माण झाली आहे. घरगुती वापरासोबतच वाहनांसाठी आवश्यक गॅसही पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून देणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून गॅसचा पुरवठा सुरळीत करावा, काळाबाजारावर आळा घालावा आणि दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांसह वाहनचालकांकडून जोर धरत आहे.

Related to this topic: