Breaking News
  • राज्यात मान्सूनची संथ वाटचाल, हवामान विभागाचा शेतकऱ्यांना पेरणीत घाई न करण्याचा सल्ला
  • तुळजाभवानी मंदिर परिसरात थुंकणाऱ्या १८ जणांवर कारवाई;९ हजारांचा दंड वसूल
  • शेगाव शहरात लाखो भाविकांच्या आरोग्याशी खेळ,भेसळयुक्त खाद्यपदार्थांची सर्रास विक्री
  • रत्नागिरी आरटीओच्या ‘वायुवेग पथका’कडून वर्षभरात ३ कोटी ३३ लाखांचा दंड वसूल
  • आमच्या परिसरातील नळाला पाणी का सोडलं नाही...? असा जाब ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला विचारला असता, कर्मचाऱ्याने गावातील लोकांना जमवून गावातीलच पारधी वस्तीवर हल्ला करून जवळपास 11 घरांची तोडफोड केली
  • मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्तक्षेपानंतर नाशिक विधान परिषदेच्या निवडणुकीतून गोकुळ गिते माघार घेणार असल्याची शक्यता आहे.
  • मुंबईतील गगनचुंबी टॉवर आणि झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या नागरिकांसाठी एकच दर न ठेवता आता वेगवेगळा रेडीरेकनर दर आकारला जाणार आहे.
  • वाशिममध्ये शिवशाही बसचा अपघात, चालकाचे नियंत्रण सुटल्यानं घडला अनर्थ
  • हिंगोलीच्या कळमनुरी मध्ये गॅस एजन्सीच्या बाहेर ग्राहकांनी गोंधळ घातला आहे

होम > क्राईम जगत

लातूर शेतकरी गुन्हा दाखल

बैलजोडी खरेदी करून गावी चालत जात असलेल्या शेतकऱ्यावरच गुन्हा दाखल!

Latur Farmer Crime: लातूर जिल्ह्यातील अरजखेडा येथील शेतकऱ्यांनी बैलजोडी खरेदी केली आणि गावाकडे पाठीमागे जाताना त्यांना पोलिसांनी रोखले. पोलिसांनी बैलांचे गोरक्षण


बैलजोडी खरेदी करून गावी चालत जात असलेल्या शेतकऱ्यावरच गुन्हा दाखल 

Latur Farmer Crime |

 

लातूरात चोर सोडून सन्यास्याला फाशी चा प्रत्यय?

लातूर (Latur Farmer Crime) : अरजखेडा येथील शेतकरी भीमराव सूर्यवंशी आणि त्यांचा मुलगा महेश सूर्यवंशी हे दोघे पाटोदा येथील बाजारातून शेतीसाठी बैलजोडी खरेदी करून आपल्या अरजखेडा गावाकडे पायी निघाले होते. त्यांच्या हातात ग्रामपंचायतीचे अधिकृत जनावर खरेदी-विक्री दाखले होते… तरीही वाटेत त्यांना अडवण्यात आले. खोपेगाव परिसरात काही बजरंग दल पदाधिकाऱ्यांनी त्यांची चौकशी सुरू केली. “बैल कुठे नेताय?” “कशासाठी नेताय?” असे सवाल करत त्यांना बराच वेळ रोखून ठेवले.

धक्कादायक म्हणजे… शेतकऱ्यांनी (Latur Farmer Crime) सर्व कागदपत्रे दाखवूनही त्यांना सोडण्यात आलं नाही. यानंतर राजीव गांधी चौकात पुन्हा त्यांना अडवण्यात आलं. वाढता तणाव पाहून महेश सूर्यवंशी यांनी थेट पोलिस हेल्पलाईनला फोन केला. विवेकानंद पोलिस स्टेशनचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले… मात्र कारवाई अडवणाऱ्यांवर नव्हे, तर बैलजोडी घेऊन जाणाऱ्या शेतकऱ्यांवरच गुन्हा दाखल करून जनावरे गोरक्षणात पाठवण्यात आले आहे. त्यामुळे "चोर सोडून सन्यास्याला फाशी" अशी हकिकत शेतकऱ्यांच्या नशीब आली आहे. 

“शेतीसाठी बैल खरेदी करणाऱ्या शेतकऱ्यांनाच गुन्हेगार (Latur Farmer Crime) ठरवलं जात असेल, तर सामान्य शेतकऱ्यांनी जगायचं कसं?” असा संतप्त सवाल आता उपस्थित होत आहे. सध्या खरीप हंगामासाठी बैलजोडी खरेदी करणे, खत बि बियाणे याची तजवीज शेतकरी करत आहेत. त्यातच आरजखेडा येथील शेतकरी भिमराव सुर्यवंशी पिता, पुत्र यांनी पाटोदा येथील बाजारातून बैलजोडी खरेदी करून पायी गावाकडे जाताना त्यांच्यावर हा प्रसंग ओढावला आहे. जर शेतकऱ्यांवर नाहक गोरक्षाकातर्फे  होणारा त्रास सहन केला जाणार नाही.यावर आवाज उठवला जाईल असे शिवसेनेचे कुलदीप सूर्यवंशी यांनी सांगितले आहे.

Related to this topic: