Breaking News
  • बदलापुरात तुकाराम मुंडे यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक
  • देशाची शिक्षणव्यवस्था बदलावी लागेल- राहुल गांधी
  • मंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसकडून सांगलीत जल्लोष
  • आषाढी निमित्त काढण्यात आलेल्या रथ उत्सवात प्रयास मित्र मंडळाने देखाव्यातून मांडले 'नीट' पेपर फुटीचे दाहक वास्तव
  • युवकांनी सरकारला नैतिक जबाबदारी स्वीकारायला भाग पाडलं - शरद पवार
  • TET पेपर फुटी प्रकरणातील मास्टर माईंड बिजेदरं कुमार गुप्ता सह इंद्रजित सिंग ला 30 जुलै पर्यंत पोलीस कोठडी
  • केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनाम्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये विद्यार्थ्यांसह विविध संघटनेचा जल्लोष....
  • छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज भागातील प्रति पंढरपूर येथे विठ्ठल भक्तांची गर्दी
  • संभाजीनगरच्या प्रति पंढरपूर येथे मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते सुरू विठ्ठल रुक्माईची पूजा

होम > शेती

विषारी औषध टाकल्याने तिन जनावरे मरण पावली; शेतकऱ्यांच मोठे नुकसान

Poisonous Drug Death: आखाडा बाळापूरमधील शेतकऱ्यांचा शेडमध्ये बांधलेले तीन पशुधन विषारी औषधामुळे मरण पावले. यामुळे शेतकऱ्यांना लाखो रूपयांचे नुकसान झाले. पोलीस तपास करत आहे.


विषारी औषध टाकल्याने तिन जनावरे मरण पावली शेतकऱ्यांच मोठे नुकसान

Poisonous Drug Death |

आखाडा बाळापूर (Poisonous Drug Death) : येथील शेतशिवारातील आखाड्यावरील शेडमध्ये नेहमीप्रमाणे बांधून ठेवलेल्या जनावरांना कोणीतरी अज्ञात इसमाने विषारी औषध टाकल्याने किंवा इतर कारणांमुळे तीन जनावरे मरण पावली यामुळे शेतकऱ्यांचे एक ते सव्वा लाख रूपयाचे नुकसान झाले आहे. याबाबत अज्ञात आरोपीविरुद्ध आज सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आला.

 याबाबत मिळालेल्या माहितीनुसार आखाडा बाळापूरात गावा लगत राम विनायक बोंढारे यांचे शेत व शेतातील शेडमध्ये नेहमीप्रमाणे त्यांनी जनावरे बांधली होती. यात बांधून ठेवलेल्या म्हशीच्या तिन वघारू यांना 10मे रोजी सकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास कोणीतरी अज्ञात इसमाने विषारी औषध (Poisonous Drug Death) टाकल्याने किंवा इतर कोणत्यातरी कारणांमुळे तिन्ही वघारू मरुन शेतकऱ्यांच लाख ते सव्वा लाख रूपयाच नुकसान झाले आहे. याबाबत राम बोंढारे फीर्यादीवरून अज्ञात आरोपी विरूद्ध आखाडा बाळापूर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात येउन पोलीस निरीक्षक विष्णुकांत गुठ्ठे मार्गदर्शनखाली पोलीस पुढील तपास करत आहेत.

सदर प्रकार अत्यंत गंभीर असुन शेतकऱ्यांनी जीवापाड जपलेल्या पशुधनाचा असा अचानक अंत होउन शेतकऱ्याच मोठे नुकसान झाले आहे. पोलिसांनी याबाबत तातडीने तपास करून प्रकरणाचा छडा लावण्याची मागणी केली जाते.

Related to this topic: