Breaking News
  • राज्यात मान्सूनची संथ वाटचाल, हवामान विभागाचा शेतकऱ्यांना पेरणीत घाई न करण्याचा सल्ला
  • तुळजाभवानी मंदिर परिसरात थुंकणाऱ्या १८ जणांवर कारवाई;९ हजारांचा दंड वसूल
  • शेगाव शहरात लाखो भाविकांच्या आरोग्याशी खेळ,भेसळयुक्त खाद्यपदार्थांची सर्रास विक्री
  • रत्नागिरी आरटीओच्या ‘वायुवेग पथका’कडून वर्षभरात ३ कोटी ३३ लाखांचा दंड वसूल
  • आमच्या परिसरातील नळाला पाणी का सोडलं नाही...? असा जाब ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला विचारला असता, कर्मचाऱ्याने गावातील लोकांना जमवून गावातीलच पारधी वस्तीवर हल्ला करून जवळपास 11 घरांची तोडफोड केली
  • मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्तक्षेपानंतर नाशिक विधान परिषदेच्या निवडणुकीतून गोकुळ गिते माघार घेणार असल्याची शक्यता आहे.
  • मुंबईतील गगनचुंबी टॉवर आणि झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या नागरिकांसाठी एकच दर न ठेवता आता वेगवेगळा रेडीरेकनर दर आकारला जाणार आहे.
  • वाशिममध्ये शिवशाही बसचा अपघात, चालकाचे नियंत्रण सुटल्यानं घडला अनर्थ
  • हिंगोलीच्या कळमनुरी मध्ये गॅस एजन्सीच्या बाहेर ग्राहकांनी गोंधळ घातला आहे

होम > शेती

विषारी औषध टाकल्याने तिन जनावरे मरण पावली; शेतकऱ्यांच मोठे नुकसान

Poisonous Drug Death: आखाडा बाळापूरमधील शेतकऱ्यांचा शेडमध्ये बांधलेले तीन पशुधन विषारी औषधामुळे मरण पावले. यामुळे शेतकऱ्यांना लाखो रूपयांचे नुकसान झाले. पोलीस तपास करत आहे.


विषारी औषध टाकल्याने तिन जनावरे मरण पावली शेतकऱ्यांच मोठे नुकसान

Poisonous Drug Death |

आखाडा बाळापूर (Poisonous Drug Death) : येथील शेतशिवारातील आखाड्यावरील शेडमध्ये नेहमीप्रमाणे बांधून ठेवलेल्या जनावरांना कोणीतरी अज्ञात इसमाने विषारी औषध टाकल्याने किंवा इतर कारणांमुळे तीन जनावरे मरण पावली यामुळे शेतकऱ्यांचे एक ते सव्वा लाख रूपयाचे नुकसान झाले आहे. याबाबत अज्ञात आरोपीविरुद्ध आज सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आला.

 याबाबत मिळालेल्या माहितीनुसार आखाडा बाळापूरात गावा लगत राम विनायक बोंढारे यांचे शेत व शेतातील शेडमध्ये नेहमीप्रमाणे त्यांनी जनावरे बांधली होती. यात बांधून ठेवलेल्या म्हशीच्या तिन वघारू यांना 10मे रोजी सकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास कोणीतरी अज्ञात इसमाने विषारी औषध (Poisonous Drug Death) टाकल्याने किंवा इतर कोणत्यातरी कारणांमुळे तिन्ही वघारू मरुन शेतकऱ्यांच लाख ते सव्वा लाख रूपयाच नुकसान झाले आहे. याबाबत राम बोंढारे फीर्यादीवरून अज्ञात आरोपी विरूद्ध आखाडा बाळापूर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात येउन पोलीस निरीक्षक विष्णुकांत गुठ्ठे मार्गदर्शनखाली पोलीस पुढील तपास करत आहेत.

सदर प्रकार अत्यंत गंभीर असुन शेतकऱ्यांनी जीवापाड जपलेल्या पशुधनाचा असा अचानक अंत होउन शेतकऱ्याच मोठे नुकसान झाले आहे. पोलिसांनी याबाबत तातडीने तपास करून प्रकरणाचा छडा लावण्याची मागणी केली जाते.

Related to this topic: