Breaking News
  • सलग दुसऱ्या दिवशी शिंदखेडा शहरासह जिल्हात विविध ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी
  • पुण्यात कोयत्याची दहशत कायम, हातात कोयता आणि बंदूक घेऊन तरुणाने पसरवली दहशत
  • अकोला जिल्ह्यातील अकोट नगर परिषदमधील प्रभाग 4 मध्ये भाजपचा दुहेरी विजय
  • अकोला जिल्ह्यातील पातुर नगरपालिकेवर काँग्रेस- शिवसेना उबाठा आघाडीचे वर्चस्व
  • गडचिरोली नगर परिषदेच्या पोटनिवडणुकीत 264 मतांनी भाजपचे अंकुश नैताम विजयी
  • भरत गोगावले पालक मंत्री होणार यात शंका नाही - आमदार महेंद्र थोरवे
  • रायगड जिल्ह्यातील स्विमिंग पूल 30 जून पर्यंत बंद ठेवण्यासंबंधी रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी आदेश जारी केले आहेत.
  • गडचिरोलीत 5 परीक्षा केंद्रांवर नीट-यूजीची फेरपरीक्षा सुरू
  • पुणे शहराला दिलासा! मध्यवर्ती भागासह उपनगरात पावसाला सुरुवात

होम > शेती

वादळी वार्‍याने  शेतकऱ्यांना नुकसान

परभणीत पंचनामे सादर करण्यातबाबत कृषीमंत्र्यांचे अधिकार्‍यांना आदेश

Stormy Winds Damage: परभणी जिल्ह्यात वादळी पाऊस आणि वार्याने शेतकऱ्यांचे बागायती, केळी शेती आणि बिजलीचे पोल पडले. कृषी मंत्री दत्ता भरणे यांनी नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश अधिकार्यांना दिले.


परभणीत पंचनामे सादर करण्यातबाबत कृषीमंत्र्यांचे अधिकार्‍यांना आदेश

Stormy Winds Damage |

परभणी जिल्ह्यात वादळी वार्‍याने नुकसान; आ. विटेकर यांनी व्हिडीओ कॉलद्वारे मांडली वस्तुस्थिती

परभणी (Stormy Winds Damage) : जिल्ह्यात काल झालेल्या वादळी पाऊस आणि वार्‍यामुळे मानवत तालुक्यातील पिंपळा व मांडेवडगाव, परभणी तालुक्यातील पोखर्णी, मांडाखळी,  इंदेवाडी , सुक्रेवाडी , व इतर परिसरातील अनेक शेतकर्‍यांच्या बागायती तसेच केळी शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच बर्‍याच ठिकाणी विजेचे पोल सुद्धा पडले होते. या पार्श्वभूमीवर आ. राजेश विटेकर यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. व्हिडीओ कॉलद्वारे कृषीमंत्री दत्ता भरणे यांना वस्तुस्थिती दाखवली. तेव्हा कृषीमंत्र्यांनी  नुकसानीचे पंचनामे करुन अहवाल सादर करण्याचे आदेश अधिकार्‍यांना दिले.

आ. राजेश विटेकर यांनी रविवारी नुकसानग्रस्त भागातील शेतकर्‍यांची प्रत्यक्ष भेट घेतली. त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. त्यांच्या चेहर्‍यावरची चिंता आणि डोळ्यातील वेदना पाहून,  या संकटाच्या काळात त्यांना धीर देत संबंधित महसूल व कृषी विभागाच्या अधिकार्‍यांना तात्काळ पंचनामे करून कोणताही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही, याची काळजी घेण्याच्या सूचना दिल्या. तसेच कृषी मंत्री दत्ता भरणे यांना केळी व (Stormy Winds Damage) इतर पिकांचे नुकसान थेट व्हिडीओ कॉल करून दाखवले. यावेळी उपस्थित तहसीलदार व तालुका कृषी अधिकारी यांना कृषी मंत्री बोलले.

शेतकरी हा केवळ अन्नदाता नाही, तर आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. त्याच्या कष्टाचा सन्मान राखणे आणि संकटाच्या प्रत्येक क्षणी त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे ही शासन व प्रशासन यांची नैतिक जबाबदारी आहे. नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना लवकरात लवकर योग्य ती आर्थिक मदत मिळावी यासाठी तुम्ही तत्काळ पंचनामे करून शासनाकडे सादर करावेत, आताच कामाला लागा, असे कृषी मंत्री यांनी त्या अधिकार्‍यांना दिले स्पष्ट आदेश दिले. याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य, सरपंच, पदाधिकारी तहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, संबंधित विभागाचे कर्मचारी व शेतकरी उपस्थित होते.

Related to this topic: