Farmer's suicide: कुरूंदा येथील ४० वर्षीय शेतकरी गजानन माणिकराव दळवी यांनी कर्जाच्या चिंतेतून विषारी औषध पिऊन आत्महत्या केली. त्यांच्या शेतात नापिकी व आर्थिक अडचणींमुळे ही घटना घडली.
कुरूंदा (Farmer's suicide) : शेतातील नापिकी व कर्जाला कंटाळून ४० वर्षीय शेतकर्याने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना घडली. याबाबत कुरूंदा पोलिसात १ एप्रिलला आकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली. याबाबत पोलिस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, कुरूंदा येथील गजानन माणिकराव दळवी (४०) या शेतकर्याला कुरूंदा शिवारात साडे चार एकर शेती असुन त्यावरच कुटूंबीयांची उपजिवीका चालते. या शेतीवर त्यांनी कुरूंदा शाखेतील महाराष्ट्र ग्रामीण बँकेतून २ वर्षापूर्वी १ लाख ४८ हजार रुपयाचे कर्ज घेतले होते. मागील २ वर्षापासून नापिकीमुळे कर्ज कसे फिटावे अशी चिंता त्यांना लागली होती. यंदा त्यांनी शेतामध्ये केळीचे २ हजार झाडे लावली होती.
केळीचे घड विक्रीसाठी आले असताना आखाती युध्दामुळे केळीलाही दर मिळनेसा झाला. त्यामुळे व्यापार्यांनीही केळी विक्रीकडे पाठ फिरविली. या दरम्यान २ हजार केळीचे घड शेतातच पिकले. त्यातच सोयाबीन केवळ २ क्विंटल झाले. लागवडीचा खर्चही निघाला नसल्याने ते मागील काही दिवसापासून चिंतेत होते. यातच त्यांनी शेतामध्ये विषारी औषध पिले असता काही जणांच्या निर्दशनास येताच त्यांना तात्काळ उपचारासाठी रूग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तपासून त्यांचा मृत्यू झाल्याचे जाहीर केले. या (Farmer's suicide) प्रकरणी कुरूंदा पोलिसात कामाजी दळवी यांनी दिलेल्या माहितीवरून आकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली. पुढील तपास भगवा वडकिल्ले हे करीत आहेत. दरम्यान गजानन दळवी यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, आई - वडील, भाऊ असा परिवार आहे.