Breaking News
  • वर्धा जिल्ह्यात मागील २४ तासांपासून संततधार व रिमझिम पावसाची हजेरी
  • दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल उद्धव ठाकरेंची भेट घेणार
  • मनोज जरांगे आभिजीत दिपकेंच्या भेटीला
  • नाशिकमध्ये मनसेचं आंदोलन
  • बुलढाण्यात जंतर-मंतर लाठीचार्जचे तीव्र पडसाद; विद्यार्थ्यांची सरकारविरोधात स्वाक्षरी मोहीम
  • ठाकूरबुवांच्या समाधीस्थळी माऊलींचे तिसरे गोल रिंगण भक्तिरसात रंगले
  • जे.पी नड्डा, जितेंद्र सिंह आंदोलकांची भेट घेणार
  • पुणे शहरात सायबर चोरट्यांचा सुळसुळाट; एकाच दिवसात ४२ गुन्ह्यांची नोंद
  • पावसाची दडी, पाणी स्रोत आटले; टोमॅटो पिकाला टँकरने पाणी देण्याची शेतकऱ्यांवर वेळ

होम > शेती

हडोळती पवार शेतकरी

​अखेर सहकार मंत्र्यांनी दिलेला शब्द पाळला!

Hadolti Pawar Farmer: बैलबारदाण्याचा खर्च परवडत नसल्याने खांद्यावर जोखड घेऊन शेतीची आंतरमशागत करणाऱ्या अहमदपूर तालुक्यातील हडोळती येथील शेतकरी अंबादास पवार व मुक्ताबाई पवार या दांपत्याने निर्णय..


​अखेर सहकार मंत्र्यांनी दिलेला शब्द पाळला 

Hadolti Pawar Farmer |

 

५६ लाख शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे हडोळतीच्या पवार दांपत्याकडून स्वागत!

​बलभीम पवार
अहमदपूर (Hadolti Pawar Farmer) :
बैलबारदाण्याचा खर्च परवडत नसल्याने खांद्यावर जोखड घेऊन शेतीची आंतरमशागत करणाऱ्या अहमदपूर तालुक्यातील हडोळती येथील शेतकरी अंबादास पवार व मुक्ताबाई पवार या दांपत्याने सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. बाबासाहेब पाटील यांनी दिलेला शब्द पाळला, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

गेल्या वर्षी बैल-बारदानण्याचा खर्च परवडत नसल्याने स्वतःलाच कोळपणीला जुंपून पवार दाम्पत्याने पिकांच्या आंतरमशागतीची कामे केली होती. ज्याची गंभीर दखल घेत दैनिक ‘देशोन्नती’ने उठवलेल्या आवाजामुळे हे प्रकरण विधानसभेत प्रचंड गाजले होते आणि संपूर्ण देशात खळबळ उडाली होती.

या (Hadolti Pawar Farmer) घटनेची तात्काळ दखल घेऊन राज्याचे सहकार मंत्री नामदार बाबासाहेब पाटील यांनी संबंधित शेतकऱ्याचे वैयक्तिक कर्ज भरून मदतीचा हात दिला होता, मात्र त्यावेळी पवार दांपत्याने "साहेब, माझं एकट्याचे कर्ज फेडून चालणार नाही, तर राज्यातील सर्वच शेतकऱ्यांची अवस्था बिकट असून त्यांना कर्जमुक्तीचा आधार द्यावा," अशी आग्रही मागणी केली होती.

यावर महायुती सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तत्कालीन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व एकनाथराव शिंदे यांच्याकडे पाठपुरावा करून सर्वसमावेशक कर्जमाफीचा निर्णय घेऊ, असा शब्द सहकार मंत्र्यांनी दिला होता. "बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले" या संत तुकाराम महाराजांच्या उक्तीप्रमाणे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी दिलेला शब्द पाळत राज्यातील ५६ लाख शेतकऱ्यांना नुकतीच कर्जमाफी जाहीर केली असून, त्याची प्रत्यक्ष यादी आज विविध बँकांमध्ये धडकल्याने शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण पसरले आहे आणि अंबादास पवार दांपत्याने शासनाचे व सहकार मंत्र्यांच्या निर्णयाचे याबद्दल स्वागत केले आहे. 

केवळ कर्जमाफी करून शेतकऱ्यांचा प्रश्न पूर्णपणे सुटणार नसल्याने आगामी काळात शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर आधारित शेतीमालाला योग्य भाव देण्यासाठी शासनाने व सहकार मंत्र्यांनी पुढाकार घ्यावा, अशी रास्त मागणी आता (Hadolti Pawar Farmer) शेतकरी वर्गातून जोर धरू लागली आहे.

पावसाअभावी शेतकरी संकटात!

सध्या लातूर जिल्ह्यासह अहमदपूर तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असून पावसाच्या अभावाने पिके कोमेजत आहेत, तर काही ठिकाणी अद्याप पेरण्याही झाल्या नसल्याने शेतकरी प्रचंड आर्थिक संकटात सापडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे शासनाने तातडीने विविध स्तरांवरून उपाययोजना आखून बळीराजाला दिलासा द्यावा, अशी मागणी केली जात आहे.

Related to this topic: