Grain Supply Crisis: कामठी, मौदा, और रामटेक से धान्य पुरवठा कम होने के कारण पारशिवनी में दुकानदारों ने आपूर्ति में सुधार की मांग की है।
कामठी, मौदा, रामटेक गोडावुन मधुन येणारा धान्य माल कमी व वेळेवर पुरवठा नाही
कन्हान (Grain Supply Crisis) : पारशिवनी तालुका शहरी रास्त भाव दुका नदाराना कामठी, मौदा व रामटेक गोडावुन मधुन येणा रा धान्य कमी आणि वेळेवर मिळत नसुन तीन महिन्या चे वाटप असताना सुध्दा आता पर्यंत पुरवठा नसुन धान्य पोत्या मध्ये माल कमी येतो करिता अगोदर पार शिवनी गोडावुन मधुन माल पुरवठा होता तेव्हा कोण त्याही प्रकारची अडचण नसल्याने पुर्वरत पारशिवनी गोडावुन मधुन धान्य पुरवठा करण्याची मागणी रास्त भाव दुकानदार संघटना व्दारे मा. तहसिलदार पारशि वनी हयाना निवेदन देऊन करण्यात आली.
पारशिवनी तालुक्यातील शहरात घेतलेल्या रास्त भाव दुकानदाराना कामठी, मौदा व रामटेक या गोडावुन मधुन येणारा धान्य माल कमी आणि वेळेवर मिळत नसुन तीन महिन्याचे वाटप असताना सुध्दा आता पर्यंत पुरवठा झालेला नाही. या गोडावुन मधुन येणा-या (Grain Supply Crisis) धान्य पोत्या मध्ये माल कमी येत करिता अगो दर आम्हा शहरी राशन दुकानदाराना पारशिवनी गोडा वुन मधुन माल पुरवठा येत होता तेव्हा कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण झाली नाही. आज तीन महि न्याच्या वाटप मध्ये गहु आहे तर मक्का नाही. तांदुळ नाही, साखर नाही.
मे महिन्याची ११ तारीख ओलाडुन गेली तरी मक्का, तांदुळ व साखरेचा पत्ता नाही. तेच पारशिवनी ग्रामिण चा तीन महिन्याचा वाटप होऊन संपला आहे. करिता पारशिवनी तालुक्यातील शहरी रास्त भाव दुकानदाराना पुर्वरत पारशिवनी गोडावुन धान्य पुरवठा (Grain Supply Crisis) करण्याची मागणी मा. सुभाष वाघचौर तहसिलदार पारशिवनी हयाना रास्त भाव दुकानदार संघटना तालुका पारशिवनी च्या शिष्टमंडळाने निवेदन देऊन केली आहे. याप्रसंगी संघटनेचे अध्यक्ष रूपेश बोंदरे, उपाध्यक्ष सुनिता मानकर, श्रीमती शकुंतला ककड, हदराज मदनानी, जी के कारेमोरे, नागेश झोडा वणे, रविंद्र मानवटकर, रंजना मेश्राम, इंद्रिरा चव्हाण प्रामुख्याने उपस्थित होते.