Breaking News
  • ३१ जिल्ह्यांना पावसाचा इशारा; मान्सून राज्याच्या दारात.
  • पुणेकरांसाठी आनंदाची बातमी – हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोच्या पहिल्या टप्प्याच्या उद्घाटनाची तयारी सुरू झाली आहे.
  • अमरावती मनपाची मोठी कारवाई – थकीत कर वसुलीसाठी दोन मालमत्ता सील करण्यात आल्या. प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे.
  • मुंबईतील विकासकामांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आढावा घेणार – पावसाळ्यापूर्वी महापालिकेच्या विविध प्रकल्पांची पाहणी होणार आहे.
  • पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळ अटकेत – राजस्थानमधून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. तो अनेक महिन्यांपासून फरार होता.
  • अकरावी प्रवेश प्रक्रिया (FYJC) – दुसऱ्या नियमित प्रवेश फेरीचे वेळापत्रक जाहीर; ६ जूनपासून विद्यार्थ्यांना पसंतीक्रम बदलण्याची संधी मिळणार.
  • महाराष्ट्रातील पावसाचा अंदाज – हवामान विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार राज्यातील बहुतांश भागात यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता व्यक्त.
  • कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती, कमकुवत रुपया आणि पावसाच्या अनिश्चिततेमुळे RBI ने महागाईचा अंदाज वाढवला.
  • नैर्ऋत्य मान्सून केरळमध्ये दाखल; महाराष्ट्रात पुढील काही दिवसांत प्रगतीची शक्यता, मात्र एल निनोचा प्रभाव चिंतेचा विषय.

होम > शेती

शेतकरी जलसमाधी आंदोलन

गोळेगाव जवळील कॅनॉल मध्ये शेतकऱ्याची जलसमाधी आंदोलन

Former Jalasamadhi Andolan: गोळेगाव जवळील कॅनॉल मध्ये शेतकऱ्यांनी जलसमाधी आंदोलन करून सिद्धेश्वर धरणातील पाणी केळी तलावात उपसा करण्याची मागणी केली.


गोळेगाव जवळील कॅनॉल मध्ये शेतकऱ्याची जलसमाधी आंदोलन

Former Jalasamadhi Andolan |

 

सिद्धेश्वर धरणातील पाणी केळी तलावात उपसा करून टाकण्याची मागणी

औंढा नागनाथ (Former Jalasamadhi Andolan) : तालुक्यातील सिद्धेश्वर धरणातील पाणी उपसा करून केळी तलावात सोडण्याच्या प्रमुख मागणीसाठी तालुक्यातील येळी, केळी, केळी तांडा, सावळी पार्डी, उंडेगाव, हिवरखेडा, साळणा, अनखळी, सावळी खुर्द या गावातील शेतकऱ्यांनी दिनांक ११ मे रोजी सकाळी ११ ते १२ वाजे दरम्यान गोळेगाव जवळून वाहणाऱ्या कॅनॉल मध्ये जलसमाधी आंदोलन केले व तात्काळ सिद्धेश्वर धरणातील पाणी उपसा करून केळी तलावात सोडण्याची मागणी लावून धरली यानंतर पूर्णा पाटबंधारे विभागाकडून वरिष्ठ स्तरावरून कारवाई सुरू असल्याचे सांगितल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

तालुक्यातील सावळी पार्डी, केळी तांडा, केळी, हिवरखेडा, साळणा, अनखळी, सावळी खुर्द,येळी यासह अनेक गावच्या पिण्याच्या पाणी व शेती सिंचन केळी तलावावर अवलंबून आहे परंतु केळी तलाव दरवर्षी उन्हाळ्याच्या सुरुवातीसच आटून जातो त्यामुळे या गावात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मोठा निर्माण होतो तसेच शेतीही सिंचनाखाली राहत नाही त्यामुळे सिद्धेश्वर धरणातून पाणी उपसा करून केळी तलावात सोडण्याची मागणी शेतकऱ्यांनी या जलसमाधी आंदोलनाद्वारे केली.एकनाथ नागरे, गंगाराम घुगे, अमोल सांगळे ,बालाजी सांगळे, भास्कर आघाव ,निवास सांगळे ,विठ्ठल सांगळे ,संतोष मोरगे ,शुभम सांगळे, संतोष नागरे, गजानन कुटे, विश्वनाथ सांगळे, ननु खिलारे या १३ शेतकरी जलसमाधी आंदोलन केले.

यावेळी बोलताना शेतकऱ्यांनी केळी तलावात पाणी उपलब्ध झाल्यास या (Former Jalasamadhi Andolan) गावातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागतो तसेच हजारो हेक्टर शेती सिंचनाखाली येते त्यामुळे तात्काळ सिद्धेश्वर धरणातून पाणी उपसा करत केळी तलावात सोडण्याची मागणी शेतकऱ्यांनी लावून धरली तसेच या जिल्ह्यातील पाणी पर जिल्ह्यात जात असल्याने व येथील शेतकरी पाण्यापासून वंचित राहत असल्याने शेतकरी चांगलेच आक्रमक झाले होते. तात्काळ सिद्धेश्वर धरणातील पाणी केळी तलावात करून टाकण्यात आले नाही तर सिद्धेश्वर धरणाच्या १४ गेट वरून धरणात उड्या घेऊन तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचे यावेळी शेतकऱ्यांनी बोलताना सांगितले.

आंदोलन स्थळी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष बी.डी बांगर यांनी भेट दिली होती. आंदोलना दरम्यान उपविभागीय अभियंता हिंगोली पूर्णा पाटबंधारे विभाग वसमत चे विक्रम पत्की, दप्तर कारकून जिरवणकर, सहाय्यक अभियंता पूर्णा पाटबंधारे शिवाजी मोळवंडे, कालवा निरीक्षक शिवकांत गिऱ्हे, कालवा निरीक्षक व्ही.एम.कुटे, एस एस घुगे,व्ही बी कुटे, जी एस काळे, यांची उपस्थिती होती यावेळी आंदोलन शेतकऱ्यांकडून पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. पोलीस प्रशासनाकडूनही पोलीस निरीक्षक जी.एस. राहिरे, पोलीस उपनिरीक्षक शेख खुद्दूस,पोलीस उपनिरीक्षक दत्ता कानगुले, पोलीस उपनिरीक्षक श्रीधर वाघमारे, उपनिरीक्षक अमोल इंगोले, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पंजाब थिटे, जमादार दिलीप नाईक,जमादार संतोष पवार, जमादार गजानन गिरी, जमादार वसीम पठाण, शाहेद सय्यद, सुभाष जैताडे, रमेश मस्के, सुरेश ठाकरे,ओंकारेश्वर रांजणेकर,माधव सूर्यवंशी,ईकबाल शेख, राजकुमार कुटे, वसंत चव्हाण, जयदीप जाधव,अमोल चव्हाण, यांच्यासह पोलीस कर्मचारी यांनी बंदोबस्त ठेवला होता.

Related to this topic: