Breaking News
  • राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत आज शेगाव खामगाव दौऱ्यावर
  • लोणावळा–देवले मार्गावर दरड कोसळून मोठ्या प्रमाणात माती आणि दगड रस्त्यावर
  • शाळेच्या प्रांगणात खेळताना विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू; बीडमध्ये खळबळ
  • डॉक्टरांना मारहाण प्रकरणी अटकेत असलेल्या नगरसेवक रमेश म्हात्रे यांना जामीन मंजूर
  • खामगाव ग्रामीण पोलिसांची जुगार अड्ड्यावर धाड; १३ जणांविरुद्ध गुन्हा
  • पाचगणी–महाबळेश्वर रस्त्याची दुरावस्था, खड्ड्यांमुळे रस्त्याची झाली चाळण
  • रत्नागिरी-शहरातील पटवणे फगरवठार रस्ता पुन्हा खचला
  • भंडाऱ्यात तीन वर्षीय बालिकेवरील अत्याचाराच्या घटनेने तीव्र संताप
  • एका दिवसात सोने ८०० रूपये तर चांदी तब्बल ₹ ५ हजारांनी महाग

होम > देश

Tiranga March

धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर ठाकरे-मनसेची संयुक्त पत्रकार परिषद; तिरंगा मार्चचे विजयोत्सवात रूपांतर

केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे राजीनामा सादर केल्यानंतर राज्यातील राजकीय घडामोडींनाही वेग आला आहे.


धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर ठाकरे-मनसेची संयुक्त पत्रकार परिषद तिरंगा मार्चचे विजयोत्सवात रूपांतर

Tiranga March |

राजीनाम्याबाबत स्पष्टता मागितली; विद्यार्थ्यांवरील कारवाई, पोलिसांच्या भूमिकेची चौकशी आणि तिरंगा मार्चचे विजयोत्सवात रूपांतर करण्याची घोषणा

मुंबई : केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे राजीनामा सादर केल्यानंतर राज्यातील राजकीय घडामोडींनाही वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना (ठाकरे गट) आणि मनसे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत सरकारवर तीव्र टीका केली. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचे कौतुक करत हा विजय देशातील तरुणांचा असल्याचे म्हटले.

उद्धव ठाकरे म्हणाले की, गेल्या काही दिवसांपासून देशातील वातावरण अस्वस्थ होते. अभिजीत दिपके, आंदोलनात सहभागी झालेले विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांनी सातत्याने लढा दिल्यामुळे हा टप्पा गाठता आला. मात्र हा संघर्ष केवळ एका मंत्र्यांच्या राजीनाम्यापुरता मर्यादित नसून, गेल्या अनेक वर्षांपासून विविध प्रश्नांवर जनतेत असलेल्या नाराजीचे हे प्रतिबिंब असल्याचे त्यांनी नमूद केले.

राजीनाम्याबाबत अद्याप संभ्रम असल्याचे सांगत ठाकरे म्हणाले की, धर्मेंद्र प्रधान यांनी खरोखर राजीनामा दिला आहे की त्यांचा केवळ खातेबदल झाला आहे, याबाबत अधिकृत स्पष्टता आवश्यक आहे. त्यांनी राजीनाम्याचे पत्र सार्वजनिक केले असले तरी त्यानंतरच्या निर्णयाबाबत सरकारने भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणीही त्यांनी केली.

आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीमार आणि महिलांशी झालेल्या गैरवर्तनाचा उल्लेख करत उद्धव ठाकरे यांनी या घटनांवर कठोर कारवाईची मागणी केली. पोलिसांसह साध्या वेशातील कथित व्यक्तींनी केलेल्या कारवायांची चौकशी व्हावी, तसेच विद्यार्थ्यांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यात यावेत, असे ते म्हणाले. या संदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणीही त्यांनी केली.

युवाशक्ती एकत्र आली तर मोठा बदल घडवून आणू शकते, याचे हे उदाहरण असल्याचे ठाकरे म्हणाले. देशातील तरुणांनी आपल्या संघर्षातून लोकशाहीतील जनशक्तीचे सामर्थ्य दाखवून दिले असून, देशात क्रांतीची ठिणगी अद्याप जिवंत असल्याचे त्यांनी नमूद केले.

पत्रकार परिषदेत मनसेच्या वतीनेही विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचे अभिनंदन करण्यात आले. देशभरातील तरुणांनी आपल्या संघर्षातून शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा देण्यास भाग पाडल्याचा दावा करत, हा विजय विद्यार्थ्यांच्या एकजुटीचा असल्याचे सांगण्यात आले.

यावेळी २६ जुलै २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेल्या तिरंगा मार्चचे रूपांतर विजयोत्सव सोहळ्यात करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली. पूर्वनियोजित वेळेनुसार सकाळी १० वाजता छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथे सर्वांनी एकत्र जमावे, असे आवाहन करण्यात आले. पुढील आंदोलनाची दिशा अभिजीत दिपके आणि त्यांच्या सहकाऱ्यांशी चर्चा करून निश्चित करण्यात येईल, असेही सांगण्यात आले.

Related to this topic: