Breaking News
  • विदर्भात गेल्या बारा दिवसांपासून पावसाचा खंड
  • Gadchiroli : जपतलाई घटनेतील दोषींवर कठोर कारवाई; ५१३ आश्रमशाळांचे थर्ड पार्टी ऑडिट
  • कुंभमेळ्यासाठी १३ प्रमुख आखाड्यांसह धार्मिक संस्थांनाही पायाभूत सुविधांसाठी १५ लाखांपर्यंत निधी मिळणार
  • दोडामार्ग पाळये गावात हत्तींचा धुमाकूळ; माड, व केळी बागा उद्ध्वस्त
  • Nashik : आदित्य ठाकरे आज नाशिक दौऱ्यावर
  • शिवप्रतिष्ठान युवाच्यावतीने दीप प्रज्वलन करून दीप अमावस्या साजरी
  • Ratnagiri : रत्नागिरीतल्या पालीत वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश
  • Ahilyanagar : कॅफेच्या नावाखाली गैरकृत्य, श्रीरामपूरमध्ये पोलिसांची 4 कॅफेवर छापेमारी
  • Nanded : झेंडूच्या फुलशेतीतून शेतकऱ्याला मिळाला आर्थिक आधार

होम > देश

Resignation

35 दिवसांच्या जंतर-मंतर आंदोलनाला यश; केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा मंत्रिपदाचा राजीनामा

दिल्लीतील जंतर-मंतर येथे कॉकरोच जनता पार्टी आणि विद्यार्थ्यांकडून गेल्या 35 दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनाला अखेर यश मिळाले आहे.


35 दिवसांच्या जंतर-मंतर आंदोलनाला यश केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा मंत्रिपदाचा राजीनामा

कॉकरोच जनता पार्टी आणि विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर केंद्राचा निर्णय; मोदी सरकारच्या कार्यकाळातील पहिली अशी घटना

दिल्लीतील जंतर-मंतर येथे कॉकरोच जनता पार्टी आणि विद्यार्थ्यांकडून गेल्या 35 दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनाला अखेर यश मिळाले आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी शनिवारी दुपारी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात एखाद्या आंदोलनानंतर किंवा आरोपांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्र्याला राजीनामा द्यावा लागण्याची ही पहिलीच घटना ठरली आहे.

धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर कोणतीही तडजोड स्वीकारली जाणार नसल्याचा स्पष्ट इशारा कॉकरोच जनता पार्टी आणि जंतर-मंतरवरील आंदोलक विद्यार्थ्यांनी दिला होता. मागणी मान्य न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्धारही आंदोलकांनी व्यक्त केला होता.

दरम्यान, दिल्लीपुरते मर्यादित राहिलेले हे आंदोलन हळूहळू देशातील विविध राज्यांमध्ये पोहोचले. मुंबई, राजस्थान, बिहार आणि गुवाहाटीसह अनेक भागांत आंदोलनाची व्याप्ती वाढली. त्यामुळे केंद्र सरकारविरोधातील असंतोष अधिक तीव्र होत असल्याचे चित्र निर्माण झाले.

आंदोलनाचा वाढता प्रभाव आणि देशभरातील विस्तार लक्षात घेऊन केंद्र सरकारने अखेर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा स्वीकारण्याचा निर्णय घेतल्याचे समोर आले आहे.

Related to this topic: