Breaking News
  • बदलापुरात तुकाराम मुंडे यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक
  • देशाची शिक्षणव्यवस्था बदलावी लागेल- राहुल गांधी
  • मंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसकडून सांगलीत जल्लोष
  • आषाढी निमित्त काढण्यात आलेल्या रथ उत्सवात प्रयास मित्र मंडळाने देखाव्यातून मांडले 'नीट' पेपर फुटीचे दाहक वास्तव
  • युवकांनी सरकारला नैतिक जबाबदारी स्वीकारायला भाग पाडलं - शरद पवार
  • TET पेपर फुटी प्रकरणातील मास्टर माईंड बिजेदरं कुमार गुप्ता सह इंद्रजित सिंग ला 30 जुलै पर्यंत पोलीस कोठडी
  • केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनाम्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये विद्यार्थ्यांसह विविध संघटनेचा जल्लोष....
  • छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज भागातील प्रति पंढरपूर येथे विठ्ठल भक्तांची गर्दी
  • संभाजीनगरच्या प्रति पंढरपूर येथे मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते सुरू विठ्ठल रुक्माईची पूजा

होम > देश

Resignation

35 दिवसांच्या जंतर-मंतर आंदोलनाला यश; केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा मंत्रिपदाचा राजीनामा

दिल्लीतील जंतर-मंतर येथे कॉकरोच जनता पार्टी आणि विद्यार्थ्यांकडून गेल्या 35 दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनाला अखेर यश मिळाले आहे.


35 दिवसांच्या जंतर-मंतर आंदोलनाला यश केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा मंत्रिपदाचा राजीनामा

कॉकरोच जनता पार्टी आणि विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर केंद्राचा निर्णय; मोदी सरकारच्या कार्यकाळातील पहिली अशी घटना

दिल्लीतील जंतर-मंतर येथे कॉकरोच जनता पार्टी आणि विद्यार्थ्यांकडून गेल्या 35 दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनाला अखेर यश मिळाले आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी शनिवारी दुपारी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात एखाद्या आंदोलनानंतर किंवा आरोपांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्र्याला राजीनामा द्यावा लागण्याची ही पहिलीच घटना ठरली आहे.

धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर कोणतीही तडजोड स्वीकारली जाणार नसल्याचा स्पष्ट इशारा कॉकरोच जनता पार्टी आणि जंतर-मंतरवरील आंदोलक विद्यार्थ्यांनी दिला होता. मागणी मान्य न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्धारही आंदोलकांनी व्यक्त केला होता.

दरम्यान, दिल्लीपुरते मर्यादित राहिलेले हे आंदोलन हळूहळू देशातील विविध राज्यांमध्ये पोहोचले. मुंबई, राजस्थान, बिहार आणि गुवाहाटीसह अनेक भागांत आंदोलनाची व्याप्ती वाढली. त्यामुळे केंद्र सरकारविरोधातील असंतोष अधिक तीव्र होत असल्याचे चित्र निर्माण झाले.

आंदोलनाचा वाढता प्रभाव आणि देशभरातील विस्तार लक्षात घेऊन केंद्र सरकारने अखेर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा स्वीकारण्याचा निर्णय घेतल्याचे समोर आले आहे.

Related to this topic: