Breaking News
  • विदर्भात गेल्या बारा दिवसांपासून पावसाचा खंड
  • Gadchiroli : जपतलाई घटनेतील दोषींवर कठोर कारवाई; ५१३ आश्रमशाळांचे थर्ड पार्टी ऑडिट
  • कुंभमेळ्यासाठी १३ प्रमुख आखाड्यांसह धार्मिक संस्थांनाही पायाभूत सुविधांसाठी १५ लाखांपर्यंत निधी मिळणार
  • दोडामार्ग पाळये गावात हत्तींचा धुमाकूळ; माड, व केळी बागा उद्ध्वस्त
  • Nashik : आदित्य ठाकरे आज नाशिक दौऱ्यावर
  • शिवप्रतिष्ठान युवाच्यावतीने दीप प्रज्वलन करून दीप अमावस्या साजरी
  • Ratnagiri : रत्नागिरीतल्या पालीत वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश
  • Ahilyanagar : कॅफेच्या नावाखाली गैरकृत्य, श्रीरामपूरमध्ये पोलिसांची 4 कॅफेवर छापेमारी
  • Nanded : झेंडूच्या फुलशेतीतून शेतकऱ्याला मिळाला आर्थिक आधार

होम > देश

Protest Ends

NEET पेपरफुटी आंदोलन स्थगित; जंतरमंतरवरील ३६ दिवसांचे विद्यार्थ्यांचे आंदोलन अखेर संपले

नीट पेपरफुटी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील जंतरमंतर येथे सुरू असलेले विद्यार्थ्यांचे आंदोलन अखेर ३६ दिवसांनंतर मागे घेण्यात आले आहे.


neet पेपरफुटी आंदोलन स्थगित जंतरमंतरवरील ३६ दिवसांचे विद्यार्थ्यांचे आंदोलन अखेर संपले

कॉक्रोच जनता पार्टीचे सौरव दास आणि आशुतोष रांका यांची घोषणा; मागण्या मान्य झाल्यानंतर आंदोलकांना घरी परतण्याचे आवाहन

नवी दिल्ली : नीट पेपरफुटी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील जंतरमंतर येथे सुरू असलेले विद्यार्थ्यांचे आंदोलन अखेर ३६ दिवसांनंतर मागे घेण्यात आले आहे. आंदोलनाच्या प्रमुख मागण्या पूर्ण झाल्यानंतर आंदोलन समाप्त करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला.

कॉक्रोच जनता पार्टीचे प्रवक्ते सौरव दास आणि आशुतोष रांका यांनी संयुक्तपणे आंदोलन स्थगित करण्याची घोषणा केली. यावेळी आशुतोष रांका यांनी आंदोलकांना शांतता राखण्याचे आवाहन करत, "आपल्या सर्व प्रमुख मागण्या पूर्ण झाल्या आहेत. त्यामुळे आंदोलन आता मागे घ्यावे आणि सर्वांनी शांततापूर्वक आपल्या घरी परतावे," असे सांगितले.

नीट पेपरफुटीच्या विरोधात विद्यार्थी गेल्या ३६ दिवसांपासून दिल्लीच्या जंतरमंतर येथे आंदोलन करत होते. मागण्या मान्य झाल्यानंतर अखेर हे आंदोलन अधिकृतपणे समाप्त करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली.

Related to this topic: