Breaking News
  • बदलापुरात तुकाराम मुंडे यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक
  • देशाची शिक्षणव्यवस्था बदलावी लागेल- राहुल गांधी
  • मंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसकडून सांगलीत जल्लोष
  • आषाढी निमित्त काढण्यात आलेल्या रथ उत्सवात प्रयास मित्र मंडळाने देखाव्यातून मांडले 'नीट' पेपर फुटीचे दाहक वास्तव
  • युवकांनी सरकारला नैतिक जबाबदारी स्वीकारायला भाग पाडलं - शरद पवार
  • TET पेपर फुटी प्रकरणातील मास्टर माईंड बिजेदरं कुमार गुप्ता सह इंद्रजित सिंग ला 30 जुलै पर्यंत पोलीस कोठडी
  • केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनाम्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये विद्यार्थ्यांसह विविध संघटनेचा जल्लोष....
  • छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज भागातील प्रति पंढरपूर येथे विठ्ठल भक्तांची गर्दी
  • संभाजीनगरच्या प्रति पंढरपूर येथे मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते सुरू विठ्ठल रुक्माईची पूजा

होम > देश

Protest Ends

NEET पेपरफुटी आंदोलन स्थगित; जंतरमंतरवरील ३६ दिवसांचे विद्यार्थ्यांचे आंदोलन अखेर संपले

नीट पेपरफुटी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील जंतरमंतर येथे सुरू असलेले विद्यार्थ्यांचे आंदोलन अखेर ३६ दिवसांनंतर मागे घेण्यात आले आहे.


neet पेपरफुटी आंदोलन स्थगित जंतरमंतरवरील ३६ दिवसांचे विद्यार्थ्यांचे आंदोलन अखेर संपले

कॉक्रोच जनता पार्टीचे सौरव दास आणि आशुतोष रांका यांची घोषणा; मागण्या मान्य झाल्यानंतर आंदोलकांना घरी परतण्याचे आवाहन

नवी दिल्ली : नीट पेपरफुटी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील जंतरमंतर येथे सुरू असलेले विद्यार्थ्यांचे आंदोलन अखेर ३६ दिवसांनंतर मागे घेण्यात आले आहे. आंदोलनाच्या प्रमुख मागण्या पूर्ण झाल्यानंतर आंदोलन समाप्त करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला.

कॉक्रोच जनता पार्टीचे प्रवक्ते सौरव दास आणि आशुतोष रांका यांनी संयुक्तपणे आंदोलन स्थगित करण्याची घोषणा केली. यावेळी आशुतोष रांका यांनी आंदोलकांना शांतता राखण्याचे आवाहन करत, "आपल्या सर्व प्रमुख मागण्या पूर्ण झाल्या आहेत. त्यामुळे आंदोलन आता मागे घ्यावे आणि सर्वांनी शांततापूर्वक आपल्या घरी परतावे," असे सांगितले.

नीट पेपरफुटीच्या विरोधात विद्यार्थी गेल्या ३६ दिवसांपासून दिल्लीच्या जंतरमंतर येथे आंदोलन करत होते. मागण्या मान्य झाल्यानंतर अखेर हे आंदोलन अधिकृतपणे समाप्त करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली.

Related to this topic: