Breaking News
  • विदर्भात गेल्या बारा दिवसांपासून पावसाचा खंड
  • Gadchiroli : जपतलाई घटनेतील दोषींवर कठोर कारवाई; ५१३ आश्रमशाळांचे थर्ड पार्टी ऑडिट
  • कुंभमेळ्यासाठी १३ प्रमुख आखाड्यांसह धार्मिक संस्थांनाही पायाभूत सुविधांसाठी १५ लाखांपर्यंत निधी मिळणार
  • दोडामार्ग पाळये गावात हत्तींचा धुमाकूळ; माड, व केळी बागा उद्ध्वस्त
  • Nashik : आदित्य ठाकरे आज नाशिक दौऱ्यावर
  • शिवप्रतिष्ठान युवाच्यावतीने दीप प्रज्वलन करून दीप अमावस्या साजरी
  • Ratnagiri : रत्नागिरीतल्या पालीत वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश
  • Ahilyanagar : कॅफेच्या नावाखाली गैरकृत्य, श्रीरामपूरमध्ये पोलिसांची 4 कॅफेवर छापेमारी
  • Nanded : झेंडूच्या फुलशेतीतून शेतकऱ्याला मिळाला आर्थिक आधार

होम > देश

NEET Protest

NEET आंदोलनावरील लाठीचार्जवर राहुल गांधी संतप्त; 'शिक्षणमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, मोदींनी विद्यार्थ्यांची माफी मागावी

दिल्लीत NEET परीक्षा घोटाळ्याच्या निषेधार्थ शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिस लाठीचार्जच्या घटनेवरून राजकीय प्रतिक्रिया अधिक तीव्र होत आहेत.


neet आंदोलनावरील लाठीचार्जवर राहुल गांधी संतप्त शिक्षणमंत्र्यांनी राजीनामा द्यावा मोदींनी विद्यार्थ्यांची माफी मागावी

NEET Protest |

दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील पोलिस कारवाईवर विरोधी पक्षनेत्यांचा हल्लाबोल; शिक्षण व्यवस्थेवरही उपस्थित केले गंभीर प्रश्न

नवी दिल्ली : दिल्लीत NEET परीक्षा घोटाळ्याच्या निषेधार्थ शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिस लाठीचार्जच्या घटनेवरून राजकीय प्रतिक्रिया अधिक तीव्र होत आहेत. या प्रकरणावर लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका करत, विद्यार्थ्यांवरील कारवाईला दुर्दैवी असल्याचे म्हटले आहे. तसेच, केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तत्काळ राजीनामा द्यावा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांची माफी मागावी, अशी मागणी त्यांनी केली.

राहुल गांधी यांनी सोमवारी झालेल्या पोलिस कारवाईवर प्रतिक्रिया देताना सांगितले की, शांततेने आंदोलन करणाऱ्या तरुणांवर लाठीमार करणे हा भारतीय संस्कारांचा भाग नाही. लोकशाही पद्धतीने आपली भूमिका मांडणाऱ्या विद्यार्थ्यांवर अशा प्रकारे कारवाई होणे अत्यंत दुर्दैवी असल्याचे त्यांनी नमूद केले.

देशातील शिक्षण व्यवस्था आणि परीक्षा प्रणाली गंभीर संकटातून जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. त्यांच्या मते, शिक्षण आणि परीक्षा व्यवस्थेतील त्रुटींमुळेच तरुणांना आपल्या भविष्यासाठी रस्त्यावर उतरावे लागत आहे. अशा परिस्थितीतही पंतप्रधान नरेंद्र मोदी या महत्त्वाच्या विषयावर मौन बाळगत असल्याची टीका राहुल गांधी यांनी केली.

राहुल गांधी यांनी पुढे म्हटले की, दिल्लीतील लाठीचार्जच्या घटनेबद्दल पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांची थेट माफी मागावी, तसेच या संपूर्ण प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारत केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी त्यांनी पुन्हा एकदा केली.

Related to this topic: