Breaking News
  • वर्धा जिल्ह्यात मागील २४ तासांपासून संततधार व रिमझिम पावसाची हजेरी
  • दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल उद्धव ठाकरेंची भेट घेणार
  • मनोज जरांगे आभिजीत दिपकेंच्या भेटीला
  • नाशिकमध्ये मनसेचं आंदोलन
  • बुलढाण्यात जंतर-मंतर लाठीचार्जचे तीव्र पडसाद; विद्यार्थ्यांची सरकारविरोधात स्वाक्षरी मोहीम
  • ठाकूरबुवांच्या समाधीस्थळी माऊलींचे तिसरे गोल रिंगण भक्तिरसात रंगले
  • जे.पी नड्डा, जितेंद्र सिंह आंदोलकांची भेट घेणार
  • पुणे शहरात सायबर चोरट्यांचा सुळसुळाट; एकाच दिवसात ४२ गुन्ह्यांची नोंद
  • पावसाची दडी, पाणी स्रोत आटले; टोमॅटो पिकाला टँकरने पाणी देण्याची शेतकऱ्यांवर वेळ

होम > देश

Jantar Mantar Protest

जंतर-मंतर आंदोलनात नवा ट्विस्ट; सोनम वांगचुक यांनी उपोषण सोडले, अभिजीत दीपकेंचा अटकेचा दावा

दिल्लीतील जंतर-मंतरवर NEET पेपरफुटी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनात शुक्रवारी महत्त्वाची घडामोड घडली.


जंतर-मंतर आंदोलनात नवा ट्विस्ट सोनम वांगचुक यांनी उपोषण सोडले अभिजीत दीपकेंचा अटकेचा दावा

Jantar Mantar Protest |

'आज संध्याकाळी आम्हाला अटक होऊ शकते'; धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यापर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार

नवी दिल्ली : दिल्लीतील जंतर-मंतरवर NEET पेपरफुटी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनात शुक्रवारी महत्त्वाची घडामोड घडली. २८ जूनपासून उपोषणावर असलेले सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी मध्यरात्री केंद्र सरकारच्या शिष्टमंडळाशी झालेल्या चर्चेनंतर आपले उपोषण मागे घेतले. दरम्यान, आंदोलनाचे नेतृत्व करणारे अभिजीत दीपके यांनी त्यांच्या टीमला आज अटक होऊ शकते, असा दावा करत नव्या चर्चेला तोंड फोडले आहे.

सोनम वांगचुक यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी पूर्ण होईपर्यंत उपोषण सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला होता. मात्र, सरकारच्या प्रतिनिधींशी झालेल्या बैठकीनंतर त्यांनी उपोषण समाप्त करण्याचा निर्णय घेतला.

याचवेळी जंतर-मंतरवर आंदोलन सुरू ठेवणारे अभिजीत दीपके यांनी गंभीर दावा केला. त्यांच्या म्हणण्यानुसार, कॉक्रोच जनता पार्टी (CJP) च्या कार्यकर्त्यांना आज संध्याकाळी अटक केली जाऊ शकते, अशी माहिती त्यांना मिळाली आहे. त्यांनी समर्थकांना कोणत्याही परिस्थितीत शांतता राखण्याचे आणि आंदोलन अहिंसक पद्धतीने सुरू ठेवण्याचे आवाहन केले.

अभिजीत दीपके यांनी सांगितले की, सरन्यायाधीश आणि सरकारी प्रतिनिधी यांची आज बैठक होणार असून, त्यापूर्वीच अटकेची शक्यता असल्याची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे या दाव्यामुळे आंदोलनाच्या पुढील घडामोडींविषयी उत्सुकता वाढली आहे.

दीपके म्हणाले, "कॉक्रोच जनता पार्टीच्या टीमला अटक होऊ शकते, अशी माहिती मला नुकतीच मिळाली आहे. आम्ही गेल्या ३५ दिवसांपासून येथे पूर्णपणे शांततेने आंदोलन करत आहोत. स्वतंत्र भारतात इतक्या शांततेने आंदोलन झाल्याची उदाहरणे फार कमी असतील. मग आम्हाला अटक करण्याचे कारण काय?"

पुढे बोलताना त्यांनी महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भारतीय संविधानाच्या विचारांवर आपली भूमिका आधारित असल्याचे सांगितले. "आम्ही संविधानाच्या चौकटीत राहून आंदोलन करत आहोत. अशा परिस्थितीत आम्हाला अटक करण्यामागचे कारण सरकारने स्पष्ट करावे," अशी मागणी त्यांनी केली.

धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याची भूमिका दीपके यांनी पुन्हा स्पष्ट केली. "जंतर-मंतरवरील आंदोलन शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यापर्यंत सुरूच राहील. सोनम वांगचुक यांनी २६ दिवसांहून अधिक काळ उपोषण केल्यानंतर ते संपवल्याचा आम्हाला आनंद आहे. त्यांचे जीवन देशासाठी अत्यंत मौल्यवान आहे," असेही त्यांनी नमूद केले.

केंद्रीय मंत्र्यांसोबत होणाऱ्या बैठकीबाबत बोलताना दीपके म्हणाले की, ही बैठक तटस्थ ठिकाणी होणार असून, "धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय आम्हाला मान्य नाही," अशी भूमिका त्यांनी पुन्हा अधोरेखित केली.

Related to this topic: