Breaking News
  • राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत आज शेगाव खामगाव दौऱ्यावर
  • लोणावळा–देवले मार्गावर दरड कोसळून मोठ्या प्रमाणात माती आणि दगड रस्त्यावर
  • शाळेच्या प्रांगणात खेळताना विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू; बीडमध्ये खळबळ
  • डॉक्टरांना मारहाण प्रकरणी अटकेत असलेल्या नगरसेवक रमेश म्हात्रे यांना जामीन मंजूर
  • खामगाव ग्रामीण पोलिसांची जुगार अड्ड्यावर धाड; १३ जणांविरुद्ध गुन्हा
  • पाचगणी–महाबळेश्वर रस्त्याची दुरावस्था, खड्ड्यांमुळे रस्त्याची झाली चाळण
  • रत्नागिरी-शहरातील पटवणे फगरवठार रस्ता पुन्हा खचला
  • भंडाऱ्यात तीन वर्षीय बालिकेवरील अत्याचाराच्या घटनेने तीव्र संताप
  • एका दिवसात सोने ८०० रूपये तर चांदी तब्बल ₹ ५ हजारांनी महाग

होम > देश

Education Ministry

NEET पेपरफुटी वादात केंद्राचा मोठा निर्णय; उच्च शिक्षण सचिव विनीत जोशी यांची बदली, नरेश पाल गंगवार यांच्याकडे सूत्रे

NEET पेपरफुटी प्रकरणामुळे देशभरात निर्माण झालेल्या संतापाच्या वातावरणात आणि जंतर-मंतरवर विद्यार्थ्यांचे आंदोलन तीव्र होत असताना केंद्र सरकारने शिक्षण मंत्रालयात महत्त्वाचा प्रशासकीय बदल केला आहे.


neet पेपरफुटी वादात केंद्राचा मोठा निर्णय उच्च शिक्षण सचिव विनीत जोशी यांची बदली नरेश पाल गंगवार यांच्याकडे सूत्रे

Education Ministry |

जंतर-मंतरवरील विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शिक्षण मंत्रालयात प्रशासकीय फेरबदल; परीक्षा व्यवस्थेतील सुधारणा हे नव्या सचिवांसमोरील मोठे आव्हान

नवी दिल्ली : NEET पेपरफुटी प्रकरणामुळे देशभरात निर्माण झालेल्या संतापाच्या वातावरणात आणि जंतर-मंतरवर विद्यार्थ्यांचे आंदोलन तीव्र होत असताना केंद्र सरकारने शिक्षण मंत्रालयात महत्त्वाचा प्रशासकीय बदल केला आहे. उच्च शिक्षण विभागाचे सचिव विनीत जोशी यांची त्या पदावरून बदली करण्यात आली असून, त्यांच्या जागी राजस्थान कॅडरचे १९९४ बॅचचे वरिष्ठ आयएएस अधिकारी नरेश पाल गंगवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

विनीत जोशी यांची पंचायत राज मंत्रालयाच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर, उच्च शिक्षण विभागाच्या सचिवपदाची जबाबदारी आता नरेश पाल गंगवार यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. देशातील शिक्षण व्यवस्था आणि परीक्षा प्रक्रियेवरील विश्वास पुन्हा निर्माण करण्याचे मोठे दायित्व त्यांच्यावर असणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून NEET आणि इतर स्पर्धा परीक्षांमधील कथित गैरव्यवहारांमुळे देशभरात मोठा वाद निर्माण झाला आहे. दिल्लीतील जंतर-मंतर येथे 'कॉकरोच जनता पार्टी' (CJP) आणि विविध विद्यार्थी संघटनांकडून आंदोलन सुरू असून, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची तसेच परीक्षा व्यवस्थेत पारदर्शकता आणण्याची मागणी सातत्याने केली जात आहे.

या वाढत्या राजकीय आणि सामाजिक दबावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने प्रशासकीय पातळीवर हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. शिक्षण मंत्रालयातील बदल हा परीक्षा व्यवस्थेतील सुधारणा आणि प्रशासन अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जात आहे.

नवे सचिव नरेश पाल गंगवार यांनी आयआयटी दिल्ली (IIT Delhi) तसेच रुडकी विद्यापीठातून शिक्षण घेतले आहे. यापूर्वी त्यांनी पर्यावरण मंत्रालय तसेच पशुपालन आणि डेअरी मंत्रालयात सचिव म्हणून काम पाहिले आहे. परीक्षा प्रणाली अधिक विश्वासार्ह बनवणे, विद्यार्थ्यांमधील नाराजी कमी करणे आणि शिक्षण व्यवस्थेतील पारदर्शकता वाढवणे ही त्यांच्यासमोरील प्रमुख आव्हाने असतील.

Related to this topic: