Breaking News
  • पुणे शहरात सायबर चोरट्यांचा सुळसुळाट; एकाच दिवसात ४२ गुन्ह्यांची नोंद
  • पावसाची दडी, पाणी स्रोत आटले; टोमॅटो पिकाला टँकरने पाणी देण्याची शेतकऱ्यांवर वेळ
  • मुक्ताईनगरात दोन गुटखा तस्कर जेरबंद, वाहन जप्त
  • नाशिकला पुढील 3 दिवसाचा पावसाचा यलो अलर्ट
  • मराठवाड्यात अद्यापही समाधानकारक पाऊस नाही
  • सरकारी कार्यक्रमात आमदारपुत्राचा प्रचार? उमरग्यातील बॅनरवरून वादाची चिन्ह
  • जंतर-मंतरवरील कथित लाठीचार्जचा बुलढाण्यात निषेध; रमाईच्या लेकींचे आंदोलन
  • बुलढाण्यात आरोग्य व्यवस्थेचा भोंगळ कारभार?
  • सायली खरे यांचा सुरांनी दिला CJP आंदोलनाला पाठिंबा!

होम > देश

CJP Protest

दिल्लीतील लाठीचार्ज योग्यच; परिस्थिती नियंत्रणासाठी पोलिसांची कारवाई आवश्यक होती : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

दिल्लीतील कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनादरम्यान पोलिसांनी केलेला लाठीचार्ज परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी आवश्यक होता.


दिल्लीतील लाठीचार्ज योग्यच परिस्थिती नियंत्रणासाठी पोलिसांची कारवाई आवश्यक होती  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

CJP Protest |

'फेसलेस आंदोलनात काही जण वेगळा अजेंडा राबवत आहेत'; लोकशाहीत आंदोलनाचा अधिकार आहे, पण हिंसा मान्य नाही, असे फडणवीसांचे स्पष्ट मत

मुंबई : दिल्लीतील कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनादरम्यान पोलिसांनी केलेला लाठीचार्ज परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी आवश्यक होता, असे मत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. पोलिसांनी वेळेत हस्तक्षेप केला नसता तर अधिक गंभीर आणि अनावश्यक घटना घडल्या असत्या, असे त्यांनी सांगितले. तसेच, लोकशाहीत प्रत्येकाला आंदोलनाचा अधिकार असला तरी तो संविधानाने दिलेल्या अधिकार आणि जबाबदाऱ्यांच्या चौकटीतच वापरला गेला पाहिजे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

मंगळवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना फडणवीस म्हणाले की, दिल्लीतील सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाला स्पष्ट नेतृत्व नसल्यामुळे काही लोक वेगळा अजेंडा घेऊन त्यात सहभागी झाले आहेत. त्यामुळे आंदोलनाचा मूळ उद्देश बाजूला पडून काही प्रवृत्ती अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला.

फडणवीस यांनी सांगितले की, परवानगी घेऊन शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्यांना प्रशासनाकडून सहकार्य मिळते. मात्र, विनापरवानगी आंदोलन करून जाणीवपूर्वक राजकीय अस्थिरता निर्माण करणे किंवा हिंसक मार्गाचा अवलंब करणे कोणत्याही परिस्थितीत योग्य ठरत नाही. अशा प्रकारच्या घटनांवर आवश्यक ती कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

दिल्लीतील आंदोलनाचा उल्लेख करताना त्यांनी सांगितले की, या आंदोलनाच्या माध्यमातून अनेक राजकीय पक्ष स्वतःचा राजकीय फायदा करून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. तसेच, या विषयाशी थेट संबंध नसलेल्या काही संघटनाही परिस्थिती चिघळवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला.

मुख्यमंत्री म्हणाले की, नेतृत्व नसलेल्या आंदोलनांमध्ये काही प्रवृत्ती सहजपणे घुसखोरी करतात. पोलिसांच्या वाहनांची तोडफोड, दगडफेक आणि हिंसक प्रकार घडल्यामुळे परिस्थिती गंभीर झाली होती. अशा वेळी कोणत्याही सरकारला आपल्या नागरिकांवर लाठीचार्ज करणे आवडत नाही; मात्र परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांनी हस्तक्षेप करणे आवश्यक होते. पोलिसांनी या संपूर्ण घटनेत मोठा संयम दाखवला, असेही त्यांनी नमूद केले.

फडणवीस यांनी पुढे सांगितले की, अशा आंदोलनांचा काही जण स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी वापर करतात. त्यांच्या मते, आंदोलनात सहभागी झालेल्या प्रत्येकावर आरोप करणे योग्य नाही. अनेक जण चांगल्या हेतूने सहभागी झाले असतील; मात्र काही लोकांचा NEET परीक्षेशी कोणताही संबंध नसतानाही ते केवळ अराजकता निर्माण करण्याच्या उद्देशाने आंदोलनात सहभागी झाल्याचा दावा त्यांनी केला.

याशिवाय, काही राजकीय पक्षांना त्यांच्या राज्यांमध्ये जनतेने नाकारल्यानंतर अशा आंदोलनांच्या माध्यमातून पुन्हा राजकीय संधी मिळवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा टोलाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना लगावला.

Related to this topic: