Breaking News
  • दिवे घाट येथील रस्ता रुंदीकरणाच्या कामासाठी करण्यात येणाऱ्या ब्लास्टिंग साठी रस्ता बंद
  • महालक्ष्मी एक्सप्रेसच्या डब्याला आग, प्रवाशांमध्ये घबराट
  • विदर्भातील २६ मोठ्या धरणांमध्ये सरासरी ४९.७६ टक्के जलसाठा
  • पुणे शहराच्या निम्म्या भागाचा पाणीपुरवठा येत्या गुरुवारी बंद
  • अमरावती विमानतळावर 'नाईट लँडिंग' पुन्हा रखडले!
  • नागपूर जिल्ह्यातील बुटीबोरी MIDC परिसरात कंपनीत आग
  • शहादा शिरपूर रस्त्यावरील पेट्रोल पंपावर दरोडा...
  • साई नगरीत तीन दिवसीय गुरूपौर्णिमा उत्सवाला भक्तिमय वातावरणात सुरुवात
  • सोलापूर- मुळेगाव गोळीबारातील मुख्य सूत्रधाराला केले जेरबंद

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

Zilla Parishad School

शाळेची दयनीय अवस्था; धोकादायक विद्युत वायरिंगमुळे विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका

सेनगाव तालुक्यातील पानकनेरगाव येथील जिल्हा परिषद शाळेतील धोकादायक विद्युत वायरिंगमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.


शाळेची दयनीय अवस्था धोकादायक विद्युत वायरिंगमुळे विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका

Zilla Parishad School |

उघड्या तारा, तुटके स्विचबोर्ड आणि लोंबकळणाऱ्या वायरमुळे पालकांमध्ये संताप; तात्काळ दुरुस्तीची मागणी

पानकनेरगाव : सेनगाव तालुक्यातील पानकनेरगाव येथील जिल्हा परिषद शाळेतील धोकादायक विद्युत वायरिंगमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. शाळेच्या वर्गखोल्या व परिसरात अनेक ठिकाणी उघड्या तारा, तुटलेले स्विचबोर्ड, लोंबकळणाऱ्या वायर आणि जीर्ण झालेली विद्युत यंत्रणा दिसून येत असून, त्यामुळे लहान विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका निर्माण झाल्याची भावना पालक व ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू असल्याने भिंतींमध्ये ओलावा निर्माण होत आहे. अशा परिस्थितीत उघड्या विद्युत तारा आणि दोषपूर्ण वायरिंगमुळे शॉर्टसर्किट किंवा विद्युत धक्का बसण्याचा धोका अधिक वाढला आहे. शाळेत दररोज शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही बाब अत्यंत गंभीर मानली जात आहे.

पालकांचे म्हणणे आहे की, शाळा ही विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित ठिकाण असायला हवी. मात्र, अशा धोकादायक परिस्थितीत मुलांना शिक्षणासाठी पाठवताना भीती वाटत आहे. एखादी दुर्घटना घडल्यानंतर प्रशासन जागे होण्यापेक्षा त्याआधीच योग्य उपाययोजना करणे आवश्यक असल्याची मागणी त्यांनी केली आहे.

ग्रामस्थांनीही संबंधित शिक्षण विभाग, जिल्हा परिषद आणि विद्युत विभागाने तात्काळ संयुक्त पाहणी करून शाळेतील संपूर्ण विद्युत यंत्रणेचे ऑडिट करावे, सर्व धोकादायक वायरिंग व तुटलेले स्विचबोर्ड बदलून सुरक्षित विद्युत व्यवस्था उभारावी, अशी मागणी केली आहे.

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेशी कोणतीही तडजोड होऊ नये, यासाठी प्रशासनाने तातडीने आवश्यक निधी उपलब्ध करून दुरुस्तीची कामे हाती घ्यावीत, अशी अपेक्षा पालक, ग्रामस्थ आणि शाळा व्यवस्थापनाकडून व्यक्त होत आहे. दुर्घटना घडल्यानंतर कारवाई करण्याऐवजी संभाव्य धोका टाळण्यासाठी त्वरित पावले उचलण्याची गरज असल्याचे नागरिकांनी नमूद केले आहे.

Related to this topic: