Breaking News
  • तुकाराम मुंढे नांदेडला आल्याची अफवा, भीतीपोटी पान टपऱ्या बंद करून , टपरी चालक पसार
  • तुळजापुरात वाढत्या गुन्हेगारीविरोधात नागरिकांचे साखळी उपोषण; अधिकाऱ्यांच्या बदलीची मागणी
  • वाशिम शहरात आनंदाचे वातावरण... प्रचंड उकाड्यापासून वाशिमकरांना काहीसा दिलासा
  • अमरावती शहरात सलग तीसऱ्या दिवशी दमदार पावसाची हजेरी
  • आकाशवाणी पुणे केंद्राचा वृत्त विभाग बंद होणार असल्याच्या चर्चेमुळे चिंता वाढली
  • पवनराजे निंबाळकर हत्याकांड प्रकरणी न्यायालय 20 तारखेला देणार निकाल
  • नंदूरबारमध्ये सरसकट कर्जमाफीच्या मागणीसाठी शेतकऱ्याने मारली विहिरीत उडी
  • आय टी पार्क हिंजवडीत मद्यधुंद तरुणांच्या आलीशान कारने दुचाकीला उडवले
  • सफाई कर्मचाऱ्यांना आवश्यक सुरक्षा उपकरणांशिवाय आणि निर्धारित नियमांचे उल्लंघन करून नालेसफाईच्या कामावर तैनात केले जात असल्याची तक्रार दाखल झाल्याची दखल घेत राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाने (NCSC) पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्तांना नोटीस बजावली आहे.

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

कळमनुरी जोरदार पाऊस

कळमनुरीत वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस; नाल्यांचे घाण पाणी रस्त्यावर, नागरिकांची तारांबळ

Kalamnuri Heavy Rain: कळमनुरीत अचानक जोरदार पावसाने रस्त्यावर घाणपाणीच्या समस्ये पसरली आहेत. या कारणामुळे शहरातील नाल्यांची सफाई व पाणी निचऱ्याची व्यवस्था केल्याबाबत नागरिकांना संशय आहे.


कळमनुरीत वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस नाल्यांचे घाण पाणी रस्त्यावर नागरिकांची तारांबळ

Kalamnuri Heavy Rain |

कळमनुरी (Kalamnuri Heavy Rain) : शहरात अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह जोरदार पावसामुळे नागरिकांची मोठी तारांबळ उडाली. अल्पावधीत झालेल्या पावसामुळे शहरातील अनेक भागांमध्ये नाल्यांचे घाण पाणी रस्त्यावर आले असून, नागरिकांना या सांडपाण्यातून रस्ता ओलांडण्याची वेळ आली आहे.

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नाल्यांची स्वच्छता व पाणी निचऱ्याची योग्य व्यवस्था करण्याची गरज असताना नगरपरिषदेचे याकडे दुर्लक्ष होत असल्याची नाराजी नागरिकांमधून व्यक्त होत आहे. (Kalamnuri Heavy Rain) रस्त्यावर साचलेल्या घाण पाण्यामुळे दुर्गंधी पसरत असून, आरोग्याच्या समस्या निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

"अचानक पाऊस आला की दरवेळी हीच परिस्थिती निर्माण होते, मग नगरपरिषद प्रशासन याकडे लक्ष का देत नाही?" असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत. शहरातील नाल्यांची तातडीने साफसफाई करून पाणी निचरा व्यवस्था सुरळीत करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

Related to this topic: