Breaking News
  • बदलापुरात तुकाराम मुंडे यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक
  • देशाची शिक्षणव्यवस्था बदलावी लागेल- राहुल गांधी
  • मंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसकडून सांगलीत जल्लोष
  • आषाढी निमित्त काढण्यात आलेल्या रथ उत्सवात प्रयास मित्र मंडळाने देखाव्यातून मांडले 'नीट' पेपर फुटीचे दाहक वास्तव
  • युवकांनी सरकारला नैतिक जबाबदारी स्वीकारायला भाग पाडलं - शरद पवार
  • TET पेपर फुटी प्रकरणातील मास्टर माईंड बिजेदरं कुमार गुप्ता सह इंद्रजित सिंग ला 30 जुलै पर्यंत पोलीस कोठडी
  • केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनाम्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये विद्यार्थ्यांसह विविध संघटनेचा जल्लोष....
  • छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज भागातील प्रति पंढरपूर येथे विठ्ठल भक्तांची गर्दी
  • संभाजीनगरच्या प्रति पंढरपूर येथे मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते सुरू विठ्ठल रुक्माईची पूजा

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

नंदगाव येथे वीज पुरवठा करणारा डीपी जळून खाक

औंढा तालुक्यातील नंदगाव येथे १६ मे रोजी रात्री साडेआठ वाजता अचानक वीज पुरवठा करणाऱ्या डीपीने पेट घेतल्याने तो पूर्णपणे जळून खाक झाला.


नंदगाव येथे वीज पुरवठा करणारा डीपी जळून खाक

Transformer Fire |

रात्रभर गावात अंधार; पिण्याच्या पाण्यासाठी गावकऱ्यांची गैरसोय

नंदगाव (Transformer Fire) : औंढा तालुक्यातील नंदगाव येथे १६ मे रोजी रात्री साडेआठ वाजता अचानक वीज पुरवठा करणाऱ्या डीपीने पेट घेतल्याने तो पूर्णपणे जळून खाक झाला. यामुळे गावाचा वीज पुरवठा तात्काळ खंडित झाला. घटनेची माहिती मिळताच कर्मचाऱ्यांना कळविण्यात आले आणि नंदगाव फाट्याहून गावाचे कनेक्शन बंद करण्यात आले. परिणामी रात्रभर गावात अंधाराचे साम्राज्य पसरले होते. उष्णतेमुळे गावकऱ्यांना रात्र जागून काढावी लागली.

औंढा नागनाथ तालुक्यातील नंदगाव येथे वीज पुरवठा करणाऱ्या डीपीला रात्री अचानक आग लागल्याने संपूर्ण गावाचा वीज पुरवठा खंडित झाला. याबाबत गावकऱ्यांनी वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांना माहिती दिल्यानंतर त्यांनी वीज पुरवठा बंद केला. त्यामुळे गावात रात्रभर अंधार पसरला होता. वाढत्या उष्णतेमुळे पंखे, कुलर बंद असल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. अनेकांच्या मोबाईलला चार्जिंग नसल्याने फोन बंद पडले.

वीज नसल्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर झाला असून विजेवर चालणारी सर्व यंत्रे बंद पडली. रविवारी दुपारपर्यंत डीपी दुरुस्त करण्यात आलेला नव्हता.

दरम्यान, गावातील जिल्हा परिषद शाळेजवळ बसविण्यात आलेला डीपी पाच वर्षांपासून कनेक्शनविना असल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या वर्षी काही नागरिकांनी वर्गणी करून गावातील काही भागात डीपीवर जोडणी घेतली होती. नुकतेच अर्ध्या गावात पाणीपुरवठा होत नसल्याने ८ मे रोजी झालेल्या ग्रामसभेत हंडा मोर्चा काढण्यात आला होता. हे प्रकरण जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचले होते.

आता डीपी जळाल्याने पाणीपुरवठा किती दिवस बंद राहणार, असा प्रश्न गावकऱ्यांनी उपस्थित केला आहे. यापूर्वीही ग्रामस्थांनी वर्गणी करून दोन वर्षांत तीन वेळा डीपी बसवला होता. तात्काळ नवीन ट्रान्सफॉर्मर बसविण्यात यावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

Related to this topic: