Breaking News
  • नाणेघाटावर धुक्याची पांढरी चादर; इंद्रवज्र पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी
  • रांजणगाव गणपतीजवळ मिक्सर रोडखाली उतरला; वाहतूक कोंडीने नागरिक त्रस्त
  • धुळे जिल्ह्यामध्ये असलेल्या एकूण 182 पेट्रोल पंपापैकी जवळपास 9 पेट्रोल पंपांवर डिझेलचा तुटवडा
  • फिसाळलेल्या कुत्र्याने एका सहा वर्षांच्या मुलासह आठ जणांचा चावा घेतल्याची घटना रायगडच्या कर्जतमधून समोर आली आहे
  • सांगोल्यात मान्सूनपूर्व पावसाची हजेरी
  • पंढरपूरमध्ये चालत्या एसटी बसची डिझेल टाकी तुटली; एसटी बसच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर
  • बीडमध्ये केज तालुक्यातील जिवाचीवाडी शिवारात रात्री झालेल्या गारपिटीसह वादळी वाऱ्याने शेती पिकांचे नुकसान
  • पुण्यात किरकोळ कारणावरून तरुणावर कोयत्याने वार, २ जणांना अटक;पुण्यातील कोंढवा भागातील घटना सी सी टिव्ही मध्ये कैद
  • धाराशिवच्या उमरगा शहरात पावसाची जोरदार हजेरी,अचानक आलेल्या पावसामुळे आठवडी बाजाराचा उडाला फज्जा

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

नंदगाव येथे वीज पुरवठा करणारा डीपी जळून खाक

औंढा तालुक्यातील नंदगाव येथे १६ मे रोजी रात्री साडेआठ वाजता अचानक वीज पुरवठा करणाऱ्या डीपीने पेट घेतल्याने तो पूर्णपणे जळून खाक झाला.


नंदगाव येथे वीज पुरवठा करणारा डीपी जळून खाक

Transformer Fire |

रात्रभर गावात अंधार; पिण्याच्या पाण्यासाठी गावकऱ्यांची गैरसोय

नंदगाव (Transformer Fire) : औंढा तालुक्यातील नंदगाव येथे १६ मे रोजी रात्री साडेआठ वाजता अचानक वीज पुरवठा करणाऱ्या डीपीने पेट घेतल्याने तो पूर्णपणे जळून खाक झाला. यामुळे गावाचा वीज पुरवठा तात्काळ खंडित झाला. घटनेची माहिती मिळताच कर्मचाऱ्यांना कळविण्यात आले आणि नंदगाव फाट्याहून गावाचे कनेक्शन बंद करण्यात आले. परिणामी रात्रभर गावात अंधाराचे साम्राज्य पसरले होते. उष्णतेमुळे गावकऱ्यांना रात्र जागून काढावी लागली.

औंढा नागनाथ तालुक्यातील नंदगाव येथे वीज पुरवठा करणाऱ्या डीपीला रात्री अचानक आग लागल्याने संपूर्ण गावाचा वीज पुरवठा खंडित झाला. याबाबत गावकऱ्यांनी वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांना माहिती दिल्यानंतर त्यांनी वीज पुरवठा बंद केला. त्यामुळे गावात रात्रभर अंधार पसरला होता. वाढत्या उष्णतेमुळे पंखे, कुलर बंद असल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. अनेकांच्या मोबाईलला चार्जिंग नसल्याने फोन बंद पडले.

वीज नसल्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर झाला असून विजेवर चालणारी सर्व यंत्रे बंद पडली. रविवारी दुपारपर्यंत डीपी दुरुस्त करण्यात आलेला नव्हता.

दरम्यान, गावातील जिल्हा परिषद शाळेजवळ बसविण्यात आलेला डीपी पाच वर्षांपासून कनेक्शनविना असल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या वर्षी काही नागरिकांनी वर्गणी करून गावातील काही भागात डीपीवर जोडणी घेतली होती. नुकतेच अर्ध्या गावात पाणीपुरवठा होत नसल्याने ८ मे रोजी झालेल्या ग्रामसभेत हंडा मोर्चा काढण्यात आला होता. हे प्रकरण जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचले होते.

आता डीपी जळाल्याने पाणीपुरवठा किती दिवस बंद राहणार, असा प्रश्न गावकऱ्यांनी उपस्थित केला आहे. यापूर्वीही ग्रामस्थांनी वर्गणी करून दोन वर्षांत तीन वेळा डीपी बसवला होता. तात्काळ नवीन ट्रान्सफॉर्मर बसविण्यात यावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

Related to this topic: