Breaking News
  • राज्यात मान्सूनची संथ वाटचाल, हवामान विभागाचा शेतकऱ्यांना पेरणीत घाई न करण्याचा सल्ला
  • तुळजाभवानी मंदिर परिसरात थुंकणाऱ्या १८ जणांवर कारवाई;९ हजारांचा दंड वसूल
  • शेगाव शहरात लाखो भाविकांच्या आरोग्याशी खेळ,भेसळयुक्त खाद्यपदार्थांची सर्रास विक्री
  • रत्नागिरी आरटीओच्या ‘वायुवेग पथका’कडून वर्षभरात ३ कोटी ३३ लाखांचा दंड वसूल
  • आमच्या परिसरातील नळाला पाणी का सोडलं नाही...? असा जाब ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला विचारला असता, कर्मचाऱ्याने गावातील लोकांना जमवून गावातीलच पारधी वस्तीवर हल्ला करून जवळपास 11 घरांची तोडफोड केली
  • मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्तक्षेपानंतर नाशिक विधान परिषदेच्या निवडणुकीतून गोकुळ गिते माघार घेणार असल्याची शक्यता आहे.
  • मुंबईतील गगनचुंबी टॉवर आणि झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या नागरिकांसाठी एकच दर न ठेवता आता वेगवेगळा रेडीरेकनर दर आकारला जाणार आहे.
  • वाशिममध्ये शिवशाही बसचा अपघात, चालकाचे नियंत्रण सुटल्यानं घडला अनर्थ
  • हिंगोलीच्या कळमनुरी मध्ये गॅस एजन्सीच्या बाहेर ग्राहकांनी गोंधळ घातला आहे

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

नंदगाव येथे वीज पुरवठा करणारा डीपी जळून खाक

औंढा तालुक्यातील नंदगाव येथे १६ मे रोजी रात्री साडेआठ वाजता अचानक वीज पुरवठा करणाऱ्या डीपीने पेट घेतल्याने तो पूर्णपणे जळून खाक झाला.


नंदगाव येथे वीज पुरवठा करणारा डीपी जळून खाक

Transformer Fire |

रात्रभर गावात अंधार; पिण्याच्या पाण्यासाठी गावकऱ्यांची गैरसोय

नंदगाव (Transformer Fire) : औंढा तालुक्यातील नंदगाव येथे १६ मे रोजी रात्री साडेआठ वाजता अचानक वीज पुरवठा करणाऱ्या डीपीने पेट घेतल्याने तो पूर्णपणे जळून खाक झाला. यामुळे गावाचा वीज पुरवठा तात्काळ खंडित झाला. घटनेची माहिती मिळताच कर्मचाऱ्यांना कळविण्यात आले आणि नंदगाव फाट्याहून गावाचे कनेक्शन बंद करण्यात आले. परिणामी रात्रभर गावात अंधाराचे साम्राज्य पसरले होते. उष्णतेमुळे गावकऱ्यांना रात्र जागून काढावी लागली.

औंढा नागनाथ तालुक्यातील नंदगाव येथे वीज पुरवठा करणाऱ्या डीपीला रात्री अचानक आग लागल्याने संपूर्ण गावाचा वीज पुरवठा खंडित झाला. याबाबत गावकऱ्यांनी वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांना माहिती दिल्यानंतर त्यांनी वीज पुरवठा बंद केला. त्यामुळे गावात रात्रभर अंधार पसरला होता. वाढत्या उष्णतेमुळे पंखे, कुलर बंद असल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. अनेकांच्या मोबाईलला चार्जिंग नसल्याने फोन बंद पडले.

वीज नसल्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर झाला असून विजेवर चालणारी सर्व यंत्रे बंद पडली. रविवारी दुपारपर्यंत डीपी दुरुस्त करण्यात आलेला नव्हता.

दरम्यान, गावातील जिल्हा परिषद शाळेजवळ बसविण्यात आलेला डीपी पाच वर्षांपासून कनेक्शनविना असल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या वर्षी काही नागरिकांनी वर्गणी करून गावातील काही भागात डीपीवर जोडणी घेतली होती. नुकतेच अर्ध्या गावात पाणीपुरवठा होत नसल्याने ८ मे रोजी झालेल्या ग्रामसभेत हंडा मोर्चा काढण्यात आला होता. हे प्रकरण जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचले होते.

आता डीपी जळाल्याने पाणीपुरवठा किती दिवस बंद राहणार, असा प्रश्न गावकऱ्यांनी उपस्थित केला आहे. यापूर्वीही ग्रामस्थांनी वर्गणी करून दोन वर्षांत तीन वेळा डीपी बसवला होता. तात्काळ नवीन ट्रान्सफॉर्मर बसविण्यात यावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

Related to this topic: